शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 07:33 IST

२९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीवर राज्य शासनाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. परिसरातील २९ गावांचा वसई-विरार पालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाने घेतला असून नगरविकास विभागाने गुरुवारी याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे महापालिकेच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, त्यात दीर्घकालीन संघर्ष करणाऱ्या २९ गावांचा समावेश होणार आहे. या गावांच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्गही या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अधिकारांचा वापर करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी या गावांचा समावेश करण्यासंदर्भात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावर कोकण विभागीय आयुक्तांमार्फत सुनावणी घेण्यात आली आणि त्यांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.

पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत सीमा  या हद्दवाढीमुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या सीमा लक्षणीयरीत्या विस्तारल्या आहेत. पालिकेच्या नव्या सीमा उत्तरेला वैतरणा खाडीपर्यंत, दक्षिणेला सासुनवघर आणि वसईच्या खाडीपर्यंत, पूर्वेला पेलार, चिंचोटी गावांच्या सीमेपर्यंत आणि पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

ही अधिसूचना राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने काढण्यात आली असून, यामुळे वसई-विरार परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या गावांचा पालिकेत समावेश झाल्यामुळे येथील नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्याची अपेक्षा आहे.

पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावे

आगाशी, नबाळे, कसराळी, कोपरड, निर्मळ, कोशिंबे, वाघोली, चिंचोटी, ससूनवघर, दहिसर, देवदळ, भुईगाव बु., नाळे, कामण, भुईगाव खु., रांजोडी, कनेर, गास, वटार, कोल्ही, गिरीज, चांदीप, मांडवी, कौलार बु., कशीद, कोपर, शिरसाड, कौलार खु., सालोली 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार