शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पावसामुळे दोन घरांचे मोठे नुकसान तर एक जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:18 PM

कोणतीही जीवितहानी नाही : नुकसानग्रस्तांनी मागितली भरपाई

पालघर : आठवडा भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रविवारी पहाटे गोठणपूर गावामध्ये एक घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले तर अन्य दोन घरांवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरांचे मोठे नुकसान झाले असून एक ७० वर्षीय महिला जखमी झाली आहे.

पावसाने काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा जोरदार तडाखा द्यायला सुरु वात केली असून नदी-नाले, रस्ते भरून वाहू लागले होते. गोठणपुर येथील रहिवासी असलेले सुभाष सखाराम रिंजड हे शनिवारी आपल्या परिवारासह गौरी विसर्जनासाठी आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. विसर्जन करून घरी परतल्यावर सोसाट्याच्या वाºयासह आलेल्या पावसामुळे त्यांचे घर पूर्णत: कोसळून उध्वस्त झाले. ह्याच वेळी घरातले सर्व सदस्य बाहेर असल्या कारणाने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील मालमत्तेसह घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. याच दरम्यान रुपाली सखाराम रिंजड, रामदास गणपत रिंजड यांच्याही घरावर झाड कोसळल्याने रुपाली रिंजड या जखमी झाल्या.

ह्या घटनेची माहिती कळताच पालघर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने झाड हटवण्यासाठी मदत केली. या सर्व घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावेळी प्रशासनाने भरपाई देण्याची मागणी नुकसान झालेल्या कुटुंबीयांनी केली आहे. आता महसुल यंत्रणा या नुकसानीचे पंचनामे कधी व कसे करते यावरच सारे अवलंबुन असणार आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाकडे खबर दिली. मात्र अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयांकडून झाड कापण्यासाठी लागणारे यंत्र खराब झाल्याचे सांगून मिल मधून आम्ही घेऊन येतो थोडा उशीर लागेल असे त्यांनी सांगितले. जर नगरपालिका अत्यावश्यक सेवा कडे दुर्लक्ष करत असेल तर शहराचे काय होईल ? - दिनेश बाबर , नगरसेवक