शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान, पालिकेच्या अडचणीत वाढ : निकालाकडे वसईकरांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 09:47 IST

सांगितले की, पालिका आयुक्त व निवडणूक आयोगाने गावकऱ्यांनी दाखल केलेल्या कुठल्याही सूचना व हरकती विचारात न घेतल्या नाहीत. पालिकेने निवडणूक आयोगाच्या साथीने दाखल १७ हरकतींपैकी एकमेव हरकत विचारात घेतल्याने पालिकेविरोधात न्यायालयाकडे दाद मागावी लागली.

आशीष राणेवसई : वसई-विरार महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी व सप्टेंबरमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात घेण्यात आलेल्या सूचना व हरकती पालिका व निवडणूक आयोगाने सपशेल फेटाळून लावल्या होत्या. याविरोधात काँग्रेसचे सरचिटणीस समीर वर्तक यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात या प्रभाग रचनेलाच आव्हान दिले आहे. या प्रकरणी  मुंबई उच्च न्यायालयाने प्रभाग रचनेबाबतीत पालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. 

सांगितले की, पालिका आयुक्त व निवडणूक आयोगाने गावकऱ्यांनी दाखल केलेल्या कुठल्याही सूचना व हरकती विचारात न घेतल्या नाहीत. पालिकेने निवडणूक आयोगाच्या साथीने दाखल १७ हरकतींपैकी एकमेव हरकत विचारात घेतल्याने पालिकेविरोधात न्यायालयाकडे दाद मागावी लागली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात महापालिका प्रशासनाविरोधात दाखल केलेल्या या याचिकेवर १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली असता त्या वेळी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला शनिवार दि. १७ ऑक्टोबरपर्यंत पालिकेच्या प्रभाग रचना प्रक्रियेसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले होते, मात्र पालिकेने हे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले की नाही याबाबत पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांना संपर्क केला असता तो न झाल्याने आयुक्तांची प्रतिक्रिया मिळाली नाही.

वसई-विरार महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २८ फेब्रुवारी रोजी ११५ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली होती. त्यात ११५ पैकी २८ जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे तर महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आधीच नगरविकास खात्याकडून जाहीर झाले होते. त्यानंतर या प्रभाग रचनांसंदर्भात हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या, मात्र कोरोनामुळे टाळेबंदी सुरू झाली व पुढील सुनावणीच लांबणीवर पडली. अखेर टाळेबंदीत शिथिलता येताच ११ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली होती. यामध्ये एकूण १७ हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. यात तयार करण्यात आलेली प्रभाग रचना मतदारांच्या दृष्टीने चुकीची आणि गैरसोयीची असल्याची हरकत पर्यावरण समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी घेतली होती, परंतु ती पालिका मुख्यालयात झालेल्या सुनावणीत फेटाळण्यात आली होती. 

- 115 प्रभागांसाठी आरक्षण सोडत- 28 जागांवर महिला आरक्षणवसई-विरार महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २८ फेब्रुवारी रोजी ११५ प्रभागांसाठी आरक्षण  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHigh Courtउच्च न्यायालय