शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

उधवा येथील नळपाणीपुरवठा बंद; गटाराच्या कामात तुटलेली लाइन चार महिने नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 3:39 AM

तालुक्यातील मैजे उधवा या गावी पाच वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेली नळपाणी पुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून गत चार महिन्यांपासून गटार बांधणीच्या कामामुळे पुरवठा करणाºया पाईपलाईन तुटल्याने नळपाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- सुरेश काटेतलासरी : तालुक्यातील मैजे उधवा या गावी पाच वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेली नळपाणी पुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून गत चार महिन्यांपासून गटार बांधणीच्या कामामुळे पुरवठा करणाºया पाईपलाईन तुटल्याने नळपाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील उधवा या गावी मोठी बाजारपेठेसह दोन महाविद्यालये, चार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, दोन बॅका, आठ खाजगी दवाखाने एक प्राथमिक आरोग्यकेंद्र असून गावाच्या हद्दीवर नगरहवेली येथे औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे उधवा गावाची लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील पाणी समस्या लक्षात घेता ४५ लाख रुपये खर्च करून जलस्वराज्य योजने अंतर्गत पाणी पुरवठा विभागाने पाच वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजना सुरु केली. मात्र गेल्या चार पाहिन्यापासून गटारीचे खोदकाम करताना पाण्याची पाईपलाईन तुटल्याने नळपाणी पुरवठा बंद झाला आहे.यासंदर्भात पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तातडीने दुरु स्त करू असे तोंडी सांगण्यात आले, पण आज चार महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरी पाण्याची पाईपलाईन दुरुस्त न केल्याने नळपाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.कधी विजेची थकबाकी, कधी कमी दाबाने वीज पुरवठा, कधी पाईप लाईन फुटणे तर कधी पाण्याच्या मोटारमध्ये बिघाड अश्या या दुष्टचक्र ात ही नळपाणी पुरवठा योजना अडकल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. या बाबत विभागाचे उप अभियंता आर. ऐ. पाटील यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Waterपाणी