शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

वसईत त्रिशंकू ; पं. समितीची चावी भाजपकडे, जिल्हा परिषद गटात भाजपने अर्नाळ्यात उघडले खाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:18 IST

विधानसभा निवडणुकीत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र कमालीचे बॅकफूटवर जावे लागले आहे.

सुनील घरत पारोळ : विधानसभा निवडणुकीत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र कमालीचे बॅकफूटवर जावे लागले आहे. वसई पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या बविआला या वेळी मात्र केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे शिवसेनेनेदेखील चांगली लढत देत पं. समितीच्या ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपनेही स्वबळावर बविआ तसेच शिवसेनेला मजबूत टक्कर देऊन पंचायत समितीच्या २ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकूण ४ गटांपैकी २ गट बविआकडे, १ गट शिवसेनेकडे आणि १ गट भाजपने राखला. बुधवारच्या निवडणूक निकालानंतर वसई तालुक्यातील बहुजन विकास आघाडीच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीतील सत्तेसाठी बविआला भाजपची साथ घ्यावी लागणार आहे. मात्र, भाजप बविआला साथ देतो की शिवसेनेला ते पाहणे रंजक ठरणार आहे.बहुजन विकास आघाडीने झंझावाती प्रचार केला होता. मात्र, मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना नाकारले. सुरूवातीपासूनच शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांनी मताधिक्य घेऊन विजयाला गवसणी घातली. भाताणे गटात बविआच्या अरूण दामोदर पाटील यांना शिवसेना-श्रमजीवीच्या गणेश यशवंत उंबरसाडा यांनी पराभवाचा धक्का दिला. मेढे गणातून शिवसेना-श्रमजीवीच्या रूपेश वामन पाटील यांनी बविआच्या रूपेश वसंत पाटील यांना १ हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले. येथे बविआला नाराज कार्यकर्त्यांचा फटका बसला, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर भाताणे गणात शिवसेनेच्या आनंद पाटील यांनी बविआच्या प्रणय कासार यांना पराभवाचा धक्का दिला. भाताणे गटात असलेली बहुजन विकास आघाडीची राजकीय ताकद पाहता तेथे शिवसेना-श्रमजीवी संघटनेने मिळवलेले यश बविआच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडते.दुसरीकडे तिल्हेर गटात शिवसेना-श्रमजीवी संघटनेचे वर्चस्व असतानाही बहुजन विकास आघाडीचे कृष्णा माळी यांना केवळ १२५ मताधिक्याने विजय मिळाला, तर श्रमजीवी संघटनेचा मातब्बर चेहरा सुरेश रेंजड यांना पराभवाचा धक्का बसला. चंद्रपाडा गणातही बविआच्या शुभांगी तुंबडा यांनी शिवसेनेला नामोहरम करत विजय संपादन केला. तसेच तिल्हेर गणात भाजप-अपक्ष उमेदवारांच्या आव्हानानंतरही शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील यांनी विजय संपादन केला. त्यांनी बविआच्या दीक्षा दौलत पवार यांचा पराभव केला. वासळई गणात बविआच्या सविता पाटील यांनी तर कळंब गणात भाजपला आधीच बिनविरोध विजय मिळाला आहे. अर्नाळा किल्ला गणात भाजपच्या वनिता तांडेल तर अर्नाळा गणात बविआचे सुनिल अंकारे विजयी झाले.>पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी शिलेदारपालघर जिल्हा परिषदभाताणे - ५४ गणेश उंबरसाडा (शिवसेना )चंद्रपाडा- ५५ कृष्णा माळी (बविआ)अर्नाळा- ५६ आशा चव्हाण (भाजप )कळंब-५७ नीलिमा भोवर (बविआ) (बिनविरोध)>वसई पंचायत समितीभाताणे : १०७ आनंद पाटील (शिवसेना )मेढे : १०८ रुपेश पाटील (शिवसेना)तिल्हेर : १०९ अनुजा पाटील (शिवसेना)चंद्रपाडा : ११० शुभांगी तुंबडा (बविआ )अर्नाळा : १११ सुनील अंकारे (बविआ)अर्नाळा कि. : ११२ वनिता तांडेल (भाजप )कळंब : ११३ अनिता जाधव भाजप (बिनविरोध)वासळई : ११४ सविता पाटील (बविआ)>पंचायत समितीत भाजपचा आधारवसई पंचायत समितीच्या ८ गणांपैकी बविआ - ३, शिवसेना - ३ आणि भाजप - २ अशी स्थिती आहे. याआधी बहुजन विकास आघाडीच्या हातात सत्तेच्या चाव्या होत्या. आता मात्र बविआ आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना सत्तेसाठी भाजपचा आधार मिळणार असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र, भाजप नेमके कोणाच्या सोबत जाणे पसंत करतो ते पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद