शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

लघुशंका मिसळून व्हिस्कीचा पेग बनव म्हटले म्हणून मित्राची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 12:53 IST

दारु पिताना पाणी संपल्यानंतर एका मित्राने दुस-याला आता स्वत:ची लघुशंका मिसळून पेग बनव असे गंमतीने म्हटले, त्यावरुन झालेल्या मोठया वादातून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली.

ठळक मुद्देशनिवारी रात्री गोडदेव नाका येथील इंडस्ट्रीयल भागात संदीप गवस, अच्युत चौबे (25) आणि आणखी तिघे जण दारु प्यायला बसले होते. अच्युत चौबेने आपला चारचौघांसमोर पाणउतारा केला अशी संदीप गवसची भावना झाली.

भाईंदर - दारु पिताना पाणी संपले म्हणून एका मित्राने दुस-याला आता स्वत:ची लघुशंका मिसळून पेग बनव असे गंमतीने म्हटले, त्यावरुन झालेल्या मोठया वादातून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात भाईंदरमध्ये घडली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकत्र बसून दारु पिताना मित्रांमध्ये आपसात झालेल्या वादातून ही हत्या झाली. नवघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून संदीप गवस (27) याला सोमवारी अटक केली आहे. संदीप पेशाने मजूर असून तो फरार होता. 

शनिवारी रात्री गोडदेव नाका येथील इंडस्ट्रीयल भागात संदीप गवस, अच्युत चौबे (25) आणि आणखी तिघे जण दारु प्यायला बसले होते. रविवारची पहाट होईपर्यंत त्यांची पार्टी रंगली होती. रात्री दोन वाजता गवसला आणखी एक पेग बनवायचा होता. पण व्हिस्कीमध्ये मिसळण्यासाठी पाणीच शिल्लक राहिले नव्हते. त्यावेळी चौबेने मस्करीमध्ये आता स्वत:ची लघुशंका मिसळून पेग बनव असे म्हटले. 

त्यावेळी अन्य तीन मित्रांनीही संदीप गवसची फिरकी घेतली. अच्युत चौबेने आपला चारचौघांसमोर पाणउतारा केला अशी संदीप गवसची भावना झाली. त्याला भंकस सहन झाली नाही. त्याने बाजूला पडलेले लाकूड उचलले आणि अच्युतच्या डोक्यात मारले. तिथे असलेल्या विवेक सिंहने मध्ये हस्तक्षेप करुन संदीपला रोखण्याचा प्रयत्न केला पण संदीपने त्याला सुद्धा मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने अच्युतच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. आपल्यावर प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात येताच संदीप आणि अन्य तिघे तिथून पळून गेले. चौबे रात्रभर तसाच तिथे रक्ताच्या थारोळयात पडून होता. दुस-या दिवशी सकाळी स्थानिकांना त्याचा मृतदेह सापडला.                                                                                                                                       

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून