शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 02:47 IST

वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.

नालासोपारा - वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय देहर्जे ह्या महापालिकेच्या मालकीच्या धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे खोलसापाडा हे महापालिकेच्या मालकीचे दुसरे धरण होणार आहे.वसई विरार पालिकेने पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा या साठी गेल्या काही वर्षात विविध योजना हाती घेतल्या आहेत. सूर्या पाणी पुरवठा योजने बरोबरच देहरजी धरणाचे काम हि युद्ध पातळीवर सुरु ठेवले असून त्या जोडीलाच पालिकेने राजावली, सातिवली व तिल्हेर साठवण तलाव बांधण्यासाठीं महासभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या योजनांसाठी वेगवेगळ्या मंजुऱ्या मिळविण्याचे काम ठाणे पाटबंधारे विभागाकडून सुरु असतांनाच आता खोलसापाडा धरणास केंद्रीय वन विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे.त्यामुळे महापालिका क्षेत्राला जलपुरवठ्याचा वेगळा पर्याय निर्माण झाला आहे. या प्रकल्पातील जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासाठी काल झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच या प्रकल्पाचा ठेकेदार पाठबंधारे विभाग असेल असा ठरावही करण्यात आला .खोलसापाडा योजने अंतर्गत पाणलोट क्षेत्र हे ३.६४ किमी इतके असणार आहे. या प्रकल्पातून पालिकेला प्रतिदिन १४ द. ल. लीटर पाणी मिळणार आहे. हे पाणी जलसंपदा विभाग मार्फत (कोकण पाठबंधारे विकास महामंडळ) आरक्षित करण्यासाठी व तो पूर्ण मालकी तत्वावर राबवून घेण्यास आणि त्यासाठी येणाºया अंदाजपत्रकीय ३५ कोटीच्या खर्चास सभेने मंजुरी दिल्याने आता खोलसापाडा योजनेस गती मिळणार असून वसई विरारकरांसाठी पाण्याचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होणार आहे.वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच पाणी प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. सूर्या योजना हे त्याचेच उदाहरण आहे. त्या पाठोपाठ देहरजी प्रकल्प, राजावली ,सातिवली,तिल्हेर,कामण अशा वेगवेगळ्या योजनांवर युद्धपातळीवर काम सुरु आहे. या योजना सुरु झाल्यास या ठिकाणी पाण्याचा प्रश्न राहणार नाही. अवघ्या ९ वर्षाच्या महापालिकेच्या मालकीची दोन स्वत:ची धरणे आता अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न सुटणार आहे.- रु पेश जाधव, महापौर, वसई विरार महानगरपालिका.मुंबईला लागून वसई विरार पालिका असल्याने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिला पुरेसे पाणी मिळावे यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. आजही महापालिका क्षेत्रातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नव्याने होणाº्या योजनांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही . शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचे धडे दिलेत. विरोधक असालो तरी चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिल.-किरण चेंदवणकर , विरोधी पक्षनेत्या वसई महापालिका

टॅग्स :DamधरणVasai Virarवसई विरार