शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अनधिकृत शाळा मालक - चालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:40 IST

मुख्यमंत्र्यांनाही साकडे : विरार युवक काँग्रेसचे सीईओंना निवेदन

पारोळ : माहिती अधिकारात शिक्षण विभाग, पंचायत समिती वसई यांनी अनधिकृत शाळांची यादी दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १९० आणि एकट्या वसई तालुक्यात १५० अनधिकृत शाळा आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ जून २०१९ रोजीच्या पत्रान्वये या अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.

तसेच संबंधित अनधिकृत शाळांना नोटीस बजावून शाळेच्या ठिकाणी अनधिकृत शाळा असल्याचा बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत, असे आदेश देताना आणि या शाळांमधील मुलांना मान्यताप्राप्त शाळेत दाखल करा, असे बजावताना त्यामध्ये कुठेही संबंधितांवर फौजदारी कारवाईचा उल्लेख केलेला आढळत नाही. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने फक्त आदेश देण्याचे आणि वरवरची कारवाई करण्याचे करण्याचे सोपस्कार पार पाडल्याचा आरोप विरार युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहसीन शेख यांनी केला आहे.शेख यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे या अनधिकृत शाळा प्राथमिक स्तराच्या आहेत. परंतु, हे शाळा चालक आणि मालक या शाळा माध्यमिक शिक्षण देत आहेत. याबद्दल प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे शेख म्हणतात. बहुतेक अनधिकृत शाळा इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून आसन व्यवस्थेपेक्षा जास्त मुलांना एका वर्गात कोंबले जाते. इमारत बांधकामाची परवानगी न घेता शाळा इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये पडझड, गळती होत असते, तेथे साफसफाई, स्वच्छता राखली जात नाही. येण्या - जाण्यासाठीचे जिने अरूंद आहेत. अग्निशमनची व्यवस्था उपलब्ध नाही. शाळेलगतच बेकरी आहेत. शाळेतील मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नाही. शहरातील मुख्य रस्त्यालगत शाळेचे प्रवेशद्वार असून काही इमारतीतील जिने उतरले की सरळ मुले रस्त्यावर येतात, अशी भयाण वस्तुस्थिती असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वसईच्या गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आदेशांचे तत्काळ पालन करा तसेच अनधिकृत शाळेचे मालक - चालक तसेच त्यांना ना-हरकत दाखला देणाºया आणि त्यांना संरक्षण देणाºया विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे अधिकारी आणि संबंधितांवर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.शाळा सुरु होताना आणि सुटताना पालक व मुले सरळ रस्त्यावर येतात. यामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका आहे. शहरात वाहनांची संख्या बरीच आहे. एस.टी., महापालिकेची परिवहन सेवा, चार चाकी, दुचाकी वाहने, रिक्षा, मोठे ट्रक, पाण्याचे टँकर यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व प्रकारामुळे जर अपघात होऊन जीवितहानी झाली तर यास कुणाला जबाबदार धरणार असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाVasai Virarवसई विरार