शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

‘हितचिंतकां’च्या सल्ल्याने रेतीमाफिया झाले भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:37 AM

मान्सून पूर्व दीड महिन्याचा कालावधी हाती असल्याने बांधकाम व्यवसायाला तेजी आली आहे.

बोर्डी : रेतीमाफियाविरु द्ध लोकमतने बातम्यांच्या माध्यमातून आक्र मक पवित्रा घेतला आहे. तथापी या अवैध्य धंद्याशी निगडीत शासकीय विभागातील काही ‘हितचिंतकां’कडून या टोळ्यांना भूमिगत होण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे.मान्सून पूर्व दीड महिन्याचा कालावधी हाती असल्याने बांधकाम व्यवसायाला तेजी आली आहे. जिल्ह्यात रेती उत्खननास बंदी असल्याने या व्यवसायाला रेतीचा पुरवठा अवैद्यरित्या केला जातो. त्यामुळे समुद्रातून रेती उपसणाऱ्या माफीयांच्या धंद्याला तेजी आलेली होती. नेमक्या या काळात लोकमतने हा विषय लावून धरल्याने माफिया आणि बांधकाम ठेकेदारांचा मनस्ताप वाढला असून त्यांच्या गुप्त बैठकी होत आहेत. या पूर्वी रेतीच्या कारवाई बाबतचा कानोसा घेणारे खबरे महसूल कार्यालयाच्या परिसरात फिरताना दिसत होते. शिवाय डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्गावरील आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावच्या नाक्यावर माफीयांनी हेर पेरले होते. त्या मध्ये महसूल आणि पोलीस विभागातील काही कर्मचाºयांचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. परंतु रेती चोरीचा विषय तहसीलदारांनीही गांभीर्याने घेत भरारी पथकं आणि जिल्हास्तरावरून विशेष पथक बोलविण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे रेती माफीयांशी लागेबांधे ठेवणाºया शासकीय विभागातील काही ‘हितचिंतकां’मध्ये कमालीची अस्वस्थता असून या चोरट्यांच्या टोळ्यांना काही दिवस भूमिगत होण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त आहे.आमसभेत विचारणार जाब२७ एप्रिल रोजी आमसभा असून पर्यावरण प्रेमींकडून रेती चोरीचा विषय मांडताना लोकमतच्या बातमीची कात्रण लावण्यात येणार आहे.त्या मध्ये रेती चोर आणि त्यांना मदत करणाºया प्रशासनातील काही कर्मचाºयांच्या नावाचा उल्लेख केला जाण्याची शक्यता असल्याचे समजते.

टॅग्स :Crimeगुन्हाsandवाळू