शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

डहाणूतील साडेतीनशे अंगणवाड्या नळजोडणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:45 IST

मुलांना शुद्ध पाणी मिळणे आवश्यक : उन्हाळ्यात होणार वणवण

अनिरुद्ध पाटील  लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : मार्च महिना सुरू होत नाही तोच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. आगामी तीन महिने  पाणीटंचाईचा प्रश्न अधिक भेडसावणार आहे. तालुक्यातील जवळपास साडेतीनशे अंगणवाडी केंद्रांना तर अद्याप नळजोडण्याच मिळालेल्या नसल्याने त्यांच्यावर येत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष बालके अंगणवाड्यांत येत नसली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणीचा मुद्दा चर्चेला आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या आतील बालकांना बालशिक्षणाचे धडे अंगणवाडी केंद्रातून दिले जातात. त्यांचा सर्वांगीण विकास साधताना, सर्व सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. केंद्राच्या इमारतीपासून आहार, पिण्याचे पाणी इ. मिळणे आवश्यक आहे. तालुक्यात डहाणू आणि कासा येथे दोन एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालये आहेत. त्याअंतर्गत मुख्य आणि मिनी अशा एकूण ४०८ अंगणवाड्या आहेत. सध्या अंगणवाडी केंद्रे सुरू असली, तरी लाभार्थी बालके प्रत्यक्ष केंद्रात येत नाहीत. आठवड्यातून एक दिवस लाभार्थ्यांच्या पालकांना केंद्रात बोलावून आठवड्याचा आहार दिला जातो. दरम्यान, तालुक्यातील बहुतेक अंगणवाडी केंद्रांत नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सोय अद्याप झालेली नाही. ४०८ पैकी ५९ अंगणवाडी केंद्रांना नळ पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. ११५ केंद्रांत हातपंप, १६० ठिकाणी बोअरवेल, ६० केंद्रांवर विहिरीद्वारे पाणीपुरवठा होतो. तर आजही ५१ केंद्रांची भिस्त सार्वजनिक नळ पाणीपुरवठ्यावर आहे. यापैकी ३८ केंद्रांवर पाणी साठवण टाकी आहे. तर ३७० केंद्रांवर पाण्याची टाकीही नाही.

कुपोषणाचा प्रश्न आजही गंभीरडहाणू, मोखाडा, तलासरी, जव्हार या आदिवासीबहुल तालुक्यांत आजही कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. कुपोषणाच्या भस्मासुराला दूर पळवायचे असल्यास प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर शुद्ध पाणीपुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.