शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 11:44 PM

वारंवार वीज होतेय खंडीत; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

- आशिष राणे

वसई: मागील दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे येथील वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर गाळ साचला असून हे दोन्ही प्लांट पूर्णपणे सूर्या नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.दरम्यान याठिकाणी वारंवार वीजखंडीत होत असल्याने  पाऊस कमी होईपर्यंत शहरांतील नागरिकांना कमी दाबाने व  अनियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहेनागरिकांची पाण्यापासून गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा नियंत्रक यांच्या वतीनं सोमवारी रात्री उशिरा ही माहिती लोकमत ला देण्यात आली  आहेनियंत्रक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पालघर जिल्ह्यात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सूर्या योजनेतील धामणी धरण शंभर टक्के भरले असून ते ओसंडून वाहत आहे किंबहुना धामणी धरणाचे पाचही दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून धरणातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग ही सुरू आहे त्यात सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा ही दिला आहेमात्र अतिवृष्टीमुळे येथील मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर  गाळ साचला असून  सूर्या नदीला पुर आल्याने हे दोन्ही प्लांट पूर्ण पणे पाण्याखाली गेले आहेत

अतिवृष्टीमुळे वीज होतेय खंडित; जॅकवेलही करावा लागतोय दुरुस्तजोरदार अतिवृष्टी व सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे  मासवण पंपिंग स्टेशन चा काही भाग पाण्याखाली गेला असल्याने त्या पुराच्या पाण्याबरोबर मोठा गाळ, केरकचरा वाहून येऊन तो मासवण पंपिंगच्या जॅकवेलमध्ये गाळ येऊन पंप नादुरुस्त होत आहेत.त्यामुळे पंपिंग बंद करून पाणबुडी जॅकवेलमध्ये उतरवून जॅकवेलमधील गाळ वारंवार साफ करावा लागत असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

कुठल्याही क्षणी वीज होऊ शकते खंडित?दरम्यान पालघर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी ,जोरदार वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत दोन वेळा मासवण पंपिंग स्टेशन व  धुकटन फिल्टर प्लांट येथे वीज पुरवठा खंडित झाला असून पुढेही विद्युत पुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी वरील कारणांमुळे वसई विरार शहराला होणारा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस अनियमित आणि कमी प्रमाणात होऊ शकतो तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे  असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.