शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

लॉकडाऊनमध्ये ‘रेशनिंग’चा वसई-विरारकरांना आधार! तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्यवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:56 IST

Vasai-Virar News : वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली.

विरार - काेराेनामुळे घेतलेल्या लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल ते ऑक्टाेबर या सात महिन्यांत वसई-विरारकरांनी वसई-विरारमधील शिधावाटप दुकानांतून विक्रमी तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्याची विक्री झाली. शिधावाटप केंद्रातून प्रथमच ९५ टक्के एवढी धान्यविक्री झाली आहे.वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे नागरिकांनी शिधावाटप दुकानांत मिळणारे धान्य घेण्यास गर्दी केली हाेती. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये वसईच्या पुरवठा खात्याने एक लाख ७७ हजार ६०४ क्विंटल धान्य शिधावाटप दुकानांत उपलब्ध केले होते. त्यापैकी एक लाख ६९ हजार ६७३ क्विंटल धान्य लोकांनी घेतले. केंद्र शासनाच्या योजनेनुसार एक लाख ८१ हजार २६१ क्विंटल धान्य देण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ७४ हजार ५४२ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतले. नियमित आणि केंद्र शासनाचे मिळून तीन लाख ८२ हजार १०८ क्विंटल धान्य नागरिकांसाठी देण्यात आले होते. त्यापैकी तीन लाख ६७ हजार ४५७ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतल्याची माहिती पुरवठा शाखेने दिली.बायोमेट्रिकद्वारे धान्यवाटप शासनाकडून अंत्याेदय योजनेसाठी १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ तर प्राधान्य योजनेसाठी प्रतिसदस्य गहू दोन आणि तांदूळ तीन किलो मिळतो. काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धत लागू केली. शिधावाटप दुकानांत हे बायोमेट्रिक यंत्र बसविले. या पद्धतीने धान्य घेण्याचे प्रमाण ८५ टक्के वाढले. त्यामुळे लाभार्थ्यांना हिश्शाचे धान्य मिळत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.टाळेबंदीच्या काळात नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन शासनाने धान्यपुरवठा वाढविला होता. प्रथमच विक्रमी ९५ टक्के धान्यवाटप करण्यात आले.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार