शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:48 IST

वाडा तालुक्यात १४ गाव-पाड्यांत टँकरने पाणी : विहिरींवर भांड्यांची रांग

वसंत भोईर/अशोक पाटीललोकमत न्यूज नेटवर्कवाडा : वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांत पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. पाणीटंचाई पाहता पंतप्रधानांच्या स्वप्नातील ‘हर घर नल से जल’ या योजनेसह अन्यही पाणीपुरवठा योजनांची लाखो रुपये खर्च करून वाड्यात कामे झाली. काही गावांत कामे अर्धवट, तर काही गावांत टाक्या उभारल्या आहेत. नळजोडण्याही दिल्या; मात्र या नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागते. अनेकांना विहिरीवर हंडाभर पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या तालुक्यातील १४ गाव-पाड्यांत तीव्र पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ, टोकरेपाडा, जांभूळपाडा, घोडसाखरे, दिवेपाडा, फणसपाडा, गवळीपाडा, तरसेपाडा, तसेच तुसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा, फणसपाडा, पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास, मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा, तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांत भीषण पाणीटंचाई आहे. येथील नागरिकांनाही टँकरच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत आहे. 

निधीचा उपयोग काय? वाडा तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांत जलजीवन योजनेंतर्गत  पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. या योजनांचा कालावधी संपला, तरी योजना पूर्ण झालेल्या नाहीत. काही योजनांची कामे झाली; मात्र ती निकृष्ट दर्जाची झाली. पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो खर्चूनही जर नशिबी पाणीटंचाईच असेल, तर खर्च झालेल्या निधीचा उपयोग काय? अशा शब्दांत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नळजोडण्या दाखवण्यासाठी जोडल्या; पण त्या नळात पाणी नाही. माती जाऊन बसली आहे. पावसात खड्ड्यातील घाण पाणी नळाला येण्याची शक्यता असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

वनविभागाकडे प्रस्ताव प्रलंबितओगदा ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यात ‘जलजीवन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. वनविभागाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. योजना अपूर्ण असलेल्या गाव-पाड्यांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे, अशी माहिती वाडा पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. डी. जाधव यांनी दिली. 

जलजीवन योजनेंतर्गत वाडा तालुक्यात करोडोंचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सागर पाटील, ग्रामस्थ

टॅग्स :Waterपाणी