शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:48 IST

वाडा तालुक्यात १४ गाव-पाड्यांत टँकरने पाणी : विहिरींवर भांड्यांची रांग

वसंत भोईर/अशोक पाटीललोकमत न्यूज नेटवर्कवाडा : वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांत पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. पाणीटंचाई पाहता पंतप्रधानांच्या स्वप्नातील ‘हर घर नल से जल’ या योजनेसह अन्यही पाणीपुरवठा योजनांची लाखो रुपये खर्च करून वाड्यात कामे झाली. काही गावांत कामे अर्धवट, तर काही गावांत टाक्या उभारल्या आहेत. नळजोडण्याही दिल्या; मात्र या नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागते. अनेकांना विहिरीवर हंडाभर पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या तालुक्यातील १४ गाव-पाड्यांत तीव्र पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ, टोकरेपाडा, जांभूळपाडा, घोडसाखरे, दिवेपाडा, फणसपाडा, गवळीपाडा, तरसेपाडा, तसेच तुसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा, फणसपाडा, पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास, मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा, तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांत भीषण पाणीटंचाई आहे. येथील नागरिकांनाही टँकरच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत आहे. 

निधीचा उपयोग काय? वाडा तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांत जलजीवन योजनेंतर्गत  पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. या योजनांचा कालावधी संपला, तरी योजना पूर्ण झालेल्या नाहीत. काही योजनांची कामे झाली; मात्र ती निकृष्ट दर्जाची झाली. पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो खर्चूनही जर नशिबी पाणीटंचाईच असेल, तर खर्च झालेल्या निधीचा उपयोग काय? अशा शब्दांत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नळजोडण्या दाखवण्यासाठी जोडल्या; पण त्या नळात पाणी नाही. माती जाऊन बसली आहे. पावसात खड्ड्यातील घाण पाणी नळाला येण्याची शक्यता असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

वनविभागाकडे प्रस्ताव प्रलंबितओगदा ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यात ‘जलजीवन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. वनविभागाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. योजना अपूर्ण असलेल्या गाव-पाड्यांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे, अशी माहिती वाडा पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. डी. जाधव यांनी दिली. 

जलजीवन योजनेंतर्गत वाडा तालुक्यात करोडोंचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सागर पाटील, ग्रामस्थ

टॅग्स :Waterपाणी