शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आदिवासींची होणार उपासमार: मासिक धान्यकोट्यात ३० किलोची केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:27 AM

राज्यातील आदिवासी, गरीब, विधवा व वयोवृद्ध निराधार आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांचा समावेश नागरी पुरवठा विभागाने अन्न प्राधान्य योजनेत केल्यामुळे त्यांना

पालघर : राज्यातील आदिवासी, गरीब, विधवा व वयोवृद्ध निराधार आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांचा समावेश नागरी पुरवठा विभागाने अन्न प्राधान्य योजनेत केल्यामुळे त्यांना मिळणा-या दरमहा ३५ किलो ऐवजी अवघे पाच किलो धान्य मिळणार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली असून त्या विरोधात आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवीने मोर्चा काढला होता.पालघर जिल्ह्यातील १३ हजार ४५४, ठाणे जिल्ह्यातील १० हजार ३००, रायगड जिल्ह्यातील १४ हजार ३००, नाशिक जिल्ह्यातील ८ हजार, असे एकूण ४६ हजार ५४ लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेतून कमी केल्याने त्यांना दरमहा मिळणारे ३५ किलो धान्य आता अवघे ५ किलो मिळणार आहे. कारण त्यांचा अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्य यादीत समावेश करण्याचे आदेश नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढले आहेत. या परिपत्रकामुळे शिधापत्रिकेवर एक किंवा दोन लाभार्थी असलेल्या कुटुंबांवर अन्याय झालेला आहे. आज पालघर, ठाणे, नाशिक, इ. जिल्ह्यात भुकेमुळे व रोजगार नसल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. शासन एका बाजूला कातकरी समाजाचा विकास व्हावा ह्यासाठी विविध कार्यक्र म राबवित असताना दुसरीकडे त्यांचा अन्नधान्याचा मासिक कोटा कमी केला गेला आहे. श्रमजीवीचे उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, सुरेश रेंजड, उल्हास भानुशाली, अनिता धांगडा, विमल परेड इ. च्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.न्यायालयाचा अवमान-नागरी पुरवठा विभागाचे हे अन्याय परिपत्रक रद्द करावे, या विभागांतर्गत अन्न अधिकारासाठी ज्या योजना सुरू आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धान्य पुरवठा करावा, समाजातील दुर्बलांसाठीच्या योजना अंमलात न आणल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतले असल्याने पुरवठा विभागाने काढलेले हे परिपत्रक न्यायालयाचा अवमान करणारा आहे असे निवेदन देण्यात आले.