शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

समुद्रकिनारी सुरुच्या बागेतील शकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 23:49 IST

पर्यावरणाचा ऱ्हास ; आग लावली की लागली ?

वसई :- आशिष राणे,वसई 

वसई गावातील समुद्रकिनारी सुरूची बाग परिसरातील शेकडो सुरूच्या झाडांना अचानकपणे आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत शेकडो सुरूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी आली असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेलं नाही. मात्र, शेकडो झाडे जळून गेल्यानं पर्यावरणाचं मोठं नुकसान झाले आहे

अधिक माहितीनुसार गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास वसई गावातील पाचूबंदर -भास्कर आळी येथील मागील भागात वसई समुद्र किनारा असून याचठिकणी हजारो सुरूची झाडे डौलाने उभी असून हे ठिकाण म्हणजे हौशी पर्यटकांची पर्वणी आहे. मात्र, याच ठिकाणी अचानकपणे शेकडो झाडांना रात्रीच्या अंधारात आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या जवानांना समजल्यावर अग्निशमन व वसई पोलिसांनी घटनास्थळ गाठले. खास करून हा परिसर बहुतांश तिवरांची झाडे, चिखल व दलदलीच्या क्षेत्रात मोडत असल्याने समुद्रकिनाऱ्यावरील त्या सुरुच्या झाडापर्यंत पोहोचणं अग्निशमन दलाच्या जवानांना कठीण झाले होते. तरीही रात्री उशिरा पर्यंत तेथील आग विझविण्याचे वसई विरार महापालिका अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरूच होते. 

दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली किंवा कोणी मुद्दाम लावली का, याचा देखील शोध घेण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. परिणामी याठिकाणी दिवसभर व सायंकाळी ही पिकनिक किंवा काही तरुण व उपद्रव करणारी मंडळी मद्यपान सिगारेट मादक पदार्थांचे सेवन सर्रास करीत असतात. परंतु कदाचित कोणी मुदामून अशा प्रकारे झाडांना व तिवरांना इजा पोहचण्यासाठी काही गैर कृत्य तर केलं नाही ना, याचाही तपास होणं गरजेचं आहे. एकूणच वसई सुरुची बाग संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यामुळे शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर वसईतील पर्यावरण प्रेमींनी मोठी चिंता व्यक्त केली आहे 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआगenvironmentपर्यावरण