शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 02:47 IST

वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.

नालासोपारा - वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय देहर्जे ह्या महापालिकेच्या मालकीच्या धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे खोलसापाडा हे महापालिकेच्या मालकीचे दुसरे धरण होणार आहे.वसई विरार पालिकेने पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा या साठी गेल्या काही वर्षात विविध योजना हाती घेतल्या आहेत. सूर्या पाणी पुरवठा योजने बरोबरच देहरजी धरणाचे काम हि युद्ध पातळीवर सुरु ठेवले असून त्या जोडीलाच पालिकेने राजावली, सातिवली व तिल्हेर साठवण तलाव बांधण्यासाठीं महासभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या योजनांसाठी वेगवेगळ्या मंजुऱ्या मिळविण्याचे काम ठाणे पाटबंधारे विभागाकडून सुरु असतांनाच आता खोलसापाडा धरणास केंद्रीय वन विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे.त्यामुळे महापालिका क्षेत्राला जलपुरवठ्याचा वेगळा पर्याय निर्माण झाला आहे. या प्रकल्पातील जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासाठी काल झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच या प्रकल्पाचा ठेकेदार पाठबंधारे विभाग असेल असा ठरावही करण्यात आला .खोलसापाडा योजने अंतर्गत पाणलोट क्षेत्र हे ३.६४ किमी इतके असणार आहे. या प्रकल्पातून पालिकेला प्रतिदिन १४ द. ल. लीटर पाणी मिळणार आहे. हे पाणी जलसंपदा विभाग मार्फत (कोकण पाठबंधारे विकास महामंडळ) आरक्षित करण्यासाठी व तो पूर्ण मालकी तत्वावर राबवून घेण्यास आणि त्यासाठी येणाºया अंदाजपत्रकीय ३५ कोटीच्या खर्चास सभेने मंजुरी दिल्याने आता खोलसापाडा योजनेस गती मिळणार असून वसई विरारकरांसाठी पाण्याचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होणार आहे.वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच पाणी प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. सूर्या योजना हे त्याचेच उदाहरण आहे. त्या पाठोपाठ देहरजी प्रकल्प, राजावली ,सातिवली,तिल्हेर,कामण अशा वेगवेगळ्या योजनांवर युद्धपातळीवर काम सुरु आहे. या योजना सुरु झाल्यास या ठिकाणी पाण्याचा प्रश्न राहणार नाही. अवघ्या ९ वर्षाच्या महापालिकेच्या मालकीची दोन स्वत:ची धरणे आता अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न सुटणार आहे.- रु पेश जाधव, महापौर, वसई विरार महानगरपालिका.मुंबईला लागून वसई विरार पालिका असल्याने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिला पुरेसे पाणी मिळावे यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. आजही महापालिका क्षेत्रातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नव्याने होणाº्या योजनांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही . शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचे धडे दिलेत. विरोधक असालो तरी चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिल.-किरण चेंदवणकर , विरोधी पक्षनेत्या वसई महापालिका

टॅग्स :DamधरणVasai Virarवसई विरार