शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अनधिकृत शाळा मालक - चालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:40 IST

मुख्यमंत्र्यांनाही साकडे : विरार युवक काँग्रेसचे सीईओंना निवेदन

पारोळ : माहिती अधिकारात शिक्षण विभाग, पंचायत समिती वसई यांनी अनधिकृत शाळांची यादी दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १९० आणि एकट्या वसई तालुक्यात १५० अनधिकृत शाळा आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ जून २०१९ रोजीच्या पत्रान्वये या अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.

तसेच संबंधित अनधिकृत शाळांना नोटीस बजावून शाळेच्या ठिकाणी अनधिकृत शाळा असल्याचा बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत, असे आदेश देताना आणि या शाळांमधील मुलांना मान्यताप्राप्त शाळेत दाखल करा, असे बजावताना त्यामध्ये कुठेही संबंधितांवर फौजदारी कारवाईचा उल्लेख केलेला आढळत नाही. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने फक्त आदेश देण्याचे आणि वरवरची कारवाई करण्याचे करण्याचे सोपस्कार पार पाडल्याचा आरोप विरार युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहसीन शेख यांनी केला आहे.शेख यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे या अनधिकृत शाळा प्राथमिक स्तराच्या आहेत. परंतु, हे शाळा चालक आणि मालक या शाळा माध्यमिक शिक्षण देत आहेत. याबद्दल प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे शेख म्हणतात. बहुतेक अनधिकृत शाळा इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून आसन व्यवस्थेपेक्षा जास्त मुलांना एका वर्गात कोंबले जाते. इमारत बांधकामाची परवानगी न घेता शाळा इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये पडझड, गळती होत असते, तेथे साफसफाई, स्वच्छता राखली जात नाही. येण्या - जाण्यासाठीचे जिने अरूंद आहेत. अग्निशमनची व्यवस्था उपलब्ध नाही. शाळेलगतच बेकरी आहेत. शाळेतील मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नाही. शहरातील मुख्य रस्त्यालगत शाळेचे प्रवेशद्वार असून काही इमारतीतील जिने उतरले की सरळ मुले रस्त्यावर येतात, अशी भयाण वस्तुस्थिती असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वसईच्या गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आदेशांचे तत्काळ पालन करा तसेच अनधिकृत शाळेचे मालक - चालक तसेच त्यांना ना-हरकत दाखला देणाºया आणि त्यांना संरक्षण देणाºया विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे अधिकारी आणि संबंधितांवर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.शाळा सुरु होताना आणि सुटताना पालक व मुले सरळ रस्त्यावर येतात. यामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका आहे. शहरात वाहनांची संख्या बरीच आहे. एस.टी., महापालिकेची परिवहन सेवा, चार चाकी, दुचाकी वाहने, रिक्षा, मोठे ट्रक, पाण्याचे टँकर यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व प्रकारामुळे जर अपघात होऊन जीवितहानी झाली तर यास कुणाला जबाबदार धरणार असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाVasai Virarवसई विरार