शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

विधवा, अपंग, निराधारांना ५ महिने अनुदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:11 IST

केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डहाणू  - केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयात गोर गरीब व निराधारांना शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत मिळणारे धान्य ही गेल्या पाच वर्षापासून मिळत नसल्याने विविध आजाराने त्रस्त तसेच अंध, अपंग, निराधारांचे हाल होत आहे. समाजातील दीनदुबळे, अपंग, मागासवर्गीय जाती, जमाती याबरोबरच समाजातील वयोवृध्द, अपंग निराधार, क्षयरोगी, अविवाहित, घटस्फोटीत महिला, विधवा, कुष्ठरोगी, अंध, गंभीर आजाराने पिडित तसेच एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून दर महा चारशे तसेच सहाशे रूपये अर्थसहाय्य दिले जाते. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात वरील योजनेअंतर्गत बारा हजार लाभार्थ्यांना दर महा त्यांच्या बँकखात्यात अनुदान जमा केले जाते. परंतु गेल्या दोन वर्षापासून राज्यशासनाकडून तालुक्याला मिळणारे अनुदान वेळेवर म्हणजेच दर महिन्याला मिळत नसल्याने गोर-गरीबांचे हाल होत आहे. डहाणू तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले दिवसी, भवाडी, मोडगाव, वंकास, महालक्ष्मी, इत्यादी बहुसंख्या दारिद्रयरेषेखालील लाभार्थी शासनाच्या या योजनेच्या अनुदानवरच उदरनिर्वाह करीत असल्याने गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यां बँक खात्यात पैसेच जमा न झाल्याने सुमारे ६० कि.मी. चा प्रवास करून हजारो लाभार्थ्यांवर दरमहा गंजाड येथील बँकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.दिवसेंदिव भडकणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले असतांनाच शासनाकडून या निराधारांना तुटपुंजे अनुदान मिळते ते ही दर महा वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे पैशाअभावी हाल होत आहे.यातील बहुसंख्य लाभार्थ तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भीक मागणारे स्थानिक आदिवासी आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाचाकिंवा इतर कुणाचाही आधार नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झालीआहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या