शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

वसई : जलभराव कधी थांबणार; ७० वर्षीय आजोबांचं पाण्यात बसूनच निषेध आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:09 IST

गळ्यात फलक अडकवून पाण्यात बसत आजोबांनी केलं अनोखं आंदोलन. 

ठळक मुद्देगळ्यात फलक अडकवून पाण्यात बसत आजोबांनी केलं अनोखं आंदोलन. 

वसईतील नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग अंतर्गत दिवाणमान येथील अश्विन नगर मध्ये राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या त्रस्त आजोबांनी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. गळ्यात फलक अडकवून महापालिका प्रशासनाविरोधात सोमवारी पाण्यात बसून ठिय्या आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अशोक तलाजिया वय ७० राहणार आश्विन नगर,वसई असे या आंदोलनकर्त्यांचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यानुसार,दरवर्षी पावसाळ्यात अवघ्या वसई नवघर माणिकपूर शहारासहित दिवाणमान स्थित आश्विन नगर भागातही गुडघ्याइतक पाणी साचून हे सर्व पाणी घरांत शिरते आणि यात घर, दुकाने व त्यातील किंमती वस्तूचे हजारो लाखोंचे नुकसान होते.

दरम्यान दरवर्षी सातत्याने हेच होत असताना पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा देखील नीट होत नसल्याने वैतागून आक्रमक होत त्यांनी भर रस्त्यात सोमवारी पावसाच्या पाण्यात ठिय्या मांडला असून महापालिकेचा ते निषेध करत आहेत. वसई-विरार शहरांमध्ये जरा वेळ ही पाऊस पडला तरी संबध, रस्त्यावर,घरात सोसायटीचे आणि व्यापारी संकुलात दुकानात मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते आणि हे पाणी दोन दोन -तीन तीन दिवस ओसरण्याचे नावदेखील घेत नाही. त्यामुळे दरवर्षाला घरातील लाखो रुपयांच्या सामानाची नासधूस होत असल्याचा गंभीर आरोप या आजोबांनी केला आहे. दरम्यान महापालिका लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर कंटाळून अशोक तलाजिया यांनी पाण्यात  बसून एक अनोखे आंदोलन केले.

यावेळी त्यांनी गळ्यात एक बॅनर घातला असून अश्विन नगर मधील जलभराव कधी थांबणार तर या जलभरावास वसई विरार महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोपदेखील त्यांनी या बॅनरच्या माध्यमाने केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणीRainपाऊस