शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कळंब बीचवर तीन तरुण बुडाले, एकाच मृत्यू तर दोघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:54 IST

Drowning Case : एकूणच या घटनेमुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.

नालासोपारा : कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटक तरुण मंगळवारी संध्याकाळी बुडाल्याची घटना घडली आहे. यातील दोन तरुणांचा जीव वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह अद्याप पर्यंत भेटला नसल्याची माहिती अर्नाळा पोलिसांनी दिली आहे. एकूणच या घटनेमुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील कळंब गावातील समुद्रकिनारी फिरण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी तीन तरुण आले होते. हे तिन्ही तरुण समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले. पण त्यावेळी असलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने ते तिघे खोल समुद्रात खेचले गेले होते. हे तरुण समुद्रत ओढले जात असल्याचे पाहून कळंब येथील अनिकेत नाईक व निखिल निजाई यांनी खोल समुद्रात जाऊन स्वताच्या जिवाची पर्वा न करता दोन तरुणांचा जीव वाचविण्यात यश मिळविले तर एक तरुण सापडला नाही. त्याचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नसून त्याचा मृतदेह सापडला नाही. वसईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०) आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) या दोघांना वाचविण्यात यश आले तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या हा मात्र पाण्यात वाहून गेला आहे. या बाबतचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेVasai Virarवसई विरारDeathमृत्यूPoliceपोलिस