शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

अनधिकृत शाळा मालक - चालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:40 IST

मुख्यमंत्र्यांनाही साकडे : विरार युवक काँग्रेसचे सीईओंना निवेदन

पारोळ : माहिती अधिकारात शिक्षण विभाग, पंचायत समिती वसई यांनी अनधिकृत शाळांची यादी दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १९० आणि एकट्या वसई तालुक्यात १५० अनधिकृत शाळा आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ जून २०१९ रोजीच्या पत्रान्वये या अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.

तसेच संबंधित अनधिकृत शाळांना नोटीस बजावून शाळेच्या ठिकाणी अनधिकृत शाळा असल्याचा बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत, असे आदेश देताना आणि या शाळांमधील मुलांना मान्यताप्राप्त शाळेत दाखल करा, असे बजावताना त्यामध्ये कुठेही संबंधितांवर फौजदारी कारवाईचा उल्लेख केलेला आढळत नाही. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने फक्त आदेश देण्याचे आणि वरवरची कारवाई करण्याचे करण्याचे सोपस्कार पार पाडल्याचा आरोप विरार युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहसीन शेख यांनी केला आहे.शेख यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे या अनधिकृत शाळा प्राथमिक स्तराच्या आहेत. परंतु, हे शाळा चालक आणि मालक या शाळा माध्यमिक शिक्षण देत आहेत. याबद्दल प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे शेख म्हणतात. बहुतेक अनधिकृत शाळा इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून आसन व्यवस्थेपेक्षा जास्त मुलांना एका वर्गात कोंबले जाते. इमारत बांधकामाची परवानगी न घेता शाळा इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये पडझड, गळती होत असते, तेथे साफसफाई, स्वच्छता राखली जात नाही. येण्या - जाण्यासाठीचे जिने अरूंद आहेत. अग्निशमनची व्यवस्था उपलब्ध नाही. शाळेलगतच बेकरी आहेत. शाळेतील मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नाही. शहरातील मुख्य रस्त्यालगत शाळेचे प्रवेशद्वार असून काही इमारतीतील जिने उतरले की सरळ मुले रस्त्यावर येतात, अशी भयाण वस्तुस्थिती असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वसईच्या गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आदेशांचे तत्काळ पालन करा तसेच अनधिकृत शाळेचे मालक - चालक तसेच त्यांना ना-हरकत दाखला देणाºया आणि त्यांना संरक्षण देणाºया विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे अधिकारी आणि संबंधितांवर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.शाळा सुरु होताना आणि सुटताना पालक व मुले सरळ रस्त्यावर येतात. यामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका आहे. शहरात वाहनांची संख्या बरीच आहे. एस.टी., महापालिकेची परिवहन सेवा, चार चाकी, दुचाकी वाहने, रिक्षा, मोठे ट्रक, पाण्याचे टँकर यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व प्रकारामुळे जर अपघात होऊन जीवितहानी झाली तर यास कुणाला जबाबदार धरणार असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाVasai Virarवसई विरार