शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

कळंब बीचवर तीन तरुण बुडाले, एकाच मृत्यू तर दोघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:54 IST

Drowning Case : एकूणच या घटनेमुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.

नालासोपारा : कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटक तरुण मंगळवारी संध्याकाळी बुडाल्याची घटना घडली आहे. यातील दोन तरुणांचा जीव वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह अद्याप पर्यंत भेटला नसल्याची माहिती अर्नाळा पोलिसांनी दिली आहे. एकूणच या घटनेमुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील कळंब गावातील समुद्रकिनारी फिरण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी तीन तरुण आले होते. हे तिन्ही तरुण समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले. पण त्यावेळी असलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने ते तिघे खोल समुद्रात खेचले गेले होते. हे तरुण समुद्रत ओढले जात असल्याचे पाहून कळंब येथील अनिकेत नाईक व निखिल निजाई यांनी खोल समुद्रात जाऊन स्वताच्या जिवाची पर्वा न करता दोन तरुणांचा जीव वाचविण्यात यश मिळविले तर एक तरुण सापडला नाही. त्याचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नसून त्याचा मृतदेह सापडला नाही. वसईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०) आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) या दोघांना वाचविण्यात यश आले तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या हा मात्र पाण्यात वाहून गेला आहे. या बाबतचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेVasai Virarवसई विरारDeathमृत्यूPoliceपोलिस