शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"वादळग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे संथगतीने, निष्क्रिय वसई तहसीलदारांची बदली करा", वडेट्टीवारांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:24 IST

Vasai News : पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

आशिष राणे 

वसई - मागील आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे वसई पश्‍चिम किनारपट्टीवरील शेतकरी, बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी, बागायतदारांचे नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहेत. संथगतीने सुरू असलेल्या वादळग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याकडे तालुका प्रशासन प्रमुख म्हणून तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे दुर्लक्ष होत असून निष्क्रिय तहसीलदार उज्ज्वला भगत यांची तत्काळ बदली करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी राज्याचे आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान याबाबत माहिती देताना, जिल्हा पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा फटका वसईच्या किनार्‍यालगतच्या गावागावात, घराघरात बसलेला आहे. वसईकरांना शासकीय दिलासा मिळणे अपेक्षित आहे. तर या सर्वांमध्ये तालुका प्रशासन प्रमुख तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे वसईच्या पश्‍चिम किनार्‍यालगतच्या गावातील वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

वसईतील गावागावात, घराघरात नुकसानीचे पंचनामे होत नसल्याबद्दल यावेळी समीर वर्तक यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अर्थातच मनमानी, बेफिकीर कार्यपद्धती असलेल्या तहसीलदार वसई यांची पंचनाम्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेवरून तातडीने वसईतून बदली करण्याची मागणी समीर वर्तक यांनी पालघर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. वसई तालुक्यात चक्रीवादळाने ज्या लोकांच्या घरांचे नुकसान, पडझड, किंवा शेती बागायतीचे काही नुकसान झाले असेल त्यांचे महसूलव कृषी  विभागाकडून तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी  हे सखोल चौकशी करून पंचनामे करत आहेत.

माझ्याकडे आजवर पंचनामा बाबतीत एकही तक्रार आलेली नाही तर तालुक्यातील एकही नुकसान ग्रस्त घटक वंचित राहणार नाही. याउलट शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल यावर माझा जास्त फोकस असेल. त्यामुळे माझ्या बदलीची व निष्क्रियतेची तक्रार जर कोणी करीत असेल तर याबाबत मी काय अधिक बोलणार शेवटी माझे कामच बोलेल.

- उज्वला भगत, वसई तहसीलदार 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसईVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरी