शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 07:33 IST

२९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीवर राज्य शासनाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. परिसरातील २९ गावांचा वसई-विरार पालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाने घेतला असून नगरविकास विभागाने गुरुवारी याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे महापालिकेच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, त्यात दीर्घकालीन संघर्ष करणाऱ्या २९ गावांचा समावेश होणार आहे. या गावांच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्गही या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अधिकारांचा वापर करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी या गावांचा समावेश करण्यासंदर्भात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावर कोकण विभागीय आयुक्तांमार्फत सुनावणी घेण्यात आली आणि त्यांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.

पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत सीमा  या हद्दवाढीमुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या सीमा लक्षणीयरीत्या विस्तारल्या आहेत. पालिकेच्या नव्या सीमा उत्तरेला वैतरणा खाडीपर्यंत, दक्षिणेला सासुनवघर आणि वसईच्या खाडीपर्यंत, पूर्वेला पेलार, चिंचोटी गावांच्या सीमेपर्यंत आणि पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

ही अधिसूचना राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने काढण्यात आली असून, यामुळे वसई-विरार परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या गावांचा पालिकेत समावेश झाल्यामुळे येथील नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्याची अपेक्षा आहे.

पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावे

आगाशी, नबाळे, कसराळी, कोपरड, निर्मळ, कोशिंबे, वाघोली, चिंचोटी, ससूनवघर, दहिसर, देवदळ, भुईगाव बु., नाळे, कामण, भुईगाव खु., रांजोडी, कनेर, गास, वटार, कोल्ही, गिरीज, चांदीप, मांडवी, कौलार बु., कशीद, कोपर, शिरसाड, कौलार खु., सालोली 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार