शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वसईत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ

By admin | Updated: April 16, 2017 04:23 IST

वसई पंचायत समितीसमोरील अनधिकृत टपऱ्या ताबडतोब दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा देऊनही तहसिलदारांनी कारवाई न केल्याने

वसई : वसई पंचायत समितीसमोरील अनधिकृत टपऱ्या ताबडतोब दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा देऊनही तहसिलदारांनी कारवाई न केल्याने या टपऱ्यांना अभय मिळाले आहे.वसई पंचायत समितीसमोरील सरकारी मालकीच्या मोकळ््या जागेत पूर्वी वर्तमानपत्र विक्रीचा एकच स्टॉल आणि सरबताची एक गाडी होती. मात्र, गेल्या दहा वर्षात या भागातील चित्र पार बदलून गेले आहे. सरकारी जागेत अनेक टपऱ्या बांधण्यात आल्या असून त्यातील काही तर पक्क्या स्वरुपाच्या बनवण्यात आल्या आहेत. झेरॉक्सच्या दुकानापासून वडापाव, भजीपाव, वेज-नॉन व्हेज खानावळ, कोल्ड्रींक्सच्या टपऱ्या तयार झाल्या आहेत. या टपऱ्यांनी हळूहळू सरकारची संपूर्ण जागाच गिळून टाकली आहे. या परिसरात कोर्ट, पंचायत समिती, तहसीलदार कचेरी, भूमी अभिलेख कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग कार्यालय, रेस्ट हाऊस, आरटीओ कॅम्प अशी तालुक्यातील महत्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात दररोज हजारो लोकांची ये-जा असते.या टपऱ्यांमुळे आता वाहतूकीला अडथळे येऊ लागले आहेत. पंचायत समितीकडे जाणारा रस्ता आता नावापुरताच उरला आहे. या ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये दररोज हजारो लोक येत असतात. पण, त्यांच्यासाठी निवाऱ्याची कोणतीही सोय नाही. टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावर रिक्शा स्टँड आहे. कैद्यांना घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या दररोज दोन-तीन व्हॅन उभ्या असतात. महापालिकेचा बस थांबा पण इथेच आहे. सरकारी जागेवरील अतिक्रमणे दूर करण्यात यावीत अशी मागणी दिलीप पाटील आणि अनिल वर्तक यांनी सातत्याने लावून धरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना १८ नोव्हेंबर २०१६ रोजी टपऱ्या पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा १५ फेब्रुवारी २०१७ रोजी टपऱ्या पाडण्याचे आदेश तहसिलदारांना दिले होते. मात्र, दोन्ही आदेश तहसिलदारांना धुडकावून लावत टपऱ्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट टपऱ्यांना अभय दिले. त्यामुळे दिलीप पाटील यांनी विभागीय कोकण आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी दखल घेतल्यानंतर उपायुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी ३१ मार्च २०१७ रोजी टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे तीन आदेश आणि आता थेट कोकण आयुक्त कार्यालयातून टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आले असतानाही तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. उलट ही जागा नेमकी कुणाच्या मालकीची आहे हे आधी तपासावे लागेल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगत तहसिलदार पाटोळे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.