शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 07:33 IST

२९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीवर राज्य शासनाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. परिसरातील २९ गावांचा वसई-विरार पालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाने घेतला असून नगरविकास विभागाने गुरुवारी याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे महापालिकेच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, त्यात दीर्घकालीन संघर्ष करणाऱ्या २९ गावांचा समावेश होणार आहे. या गावांच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्गही या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अधिकारांचा वापर करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी या गावांचा समावेश करण्यासंदर्भात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावर कोकण विभागीय आयुक्तांमार्फत सुनावणी घेण्यात आली आणि त्यांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.

पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत सीमा  या हद्दवाढीमुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या सीमा लक्षणीयरीत्या विस्तारल्या आहेत. पालिकेच्या नव्या सीमा उत्तरेला वैतरणा खाडीपर्यंत, दक्षिणेला सासुनवघर आणि वसईच्या खाडीपर्यंत, पूर्वेला पेलार, चिंचोटी गावांच्या सीमेपर्यंत आणि पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

ही अधिसूचना राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने काढण्यात आली असून, यामुळे वसई-विरार परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या गावांचा पालिकेत समावेश झाल्यामुळे येथील नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्याची अपेक्षा आहे.

पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावे

आगाशी, नबाळे, कसराळी, कोपरड, निर्मळ, कोशिंबे, वाघोली, चिंचोटी, ससूनवघर, दहिसर, देवदळ, भुईगाव बु., नाळे, कामण, भुईगाव खु., रांजोडी, कनेर, गास, वटार, कोल्ही, गिरीज, चांदीप, मांडवी, कौलार बु., कशीद, कोपर, शिरसाड, कौलार खु., सालोली 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार