शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:47 IST

विजेची होणार बचत, पहिलीच वास्तू, एकाच वेळी २३ बस उभ्या करण्याची क्षमता

- राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाला यावर्ष अखेरीस नवीन बस आगाराची वास्तू उपलब्ध होणार असून हे आगार सौर ऊर्जेवर चालणारी पालिकेची पहिली वास्तू ठरणार आहे. यामुळे विजेच्या खर्चात बचत होणार आहे.पालिकेने २००५ मध्ये स्थानिक परिवहन सेवा कंत्राटावर सुरू केल्यानंतर ती दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर बदलण्यात आली. सतत ती तोट्यात जात असल्याच्या कारणांमुळे बंद करून ही सेवा एनसीसी (नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) विथ व्हेरीएबल कॉस्ट संकल्पनेवर सुरू करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.परिवहन सेवा तोट्यात चालल्याने ती असमाधानकारक ठरल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सेवा सुरू करताना प्रशासनाने त्यासाठी आगाराची व्यवस्था करण्याचे करारात मान्य करूनही ते १२ वर्षापासून परिवहन विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आजही बसस्थानक व आगाराअभावी परिवहन सेवा कोलमडली आहे. एकूण ५८ पैकी सुमारे ३५ बसच प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत असून उर्वरित नादुरूस्त अवस्थेत आहेत. या बसची वेळेवर दुरूस्ती होत नसल्याने त्यांची दुरूस्ती कंत्राटावर शहराबाहेर केली जाते. त्यातही आवश्यक निधीसाठी स्थायीची परवानगी आवश्यक ठरत असल्याने दुरूस्तीला विलंब लागतो.या दुरूस्तीसाठी अव्वाच्यासव्वा रक्कम खर्ची घातली जात असतानाही बस सतत नादुरूस्त होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सेवेसाठी आगाराची व्यवस्था प्रशासनाने अद्याप केली नसली तरी त्यांच्या पार्किंगसाठी मीरा रोड येथील प्लेझंट पार्क परिसरातील आरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अनेक वर्षांपासून परिवहन विभाग आगाराच्या प्रतीक्षेत असताना यावर्ष अखेरीस नवीन दुमजली आगार उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. घोडबंदर येथील ट्रक टर्मिनलच्या १८ हजार चौरस मीटर आरक्षीत जागेत एक इमारत प्रशासकीय कारभारासाठी तर दुसरी इमारत कार्यशाळेसाठी बांधण्यात आली आहे. या आगारात एकावेळी २३ बस उभ्या करता येणार असून आगारातच बसच्या इंधनाची सोय होणार आहे.३६ कोटी येणार खर्च३६ कोटींहून अधिक खर्चाच्या या आगारात अद्ययावत संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार असून, त्यासाठी पालिकेला खासगी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वीज खरेदी करावी लागणार आहे.त्यात लाखोंचा निधी खर्ची घालावा लागणार असल्याने त्याला बगल देण्यासाठी हे आगार थेट सोलार ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून, त्यातून सुमारे २०० किलो वॅटहून अधिक वीजनिर्मिती होणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर