शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ इमारतींतील रहिवाशांना बळजबरीने बाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:13 IST

वसई, नालासोपारा, विरार मधील वास्तव : संक्रमण वसाहतींचा अभाव

विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाली असून महानगरपालिकेने जबरदस्ती घरं खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. अनेक रहिवाशांना पर्यायी सोय नसल्यामुळे अजूनही ते त्याच इमारतींमध्ये राहत आहेत.

दरवर्षी वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाºया धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. तीनुसार यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या वाढल्याचे दिसून येते. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत ७३५ धोकादायक इमारती आहेत यातल्या २७२ अतिधोकादायक आहेत धोकादायक व अन्य वर्गात मोडणाºया ४६३ इमारती आहेत. महापालिकेने रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. परंतु बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याकरीता ट्रान्झीट कॅम्पची सुविधा देखील नाही. धोकादायक इमारती दुरुस्त होईपर्यंत अथवा पुन्हा तयार होईपर्यंत राहण्यासाठी पर्याय नसलेल्या रहिवाशांना रहाण्यासाठी लागणारे ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे आश्वासन देत आहे, परंतु त्यासाठी ठोस पावले उचलत नाही. रहिवाशांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने त्यांना स्वखर्चाने घर घेणं परवडणार नाही. त्यातही आता शाळा सुरु होणार आहेत अशा वेळी त्यांना घर बदलणे शक्य होणार नाही. पालिकेकडे फक्त रात्र निवारा केंद्र आहेत पण ट्रान्झीट कॅम्पचे काय? रात्र निवारा केंद्रात इतकी मोठी संख्या राहू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे अश्वासन देत आहे परंतु त्याबाबतीत ठोस पावले उचलत नसल्याने यावर्षी देखील अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत.घरांचे भाडं वाढल्याने स्व खर्चाने घर घेण्या इतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने रहिवासी जीव मुठीत धरून त्याच इमारतींमध्ये राहत आहेत. रिहवाश्यांच्या जीवाला धोका असताना देखील महानगरपालिकेने मदत करण्यास नकार दिला आहे. तसेच रहिवाशांना इमारतींमधून काढण्यासाठी महानगरपालिके तर्फे पाणी कपात व वीज कपात देखील करण्यात येणार आहे. रिहवाश्यांनी इमारत सोडली तर बेघर होतील आण िनाहीच सोडली तर जीव जेईल अशी परिस्थिती असताना देखील पालिके तर्फे सक्ती दाखवण्यात येत आहे.

ट्रॅन्झीट कॅम्पची गरज : दरवर्षी हजारो लोकं बेघर होतात त्यांना पालिके तर्फे निवारा म्हणून ट्रान्झीट कॅम्पची गरज असते रात्र निवारा केंद्रात ६० ते 70 लोकं राहू शकतात पण कुटुंब असले तर त्यांना मोठी जागा लागते. यासाठी महानगरपालिकेने ट्रान्झीट कॅम्प उपलब्ध करणे गरजेचे आहे.

रहिवाशांना आपले घर स्वत: साकारावे लागेल. महापालिके तर्फे कसलीच मदत होणार नाही. आणि महापालिका आता सक्तीने इमारती खाली करण्याचा प्रयत्न करणार आहे. - दिलीप पालव, अग्निशमन विभाग अधिकारी

वसई- विरारमधील धोकादायक इमारती आणि संख्या

  • नवघर माणकिपूर 154
  • नालासोपारा पूर्व 156
  • नालासोपारा पश्चिम 92
  • वालीव 84
  • चंदनसार 77
  • आचोळे 60
  • वसई 52
  • बोळींज 25
  • पेल्हार 4
  • एकूण ७३५