शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

"वादळग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे संथगतीने, निष्क्रिय वसई तहसीलदारांची बदली करा", वडेट्टीवारांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:24 IST

Vasai News : पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

आशिष राणे 

वसई - मागील आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे वसई पश्‍चिम किनारपट्टीवरील शेतकरी, बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी, बागायतदारांचे नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहेत. संथगतीने सुरू असलेल्या वादळग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याकडे तालुका प्रशासन प्रमुख म्हणून तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे दुर्लक्ष होत असून निष्क्रिय तहसीलदार उज्ज्वला भगत यांची तत्काळ बदली करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी राज्याचे आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान याबाबत माहिती देताना, जिल्हा पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा फटका वसईच्या किनार्‍यालगतच्या गावागावात, घराघरात बसलेला आहे. वसईकरांना शासकीय दिलासा मिळणे अपेक्षित आहे. तर या सर्वांमध्ये तालुका प्रशासन प्रमुख तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे वसईच्या पश्‍चिम किनार्‍यालगतच्या गावातील वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

वसईतील गावागावात, घराघरात नुकसानीचे पंचनामे होत नसल्याबद्दल यावेळी समीर वर्तक यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अर्थातच मनमानी, बेफिकीर कार्यपद्धती असलेल्या तहसीलदार वसई यांची पंचनाम्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेवरून तातडीने वसईतून बदली करण्याची मागणी समीर वर्तक यांनी पालघर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. वसई तालुक्यात चक्रीवादळाने ज्या लोकांच्या घरांचे नुकसान, पडझड, किंवा शेती बागायतीचे काही नुकसान झाले असेल त्यांचे महसूलव कृषी  विभागाकडून तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी  हे सखोल चौकशी करून पंचनामे करत आहेत.

माझ्याकडे आजवर पंचनामा बाबतीत एकही तक्रार आलेली नाही तर तालुक्यातील एकही नुकसान ग्रस्त घटक वंचित राहणार नाही. याउलट शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल यावर माझा जास्त फोकस असेल. त्यामुळे माझ्या बदलीची व निष्क्रियतेची तक्रार जर कोणी करीत असेल तर याबाबत मी काय अधिक बोलणार शेवटी माझे कामच बोलेल.

- उज्वला भगत, वसई तहसीलदार 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसईVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरी