शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वसईत त्रिशंकू ; पं. समितीची चावी भाजपकडे, जिल्हा परिषद गटात भाजपने अर्नाळ्यात उघडले खाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:18 IST

विधानसभा निवडणुकीत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र कमालीचे बॅकफूटवर जावे लागले आहे.

सुनील घरत पारोळ : विधानसभा निवडणुकीत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र कमालीचे बॅकफूटवर जावे लागले आहे. वसई पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या बविआला या वेळी मात्र केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे शिवसेनेनेदेखील चांगली लढत देत पं. समितीच्या ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपनेही स्वबळावर बविआ तसेच शिवसेनेला मजबूत टक्कर देऊन पंचायत समितीच्या २ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकूण ४ गटांपैकी २ गट बविआकडे, १ गट शिवसेनेकडे आणि १ गट भाजपने राखला. बुधवारच्या निवडणूक निकालानंतर वसई तालुक्यातील बहुजन विकास आघाडीच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीतील सत्तेसाठी बविआला भाजपची साथ घ्यावी लागणार आहे. मात्र, भाजप बविआला साथ देतो की शिवसेनेला ते पाहणे रंजक ठरणार आहे.बहुजन विकास आघाडीने झंझावाती प्रचार केला होता. मात्र, मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना नाकारले. सुरूवातीपासूनच शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांनी मताधिक्य घेऊन विजयाला गवसणी घातली. भाताणे गटात बविआच्या अरूण दामोदर पाटील यांना शिवसेना-श्रमजीवीच्या गणेश यशवंत उंबरसाडा यांनी पराभवाचा धक्का दिला. मेढे गणातून शिवसेना-श्रमजीवीच्या रूपेश वामन पाटील यांनी बविआच्या रूपेश वसंत पाटील यांना १ हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले. येथे बविआला नाराज कार्यकर्त्यांचा फटका बसला, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर भाताणे गणात शिवसेनेच्या आनंद पाटील यांनी बविआच्या प्रणय कासार यांना पराभवाचा धक्का दिला. भाताणे गटात असलेली बहुजन विकास आघाडीची राजकीय ताकद पाहता तेथे शिवसेना-श्रमजीवी संघटनेने मिळवलेले यश बविआच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडते.दुसरीकडे तिल्हेर गटात शिवसेना-श्रमजीवी संघटनेचे वर्चस्व असतानाही बहुजन विकास आघाडीचे कृष्णा माळी यांना केवळ १२५ मताधिक्याने विजय मिळाला, तर श्रमजीवी संघटनेचा मातब्बर चेहरा सुरेश रेंजड यांना पराभवाचा धक्का बसला. चंद्रपाडा गणातही बविआच्या शुभांगी तुंबडा यांनी शिवसेनेला नामोहरम करत विजय संपादन केला. तसेच तिल्हेर गणात भाजप-अपक्ष उमेदवारांच्या आव्हानानंतरही शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील यांनी विजय संपादन केला. त्यांनी बविआच्या दीक्षा दौलत पवार यांचा पराभव केला. वासळई गणात बविआच्या सविता पाटील यांनी तर कळंब गणात भाजपला आधीच बिनविरोध विजय मिळाला आहे. अर्नाळा किल्ला गणात भाजपच्या वनिता तांडेल तर अर्नाळा गणात बविआचे सुनिल अंकारे विजयी झाले.>पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी शिलेदारपालघर जिल्हा परिषदभाताणे - ५४ गणेश उंबरसाडा (शिवसेना )चंद्रपाडा- ५५ कृष्णा माळी (बविआ)अर्नाळा- ५६ आशा चव्हाण (भाजप )कळंब-५७ नीलिमा भोवर (बविआ) (बिनविरोध)>वसई पंचायत समितीभाताणे : १०७ आनंद पाटील (शिवसेना )मेढे : १०८ रुपेश पाटील (शिवसेना)तिल्हेर : १०९ अनुजा पाटील (शिवसेना)चंद्रपाडा : ११० शुभांगी तुंबडा (बविआ )अर्नाळा : १११ सुनील अंकारे (बविआ)अर्नाळा कि. : ११२ वनिता तांडेल (भाजप )कळंब : ११३ अनिता जाधव भाजप (बिनविरोध)वासळई : ११४ सविता पाटील (बविआ)>पंचायत समितीत भाजपचा आधारवसई पंचायत समितीच्या ८ गणांपैकी बविआ - ३, शिवसेना - ३ आणि भाजप - २ अशी स्थिती आहे. याआधी बहुजन विकास आघाडीच्या हातात सत्तेच्या चाव्या होत्या. आता मात्र बविआ आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना सत्तेसाठी भाजपचा आधार मिळणार असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र, भाजप नेमके कोणाच्या सोबत जाणे पसंत करतो ते पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद