शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

रुग्णवाढीची भीती असूनही पर्यटनस्थळी गर्दी; सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे घराबाहेर पडले लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:44 PM

पालघरमधील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन : सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे घराबाहेर पडले लोक

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली असून प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील  डहाणू तालुक्यासह विविध समुद्र पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढता असून त्यांच्याकडून कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. यामुळे स्थानिकांकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मुंबई-ठाण्यासह अन्य ठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात अन्य ठिकाणांएवढी स्थिती नसली, तरी प्रशासनाने आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून डहाणू शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही धाडसत्र सुरू करून नियमांना बगल देणाऱ्यांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.शुक्रवारी शिवजयंती उत्सवाची सार्वजनिक सुट्टी आणि त्यानंतर वीकेण्ड आला. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने पर्यटकांचा ओघ वाढून चौपाट्यांवर गर्दी होताना दिसली. 

डहाणू तालुक्यातील चौपाट्यांना मुंबई, उपनगरे, ठाणे तसेच लगतच्या गुजरात आणि केंद्रशासित प्रदेशांतून येणाऱ्या पर्यटकांकडून प्राधान्य दिले जात आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या तुरळक आहे.

परंतु, मुंबईसह आणि उपनगरांत रुग्णांच्या संख्येतील वाढ अधिक आहे. त्यामुळे शासनाने कोविड नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे.  त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले असून विनामास्क नागरिकांवर २०० रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, परगावांतील पर्यटक तालुक्यातील बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, आगर, पारनाका इ. पर्यटन स्थळी येऊन धम्माल करीत आहेत.

मुंबईसह अन्य भागात काही दिवसांपासून रुग्ण वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे  अविवेकी पर्यटक प्रशासनाची डोकेदुखी ठरण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यंत्रणेला आदेश दिलेले असल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यटनस्थळी भेटी देऊन बेफिकीर पर्यटकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिक करीत आहेत. तसेच ग्रामीण भागातही धाडसत्र सुरू करून कारवाईची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :tourismपर्यटन