शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

वसईत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ

By admin | Updated: April 16, 2017 04:23 IST

वसई पंचायत समितीसमोरील अनधिकृत टपऱ्या ताबडतोब दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा देऊनही तहसिलदारांनी कारवाई न केल्याने

वसई : वसई पंचायत समितीसमोरील अनधिकृत टपऱ्या ताबडतोब दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा देऊनही तहसिलदारांनी कारवाई न केल्याने या टपऱ्यांना अभय मिळाले आहे.वसई पंचायत समितीसमोरील सरकारी मालकीच्या मोकळ््या जागेत पूर्वी वर्तमानपत्र विक्रीचा एकच स्टॉल आणि सरबताची एक गाडी होती. मात्र, गेल्या दहा वर्षात या भागातील चित्र पार बदलून गेले आहे. सरकारी जागेत अनेक टपऱ्या बांधण्यात आल्या असून त्यातील काही तर पक्क्या स्वरुपाच्या बनवण्यात आल्या आहेत. झेरॉक्सच्या दुकानापासून वडापाव, भजीपाव, वेज-नॉन व्हेज खानावळ, कोल्ड्रींक्सच्या टपऱ्या तयार झाल्या आहेत. या टपऱ्यांनी हळूहळू सरकारची संपूर्ण जागाच गिळून टाकली आहे. या परिसरात कोर्ट, पंचायत समिती, तहसीलदार कचेरी, भूमी अभिलेख कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग कार्यालय, रेस्ट हाऊस, आरटीओ कॅम्प अशी तालुक्यातील महत्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात दररोज हजारो लोकांची ये-जा असते.या टपऱ्यांमुळे आता वाहतूकीला अडथळे येऊ लागले आहेत. पंचायत समितीकडे जाणारा रस्ता आता नावापुरताच उरला आहे. या ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये दररोज हजारो लोक येत असतात. पण, त्यांच्यासाठी निवाऱ्याची कोणतीही सोय नाही. टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावर रिक्शा स्टँड आहे. कैद्यांना घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या दररोज दोन-तीन व्हॅन उभ्या असतात. महापालिकेचा बस थांबा पण इथेच आहे. सरकारी जागेवरील अतिक्रमणे दूर करण्यात यावीत अशी मागणी दिलीप पाटील आणि अनिल वर्तक यांनी सातत्याने लावून धरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना १८ नोव्हेंबर २०१६ रोजी टपऱ्या पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा १५ फेब्रुवारी २०१७ रोजी टपऱ्या पाडण्याचे आदेश तहसिलदारांना दिले होते. मात्र, दोन्ही आदेश तहसिलदारांना धुडकावून लावत टपऱ्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट टपऱ्यांना अभय दिले. त्यामुळे दिलीप पाटील यांनी विभागीय कोकण आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी दखल घेतल्यानंतर उपायुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी ३१ मार्च २०१७ रोजी टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे तीन आदेश आणि आता थेट कोकण आयुक्त कार्यालयातून टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आले असतानाही तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. उलट ही जागा नेमकी कुणाच्या मालकीची आहे हे आधी तपासावे लागेल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगत तहसिलदार पाटोळे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.