शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 02:47 IST

वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.

नालासोपारा - वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय देहर्जे ह्या महापालिकेच्या मालकीच्या धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे खोलसापाडा हे महापालिकेच्या मालकीचे दुसरे धरण होणार आहे.वसई विरार पालिकेने पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा या साठी गेल्या काही वर्षात विविध योजना हाती घेतल्या आहेत. सूर्या पाणी पुरवठा योजने बरोबरच देहरजी धरणाचे काम हि युद्ध पातळीवर सुरु ठेवले असून त्या जोडीलाच पालिकेने राजावली, सातिवली व तिल्हेर साठवण तलाव बांधण्यासाठीं महासभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या योजनांसाठी वेगवेगळ्या मंजुऱ्या मिळविण्याचे काम ठाणे पाटबंधारे विभागाकडून सुरु असतांनाच आता खोलसापाडा धरणास केंद्रीय वन विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे.त्यामुळे महापालिका क्षेत्राला जलपुरवठ्याचा वेगळा पर्याय निर्माण झाला आहे. या प्रकल्पातील जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासाठी काल झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच या प्रकल्पाचा ठेकेदार पाठबंधारे विभाग असेल असा ठरावही करण्यात आला .खोलसापाडा योजने अंतर्गत पाणलोट क्षेत्र हे ३.६४ किमी इतके असणार आहे. या प्रकल्पातून पालिकेला प्रतिदिन १४ द. ल. लीटर पाणी मिळणार आहे. हे पाणी जलसंपदा विभाग मार्फत (कोकण पाठबंधारे विकास महामंडळ) आरक्षित करण्यासाठी व तो पूर्ण मालकी तत्वावर राबवून घेण्यास आणि त्यासाठी येणाºया अंदाजपत्रकीय ३५ कोटीच्या खर्चास सभेने मंजुरी दिल्याने आता खोलसापाडा योजनेस गती मिळणार असून वसई विरारकरांसाठी पाण्याचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होणार आहे.वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच पाणी प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. सूर्या योजना हे त्याचेच उदाहरण आहे. त्या पाठोपाठ देहरजी प्रकल्प, राजावली ,सातिवली,तिल्हेर,कामण अशा वेगवेगळ्या योजनांवर युद्धपातळीवर काम सुरु आहे. या योजना सुरु झाल्यास या ठिकाणी पाण्याचा प्रश्न राहणार नाही. अवघ्या ९ वर्षाच्या महापालिकेच्या मालकीची दोन स्वत:ची धरणे आता अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न सुटणार आहे.- रु पेश जाधव, महापौर, वसई विरार महानगरपालिका.मुंबईला लागून वसई विरार पालिका असल्याने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिला पुरेसे पाणी मिळावे यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. आजही महापालिका क्षेत्रातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नव्याने होणाº्या योजनांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही . शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचे धडे दिलेत. विरोधक असालो तरी चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिल.-किरण चेंदवणकर , विरोधी पक्षनेत्या वसई महापालिका

टॅग्स :DamधरणVasai Virarवसई विरार