शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वसई - विरारमध्ये प्लास्टिकबंदीचा फज्जा;  ८० टक्के बंदीचा पालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:53 IST

ठोस कारवाईची मागणी

विरार : राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, वसई - विरार शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असून मार्केटमध्ये याचा सर्रास वापर होताना दिसतो आहे. दरम्यान, पालिका ८० टक्के प्लास्टिक बंदीचा दावा करत असली तरी, हा दावा शहरात फोल ठरताना दिसतो आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्याची मागणी होत आहे.

राज्यात २३ जून २०१८ पासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली. त्यांनतर वसई - विरार महापालिकेने प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी दुकानदार, भाजीवाले, हॉटेल मालक, किरकोळ विक्र ेते, मच्छी-मटण विक्रेते यांच्याकडे पत्रकांचे वाटप केले होते. तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून प्लास्टिकबंदीचा नाराही दिला होता. शहरातील प्लास्टिकच्या अनेक कंपन्यांना सील ठोकून मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईमुळे भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्यांमध्ये भीती निर्माण झाल्याने त्यांनी देखील प्लास्टिकचा वापर टाळला होता.

प्लास्टिकबंदीच्या आदेशानंतर वर्षभर चाललेल्या या कारवाईमुळे शहर प्लास्टिकमुक्त झाले होते. मात्र, त्यांनतर पालिकेची कारवाई नरमल्याने पुन्हा प्लास्टिक वापरात आल्याचे शहरातील भाजीवाले, विक्रेते, फेरीवाल्याच्या गाड्यांवरून दिसते आहे. त्यामुळे वसई-विरारमधील संतोष भुवन, बिलालपाडा, नायगाव, पापडी भागातील विक्रेते, भाजीवाले, हॉटेलवाले उघडपणे प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू देताना दिसत आहेत. राज्यात जरी प्लास्टिकबंदी असली, तरी वसई- विरार महापालिकेमध्ये मात्र ती कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र