शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

"वादळग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे संथगतीने, निष्क्रिय वसई तहसीलदारांची बदली करा", वडेट्टीवारांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:24 IST

Vasai News : पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

आशिष राणे 

वसई - मागील आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे वसई पश्‍चिम किनारपट्टीवरील शेतकरी, बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी, बागायतदारांचे नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहेत. संथगतीने सुरू असलेल्या वादळग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याकडे तालुका प्रशासन प्रमुख म्हणून तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे दुर्लक्ष होत असून निष्क्रिय तहसीलदार उज्ज्वला भगत यांची तत्काळ बदली करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी राज्याचे आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान याबाबत माहिती देताना, जिल्हा पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा फटका वसईच्या किनार्‍यालगतच्या गावागावात, घराघरात बसलेला आहे. वसईकरांना शासकीय दिलासा मिळणे अपेक्षित आहे. तर या सर्वांमध्ये तालुका प्रशासन प्रमुख तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे वसईच्या पश्‍चिम किनार्‍यालगतच्या गावातील वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

वसईतील गावागावात, घराघरात नुकसानीचे पंचनामे होत नसल्याबद्दल यावेळी समीर वर्तक यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अर्थातच मनमानी, बेफिकीर कार्यपद्धती असलेल्या तहसीलदार वसई यांची पंचनाम्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेवरून तातडीने वसईतून बदली करण्याची मागणी समीर वर्तक यांनी पालघर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. वसई तालुक्यात चक्रीवादळाने ज्या लोकांच्या घरांचे नुकसान, पडझड, किंवा शेती बागायतीचे काही नुकसान झाले असेल त्यांचे महसूलव कृषी  विभागाकडून तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी  हे सखोल चौकशी करून पंचनामे करत आहेत.

माझ्याकडे आजवर पंचनामा बाबतीत एकही तक्रार आलेली नाही तर तालुक्यातील एकही नुकसान ग्रस्त घटक वंचित राहणार नाही. याउलट शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल यावर माझा जास्त फोकस असेल. त्यामुळे माझ्या बदलीची व निष्क्रियतेची तक्रार जर कोणी करीत असेल तर याबाबत मी काय अधिक बोलणार शेवटी माझे कामच बोलेल.

- उज्वला भगत, वसई तहसीलदार 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसईVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरी