शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

वसई : जलभराव कधी थांबणार; ७० वर्षीय आजोबांचं पाण्यात बसूनच निषेध आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:09 IST

गळ्यात फलक अडकवून पाण्यात बसत आजोबांनी केलं अनोखं आंदोलन. 

ठळक मुद्देगळ्यात फलक अडकवून पाण्यात बसत आजोबांनी केलं अनोखं आंदोलन. 

वसईतील नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग अंतर्गत दिवाणमान येथील अश्विन नगर मध्ये राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या त्रस्त आजोबांनी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. गळ्यात फलक अडकवून महापालिका प्रशासनाविरोधात सोमवारी पाण्यात बसून ठिय्या आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अशोक तलाजिया वय ७० राहणार आश्विन नगर,वसई असे या आंदोलनकर्त्यांचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यानुसार,दरवर्षी पावसाळ्यात अवघ्या वसई नवघर माणिकपूर शहारासहित दिवाणमान स्थित आश्विन नगर भागातही गुडघ्याइतक पाणी साचून हे सर्व पाणी घरांत शिरते आणि यात घर, दुकाने व त्यातील किंमती वस्तूचे हजारो लाखोंचे नुकसान होते.

दरम्यान दरवर्षी सातत्याने हेच होत असताना पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा देखील नीट होत नसल्याने वैतागून आक्रमक होत त्यांनी भर रस्त्यात सोमवारी पावसाच्या पाण्यात ठिय्या मांडला असून महापालिकेचा ते निषेध करत आहेत. वसई-विरार शहरांमध्ये जरा वेळ ही पाऊस पडला तरी संबध, रस्त्यावर,घरात सोसायटीचे आणि व्यापारी संकुलात दुकानात मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते आणि हे पाणी दोन दोन -तीन तीन दिवस ओसरण्याचे नावदेखील घेत नाही. त्यामुळे दरवर्षाला घरातील लाखो रुपयांच्या सामानाची नासधूस होत असल्याचा गंभीर आरोप या आजोबांनी केला आहे. दरम्यान महापालिका लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर कंटाळून अशोक तलाजिया यांनी पाण्यात  बसून एक अनोखे आंदोलन केले.

यावेळी त्यांनी गळ्यात एक बॅनर घातला असून अश्विन नगर मधील जलभराव कधी थांबणार तर या जलभरावास वसई विरार महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोपदेखील त्यांनी या बॅनरच्या माध्यमाने केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणीRainपाऊस