शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Vasai Virar: नायगावमध्ये नागरिकांमध्ये खड्डयांमूळे संताप, रास्ता रोको करत पाच तास केली वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:01 IST

Vasai Virar News: वसई विरारमध्ये रस्त्यांवरील जीवघेणा खड्डयांमूळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांसाठी राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही प्रशासन खड्डे बुजवत नाही. नायगावच्या जूचंद्र नाका येथे खड्डयांसाठी मंगळवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.

- मंगेश कराळे नालासोपारा - वसई विरारमध्ये रस्त्यांवरील जीवघेणा खड्डयांमूळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांसाठी राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही प्रशासन खड्डे बुजवत नाही. नायगावच्या जूचंद्र नाका येथे खड्डयांसाठी मंगळवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास सहा तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. लोक कामासाठी आठ-आठ किलोमीटर चालत कामावर गेले. मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

नायगावचे रस्ते दरवर्षी पावसात पूर्णपणे तुटतात. कारण प्रत्येक वेळी कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात. पहिल्याच पावसात रस्ते खचून खराब होतात.  नायगावच्या रस्त्यांवर अगणित खड्डे पडल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्डयांमूळे दररोज अपघात होत आहेत. नायगाव स्टेशन ते मुंबई अहमदाबाद महामार्ग पर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डयात गेला आहे. खड्यांमूळे रिक्षा चालवणे अवघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन खड्डे बुजवत नाही. खड्डयांयांमुळे दररोज रिक्षा खराब होत आहेत.  जितके पैसे कमावले तेवढे रिक्षाचा मेंटेनन्सला खर्च होतो, सीएनजीसाठी काशीमिऱ्याला जावे लागते, खड्डयांमूळे दिवस त्यातच जात असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. 

रिक्षा चालकांच्या विविध समस्यांबाबत नायगावच्या जूचंद्र नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सहाशेहून अधिक रिक्षाचालकांचा सहभाग असलेल्या रिक्षामालक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.  यावेळी सहायक आयुक्त मनाली शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संजय यादव, पोलीस अधिकारी उपस्थित होते. १५ दिवसांत खड्डे बुजवले जातील, असे मनाली शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार