शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

‘त्या’ इमारतींतील रहिवाशांना बळजबरीने बाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:13 IST

वसई, नालासोपारा, विरार मधील वास्तव : संक्रमण वसाहतींचा अभाव

विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाली असून महानगरपालिकेने जबरदस्ती घरं खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. अनेक रहिवाशांना पर्यायी सोय नसल्यामुळे अजूनही ते त्याच इमारतींमध्ये राहत आहेत.

दरवर्षी वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाºया धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. तीनुसार यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या वाढल्याचे दिसून येते. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत ७३५ धोकादायक इमारती आहेत यातल्या २७२ अतिधोकादायक आहेत धोकादायक व अन्य वर्गात मोडणाºया ४६३ इमारती आहेत. महापालिकेने रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. परंतु बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याकरीता ट्रान्झीट कॅम्पची सुविधा देखील नाही. धोकादायक इमारती दुरुस्त होईपर्यंत अथवा पुन्हा तयार होईपर्यंत राहण्यासाठी पर्याय नसलेल्या रहिवाशांना रहाण्यासाठी लागणारे ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे आश्वासन देत आहे, परंतु त्यासाठी ठोस पावले उचलत नाही. रहिवाशांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने त्यांना स्वखर्चाने घर घेणं परवडणार नाही. त्यातही आता शाळा सुरु होणार आहेत अशा वेळी त्यांना घर बदलणे शक्य होणार नाही. पालिकेकडे फक्त रात्र निवारा केंद्र आहेत पण ट्रान्झीट कॅम्पचे काय? रात्र निवारा केंद्रात इतकी मोठी संख्या राहू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे अश्वासन देत आहे परंतु त्याबाबतीत ठोस पावले उचलत नसल्याने यावर्षी देखील अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत.घरांचे भाडं वाढल्याने स्व खर्चाने घर घेण्या इतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने रहिवासी जीव मुठीत धरून त्याच इमारतींमध्ये राहत आहेत. रिहवाश्यांच्या जीवाला धोका असताना देखील महानगरपालिकेने मदत करण्यास नकार दिला आहे. तसेच रहिवाशांना इमारतींमधून काढण्यासाठी महानगरपालिके तर्फे पाणी कपात व वीज कपात देखील करण्यात येणार आहे. रिहवाश्यांनी इमारत सोडली तर बेघर होतील आण िनाहीच सोडली तर जीव जेईल अशी परिस्थिती असताना देखील पालिके तर्फे सक्ती दाखवण्यात येत आहे.

ट्रॅन्झीट कॅम्पची गरज : दरवर्षी हजारो लोकं बेघर होतात त्यांना पालिके तर्फे निवारा म्हणून ट्रान्झीट कॅम्पची गरज असते रात्र निवारा केंद्रात ६० ते 70 लोकं राहू शकतात पण कुटुंब असले तर त्यांना मोठी जागा लागते. यासाठी महानगरपालिकेने ट्रान्झीट कॅम्प उपलब्ध करणे गरजेचे आहे.

रहिवाशांना आपले घर स्वत: साकारावे लागेल. महापालिके तर्फे कसलीच मदत होणार नाही. आणि महापालिका आता सक्तीने इमारती खाली करण्याचा प्रयत्न करणार आहे. - दिलीप पालव, अग्निशमन विभाग अधिकारी

वसई- विरारमधील धोकादायक इमारती आणि संख्या

  • नवघर माणकिपूर 154
  • नालासोपारा पूर्व 156
  • नालासोपारा पश्चिम 92
  • वालीव 84
  • चंदनसार 77
  • आचोळे 60
  • वसई 52
  • बोळींज 25
  • पेल्हार 4
  • एकूण ७३५