शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"वादळग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे संथगतीने, निष्क्रिय वसई तहसीलदारांची बदली करा", वडेट्टीवारांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:24 IST

Vasai News : पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

आशिष राणे 

वसई - मागील आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे वसई पश्‍चिम किनारपट्टीवरील शेतकरी, बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी, बागायतदारांचे नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहेत. संथगतीने सुरू असलेल्या वादळग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याकडे तालुका प्रशासन प्रमुख म्हणून तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे दुर्लक्ष होत असून निष्क्रिय तहसीलदार उज्ज्वला भगत यांची तत्काळ बदली करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी राज्याचे आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान याबाबत माहिती देताना, जिल्हा पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा फटका वसईच्या किनार्‍यालगतच्या गावागावात, घराघरात बसलेला आहे. वसईकरांना शासकीय दिलासा मिळणे अपेक्षित आहे. तर या सर्वांमध्ये तालुका प्रशासन प्रमुख तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे वसईच्या पश्‍चिम किनार्‍यालगतच्या गावातील वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

वसईतील गावागावात, घराघरात नुकसानीचे पंचनामे होत नसल्याबद्दल यावेळी समीर वर्तक यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अर्थातच मनमानी, बेफिकीर कार्यपद्धती असलेल्या तहसीलदार वसई यांची पंचनाम्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेवरून तातडीने वसईतून बदली करण्याची मागणी समीर वर्तक यांनी पालघर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. वसई तालुक्यात चक्रीवादळाने ज्या लोकांच्या घरांचे नुकसान, पडझड, किंवा शेती बागायतीचे काही नुकसान झाले असेल त्यांचे महसूलव कृषी  विभागाकडून तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी  हे सखोल चौकशी करून पंचनामे करत आहेत.

माझ्याकडे आजवर पंचनामा बाबतीत एकही तक्रार आलेली नाही तर तालुक्यातील एकही नुकसान ग्रस्त घटक वंचित राहणार नाही. याउलट शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल यावर माझा जास्त फोकस असेल. त्यामुळे माझ्या बदलीची व निष्क्रियतेची तक्रार जर कोणी करीत असेल तर याबाबत मी काय अधिक बोलणार शेवटी माझे कामच बोलेल.

- उज्वला भगत, वसई तहसीलदार 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसईVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरी