शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

विनामास्क फेरीवाले, नागरिकांमुळे वसई-विरारमध्ये दुसऱ्या लाटेची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 09:28 IST

दहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेसेवा, ठप्प असलेल्या बाजारपेठा आता सुरू झालेल्या आहेत. सर्व काही सुरू झाल्यानंतर कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण दिले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अजूनही वसई-विरारमधील भीती संपलेली नाही.

पारोळ : वसई-विरारमधील कोरोनाविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे भय संपवण्यासाठी निदान आणखी काही काळ वसईकरांना या महामारीविरोधात लढायचे आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आल्यानंतर आपण कोरोनाला हरवले, असा नागरिकांचा समज होणे हीच खरी बेफिकिरी ठरली आहे. दरम्यान, विनामास्क फेरीवाले आणि काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस वसई-विरार महापालिकेमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.दहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेसेवा, ठप्प असलेल्या बाजारपेठा आता सुरू झालेल्या आहेत. सर्व काही सुरू झाल्यानंतर कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण दिले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अजूनही वसई-विरारमधील भीती संपलेली नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या आर्थिक अडचणींना वसईकरांना सामोरे जावे लागले, त्या व्यथा पुन्हा कोरोनाच्या निमित्ताने उफाळून वर येतात की काय, अशी भीती हातावर पोट असलेल्या अनेकांच्या मनात उमटू लागली आहे. यात कोरोनाला आमंत्रण देण्यासाठी विनामास्क भटकणारे नागरिक आणि फेरीवाले यांचे योगदान मोठे असणार आहे.वसई-विरार पालिका परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाले कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याने तसेच नागरिकदेखील बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या सुळसुळाटावर लक्ष केंद्रित करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वसई पालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी ४० नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या ४३४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. पालिका हद्दीत पुन्हा परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. फेरीवाल्यांचा तसेच नागरिकांचा विनामास्क वावर असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. 

आर्थिक संबंधांमुळे कारवाई नाही?- काही पालिका अधिकारी-कर्मचारी आर्थिक संबंधांमुळे या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करीत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. - सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते. वसईत आठवडा बाजारांत होत असलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडत असलेला फज्जा यामुळे कोरोनाला आमंत्रणच मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार