शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

अनधिकृत कोळंबी प्रकल्प उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:24 AM

वसईतील भुईगाव येथे महसूल व पालिका प्रशासनाची कारवाई

वसई : भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृतपणे उभारलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त यांच्या आदेशाने बुधवारी निष्कासित करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली. शासनाने अनधिकृत प्रकल्पांवर कारवाईसाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यानंतर कोकण आयुक्त यांच्या आदेशानुसार तोडू कारवाईचे आदेश वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळीच या कारवाईस सुरुवात झाली. यामध्ये वसई महसूल विभागाचे प्रांत, तहसीलदार आणि वसई-विरार महापालिका प्रशासन यांचे उपायुक्त व नगररचना विभाग तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी २०० पेक्षा जास्त पोलीस ताफा, ३० बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशमन दल आदी मोठा फौजफाटा कारवाईच्या ठिकाणी सज्ज झाला होता. पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा, मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती यांनी कारवाईसाठी मागणी केली होती.पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वसईच्या पश्चिम पट्ट्यातील पाणथळ जागा व कांदळवने वाचावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मा. मुंबई उच्च न्यायालयात वनशक्ती संस्थेच्या माध्यमातून दाखल जनहित याचिकेवरील आदेशानुसार ही निष्कासन कारवाई होत आहे. या कारवाईचे आम्ही पर्यावरणप्रेमी म्हणून स्वागत करीत आहोत.- समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक, वसई