शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाड्यातील दोन शिक्षिकांचे बेमुदत उपोषण सुरू, प्रजासत्ताक दिनी अन्यायाला वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:55 AM

उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शिक्षणाधिकारी यांनी विलंबाने मंजुरी आदेश दिले, परंतु आजतागायत शालार्थ प्रणालीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही.

वाडा : वाड्यातील दोन शिक्षिकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनीच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दोन्ही शिक्षिका शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून नूतन बोरसे या मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषणास बसल्या आहेत, तर तृप्ती वेखंडे या वाडा येथे संस्थेच्या आवारात उपोषणास बसल्या आहेत.

वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या नूतन सीताराम बोरसे या उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यास व वेतन देण्यात दिरंगाई केल्याने मुख्याध्यापक, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी, तर तृप्ती तुकाराम वेखंडे या शिक्षक संचलित शिक्षण संस्थेने विनानोटीस सेवेतून कमी केल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू केले आहे.

बोरसे या २०११ पासून शाळेत कार्यरत असून शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन सेवासातत्य कालावधी एक वर्ष पूर्ण झालेला असताना मुख्याध्यापक, जिल्हा परिषद पालघरचे शिक्षणाधिकारी यांनी हेतुपुरस्सर ७ मे २०१७ रोजी त्यांची नियुक्ती रद्द केल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. तसेच या प्रकरणी बोरसे यांनी संस्थेसमोर चार दिवस उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने वैयक्तिक प्रस्ताव मंजुरीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शिक्षणाधिकारी यांनी विलंबाने मंजुरी आदेश दिले, परंतु आजतागायत शालार्थ प्रणालीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. तर तृप्ती वेखंडे या वाडा येथील शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेत २०१० ते एप्रिल २०१९ पर्यंत सहशिक्षिका पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांना विनानोटीस देऊन सेवेतून कमी केले आहे.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ठाणे यांच्या मंजुरीच्या अधीन राहून शिक्षण संचालित शिक्षण संस्थेच्या शालेय समन्वय समितीने त्यांना १ डिसेंबर २०११ ते ३० नोव्हेंबर २०१४ या कालावधीसाठी व त्यानंतर १ जुलै २०१३ ते ३० जून २०१६ या कालावधीसाठी पायाभूत पदावर पूर्णवेळ शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती केली होती.विनाअनुदानित पदावर विनावेतन कामतृप्ती वेखंडे या शिक्षिकेचा तीन वर्षे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संस्थेने त्यांच्याकडून विनाअनुदानित पदावर दोन वर्षे विनावेतन काम करून घेतले. या संदर्भात संस्थेचे सरचिटणीस भ. भा.जानेफळकर यांच्याशी संपर्क साधला असता मी बाहेरगावी असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली, तर शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता हा माझ्या अखत्यारीतला विषय नसून संस्थेच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले.

टॅग्स :palgharपालघर