शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

आदिवासींचा विकास झालाय ठप्प!

By admin | Updated: February 22, 2017 05:50 IST

आदिवासींच्या विकासासाठी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली असली तरी निधी कागदोपत्री खर्च होणे

हुसेन मेमन / जव्हारआदिवासींच्या विकासासाठी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली असली तरी निधी कागदोपत्री खर्च होणे, भूमीपूजन व उद्घाटनाची जाहिरातबाजी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीची बॅनरबाजी वगळता विकासाची गंगा तालुक्यातील आदिवासींच्या पाड्यांपर्यत पोहचलेलीच नाही. जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा प्राप्त असून व पेसा कायदा लागू होऊन दोन वर्ष उलटली आहेत. मात्र या भागातील रोजगार निर्मिती, कुपोषण, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, दारिद्रय या समस्या जशाच्या तशाच आहेत. तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३५ हजार असून त्यात १०९ महसूल गावे तर २४८ पेक्षा अधिक आदिवासी लोकवस्ती असलेले खेडे-पाडे आहेत. तालुक्यात एकमेव नगरपरिषद आहे. जिल्हा परिषदेच्या २३८ शाळा असून, ६ कनिष्ठ तर १ वरिष्ठ महाविद्यालय व एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. मात्र, शिक्षणाच्या प्रसारावरील खर्चाचा आलेख दरवर्षी उंचावत असला तरी शिक्षणाच्या दर्जाचा आलेख जेमतेमच दिसतो. या भागातील जि.प. शाळा बहु शिक्षकी नसल्याने आर्ध्याधिक बंद आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकच शिक्षक अशी रचना असल्यामुळे शिक्षकांना शाळा बंद ठेऊन पाठ्यसभा, मासिक बैठक, शाळेचा माहिती अहवाल सादरीकरण या सारखी कामे करावी लागततात. त्यामुळे शाळा भरवायची कशी? विद्यार्थांना शिक्षण द्यायचे कधी? अशी अडचण शिक्षकांसमोर आहेत.आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडून आदिवासींच्या विकासासाठी वर्षाचे आर्थिक बजेट ५५० कोटीहून अधिक आहे. मात्र, येथील आदिवासींचा पाहिजे तसा विकास झालेला दिसत नाही. कारण या वार्षिक बजेटची व त्यातील विविध योजनांची माहिती अशिक्षितपणामुळे जवळपास ९० टक्के आदिवासींपर्यंत पोहचतच नाही. ३० शासकीय आश्रमशाळा या आदिवासी विभागामार्फत चालविल्या जातात. त्यातील शिक्षणाचा, सुविधांचा व आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. त्या केवळ भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. त्यामुळेच विद्यार्थांना शिक्षणासाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे करावी लागत आहेत.बाल विकास केंद्राचा उपयोग काय ?तालुक्यातील आदिवासी भागात कुपोषण, दारिद्रय, रोजगार, स्थलांतर, बेकारी, भूकबळी या सारखे गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत. तालुक्यात जव्हार-१, साखरशेत-२ असे बाल विकास प्रकल्प आहेत. तर राज्य शासनाने कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी बाल विकास केंद्र स्थापन करून सुद्धा मुलांचे वजन, उंची, वयाची वेळोवेळी तपासणी होत नाही. कुपोषण कमी करण्यासाठी वेळेत उपचार करून सरकारी रुग्णालयात मुलांना दाखल करून पालकांची बुडीत मजुरीही दिली जाते. मात्र, कोट्यवधीचा खर्च करूनही जव्हार तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.नव्वद मुले कुपोषित ; स्थलांतर सुरुचश्रेणी ३ व श्रेणी ४ या प्रकल्पात एकूण ९० च्या आसपास कमी वजनाची मुलं आहेत. शासनाकडून कोट्यवधीचा निधी वर्षाला खर्च होऊनही अपेक्षित परिणाम होतांना दिसत नाही. जव्हार तालुक्यातील नागरिकांचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे शिक्षण, रोजगार, कुपोषण, दारिद्रय, रस्ते या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना जिरायत शेती संपताच रोजगारासाठी डोक्यावर गाठोड बांधून पोटाची खळगी भरण्यासाठी ठाणे, कल्याण, डहाणू, घोडबंदर, भिवंडी या ठिकाणी स्थलांतर व्हावे लागत आहे. तिथे मिळेल ते काम करावे लागत आहे.