शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

ढिसाळ कामगिरीमुळे वसई-विरार, ठाण्याची घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 2:05 AM

महानगराच्या पायाभूत सोयी, रस्ते,  शिक्षणाच्या विशेषतः उच्चशिक्षण सुविधा वाढल्यात याबाबत शंका नाही; पण नागरिकांचे जीवनमान सुधारले का? याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण पूर्वी इतिहासात ठाणे हे व्यापाराचे प्रमुख केंद्र  होते.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवलीने बाजी मारली आहे. मात्र, केंद्रीय नागरी व्यवहार व गृह मंत्रालयाने यासाठी आखून दिलेल्या निकषांत ठाणे, कल्याण-डोंबिवलीने प्रामुख्याने तंत्रज्ञान, शहर नियोजन व एकंदरीत मनपाचे कामकाज, सोयीसुविधा यात मार खाल्ला आहे. आर्थिक कमकुवततेचाही फटका कल्याण-डोंबिवलीला बसला आहे. वसई-विरार मनपाचीही घसरगुंडी झाली आहे.

या यादीत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे दुसऱ्या तर नवी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. ठाणे ११व्या तर, कल्याण-डोंबिवली १२व्या स्थानावर आहे. कल्याण-डोंबिवलीची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा सुधारली आहे. नवी मुंबई, ठाण्याचा दर्जा गेल्या वर्षापेक्षा यंदा घसरल्याने दोन्ही मनपांना आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. तंत्रज्ञानात मार खाल्ल्याने स्मार्ट सिटीत भाग घेतलेल्या या सर्व शहरांची घसरगुंडी झाली आहे. मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडीची लोखसंख्या १० लाखांपेक्षा कमी असल्याने विचार झालेला नाही. 

महानगराच्या पायाभूत सोयी, रस्ते,  शिक्षणाच्या विशेषतः उच्चशिक्षण सुविधा वाढल्यात याबाबत शंका नाही; पण नागरिकांचे जीवनमान सुधारले का? याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण पूर्वी इतिहासात ठाणे हे व्यापाराचे प्रमुख केंद्र  होते. नंतर ते रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून वागळे इस्टेट, पोखरण रोड नंबर दोन, घोडबंदर, कोलशेत रोड तसेच बाळकूम, माजिवडा, कळवा व पुढे बेलापूर पट्टी यात लाखो रोजगार उपलब्ध होते. हे सर्व छोटे-मोठे कारखाने बंद करून त्याच जागी निवासी संकुले उभी राहिली, त्यात राहणारे ठाण्यात नोकरी व रोजगार करत नाहीत, याअर्थाने या महानगरात रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. बाहेरून विकसित दिसत असलेले महानगर जवळपास ४५० लोकवस्त्यांनी घेरलेले असून त्यात कमी उत्पन्न गटातील जनता राहत आहे. त्यांच्या श्रमावर या शहराचा गाडा सुरू आहे.  या अल्प उत्पन्न गटातील  असलेल्या जनतेची एकूण संख्या १०-१२ लाखांच्या पुढे आहे. यांचे जीवनमान घटलेले आहे, रोजगारही घटलेला आहे. याकडे डोळेझाक करून देशात आमचा ११ वा नंबर आला, अशी पाठ थोपटून घेण्यात आपणच आपली दिशाभूल करत राहू. - संजीव साने, स्वराज इंडिया

देशामध्ये बारावा क्रमांक आला आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. आजघडीला केडीएमसीच्या वतीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणावर विशेष भर दिला आहे. त्याविषयीच्या जनजागृतीला सामाजिक संस्थांचाही मोठा हातभार लागत आहे. वाहतूककोंडी हा विषय शहरातील महत्त्वाचा आहे. कल्याण-ठाणे रेल्वे समांतर रस्त्याचा विषयही गेली अनेक वर्षे ठोस अंमलबजावणीअभावी खितपत पडला आहे. त्यामुळे हा विषय लवकरात लवकर मार्गी लागला, तर निश्चितच प्रवासासाठी लागणारा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. शहरात विकासकामे जोमाने सुरू आहेत, ती विशिष्ट मुदतीतच मार्गी लागावी, ही अपेक्षा आहे.-  नंदकुमार पालकर, दक्ष समिती सदस्य, डोंबिवली