शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 07:33 IST

२९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीवर राज्य शासनाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. परिसरातील २९ गावांचा वसई-विरार पालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाने घेतला असून नगरविकास विभागाने गुरुवारी याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे महापालिकेच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, त्यात दीर्घकालीन संघर्ष करणाऱ्या २९ गावांचा समावेश होणार आहे. या गावांच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्गही या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अधिकारांचा वापर करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी या गावांचा समावेश करण्यासंदर्भात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावर कोकण विभागीय आयुक्तांमार्फत सुनावणी घेण्यात आली आणि त्यांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.

पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत सीमा  या हद्दवाढीमुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या सीमा लक्षणीयरीत्या विस्तारल्या आहेत. पालिकेच्या नव्या सीमा उत्तरेला वैतरणा खाडीपर्यंत, दक्षिणेला सासुनवघर आणि वसईच्या खाडीपर्यंत, पूर्वेला पेलार, चिंचोटी गावांच्या सीमेपर्यंत आणि पश्चिमेला अर्नाळा सागरी किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

ही अधिसूचना राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने काढण्यात आली असून, यामुळे वसई-विरार परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या गावांचा पालिकेत समावेश झाल्यामुळे येथील नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्याची अपेक्षा आहे.

पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावे

आगाशी, नबाळे, कसराळी, कोपरड, निर्मळ, कोशिंबे, वाघोली, चिंचोटी, ससूनवघर, दहिसर, देवदळ, भुईगाव बु., नाळे, कामण, भुईगाव खु., रांजोडी, कनेर, गास, वटार, कोल्ही, गिरीज, चांदीप, मांडवी, कौलार बु., कशीद, कोपर, शिरसाड, कौलार खु., सालोली 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार