शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूमधील २९ गावांत आठ दिवसांपासून पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 22:42 IST

चिंचणी, वानगाव, फिडर ब्रेकडाऊन; पाच दिवस वीज नाही, अब्रू चव्हाट्यावर

डहाणू : या तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीतील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या वानगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला चार-पाच दिवसांपासून वीज नसल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गावात आठ दिवसांपासून पिण्याची पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहे. तर वीज महावितरण कंपनीचा भोंगळ काराभारामुळे चिंचणी, वरोर, वानगाव हे तीन फिडर ब्रेकडाऊन झाल्याने येथील नागरिकांना चार दिवस अंधारात काढावे लागले आहे. त्यामुळे या परिसरातील लोक कमालीचे संतापले असून विजेवर अवलंबून असलेले डायमेकर्स, लघुउद्योजक, कारखानदार यांना हातावर हात देऊन बसण्याची वेळ आली आहे. परिणामी घरोघरी चालणाºया डायमेकिंग ग्रामोद्योगचे हजारो कुशल-अकुशल कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.डहाणूच्या चिंचणी, वरोर, वाणगाव, कनगाव, ओसार, बावडा, केतरवाडी, डहाणू, गुंगवाडा, तडियाबी इत्यादी गावात तसेच खेड्यापाड्यात विजेचा सातत्याने लपंडाव सुरू आहे. सोमवार (१० जून) रोजी या परिसरात पावसाची तुरळक सरी पडल्याचे निमित्तच झाले. रात्रभर लोकांना अंधारात काढावी लागली. दुसºया दिवशी वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वाटले. परंतु एक-दोन नव्हे सलग गुरुवार (१४ जून) पर्यंत या भागातील गाव पाडे कोळोखात बुडाली. बोईसर येथून वीज पुरवठा करणाºया १३२, १३३ के.व्ही.मध्ये सातत्याने बिघाड सुरू झाल्याने शिवाय, चिंचणी, वानगाव, वरोर फिडर अंतर्गत येणाºया गावातील फ्यूज, डिओ, झंपर, डिश जाणे, तारा तुटणे, ट्रान्सफार्मर फेल होणे, कंडक्टर उडणे, इत्यादी बिघाड वारंवार सुरू झाल्याने घराघरातील इर्न्व्हटर सोडा परंतु मोबाईल चार्ज होणे अवघड झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत झाला आहे.विजेचा लपंडाव सुरूचचिंचणी, वानगाव, वरोर हे तीन्ही फिडर ब्रेकडाऊन झाल्याने येथील महावितरणे कर्मचारी तसेच उपअभियंत्यांनी रात्रं-दिवस काम केल्याने शुक्रवार (१५ जून) रोजी प्रचंड विजेचा लपंडाव असला तरी वीजपुरवठा सुरू झाला आहे.विशेष म्हणजे या परिसरात तसेच वानगाव येथील साखरे धरणाजवळ वीजपुरवठा खंडित झाल्याने २९ गाव तसेच पाड्यावरील लोकांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. वानगावात वीज महावितरणच्या हलगर्जीने वीज पुरवठा सुरळीत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई