शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
2
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
3
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
4
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
5
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
6
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
7
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
8
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
9
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
10
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
11
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
12
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
13
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
14
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
15
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
16
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
17
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
18
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
19
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
20
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विधवा, अपंग, निराधारांना ५ महिने अनुदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:11 IST

केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डहाणू  - केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयात गोर गरीब व निराधारांना शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत मिळणारे धान्य ही गेल्या पाच वर्षापासून मिळत नसल्याने विविध आजाराने त्रस्त तसेच अंध, अपंग, निराधारांचे हाल होत आहे. समाजातील दीनदुबळे, अपंग, मागासवर्गीय जाती, जमाती याबरोबरच समाजातील वयोवृध्द, अपंग निराधार, क्षयरोगी, अविवाहित, घटस्फोटीत महिला, विधवा, कुष्ठरोगी, अंध, गंभीर आजाराने पिडित तसेच एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून दर महा चारशे तसेच सहाशे रूपये अर्थसहाय्य दिले जाते. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात वरील योजनेअंतर्गत बारा हजार लाभार्थ्यांना दर महा त्यांच्या बँकखात्यात अनुदान जमा केले जाते. परंतु गेल्या दोन वर्षापासून राज्यशासनाकडून तालुक्याला मिळणारे अनुदान वेळेवर म्हणजेच दर महिन्याला मिळत नसल्याने गोर-गरीबांचे हाल होत आहे. डहाणू तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले दिवसी, भवाडी, मोडगाव, वंकास, महालक्ष्मी, इत्यादी बहुसंख्या दारिद्रयरेषेखालील लाभार्थी शासनाच्या या योजनेच्या अनुदानवरच उदरनिर्वाह करीत असल्याने गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यां बँक खात्यात पैसेच जमा न झाल्याने सुमारे ६० कि.मी. चा प्रवास करून हजारो लाभार्थ्यांवर दरमहा गंजाड येथील बँकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.दिवसेंदिव भडकणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले असतांनाच शासनाकडून या निराधारांना तुटपुंजे अनुदान मिळते ते ही दर महा वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे पैशाअभावी हाल होत आहे.यातील बहुसंख्य लाभार्थ तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भीक मागणारे स्थानिक आदिवासी आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाचाकिंवा इतर कुणाचाही आधार नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झालीआहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या