शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समुद्रकिनारी सुरुच्या बागेतील शकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 23:49 IST

पर्यावरणाचा ऱ्हास ; आग लावली की लागली ?

वसई :- आशिष राणे,वसई 

वसई गावातील समुद्रकिनारी सुरूची बाग परिसरातील शेकडो सुरूच्या झाडांना अचानकपणे आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत शेकडो सुरूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी आली असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेलं नाही. मात्र, शेकडो झाडे जळून गेल्यानं पर्यावरणाचं मोठं नुकसान झाले आहे

अधिक माहितीनुसार गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास वसई गावातील पाचूबंदर -भास्कर आळी येथील मागील भागात वसई समुद्र किनारा असून याचठिकणी हजारो सुरूची झाडे डौलाने उभी असून हे ठिकाण म्हणजे हौशी पर्यटकांची पर्वणी आहे. मात्र, याच ठिकाणी अचानकपणे शेकडो झाडांना रात्रीच्या अंधारात आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या जवानांना समजल्यावर अग्निशमन व वसई पोलिसांनी घटनास्थळ गाठले. खास करून हा परिसर बहुतांश तिवरांची झाडे, चिखल व दलदलीच्या क्षेत्रात मोडत असल्याने समुद्रकिनाऱ्यावरील त्या सुरुच्या झाडापर्यंत पोहोचणं अग्निशमन दलाच्या जवानांना कठीण झाले होते. तरीही रात्री उशिरा पर्यंत तेथील आग विझविण्याचे वसई विरार महापालिका अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरूच होते. 

दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली किंवा कोणी मुद्दाम लावली का, याचा देखील शोध घेण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. परिणामी याठिकाणी दिवसभर व सायंकाळी ही पिकनिक किंवा काही तरुण व उपद्रव करणारी मंडळी मद्यपान सिगारेट मादक पदार्थांचे सेवन सर्रास करीत असतात. परंतु कदाचित कोणी मुदामून अशा प्रकारे झाडांना व तिवरांना इजा पोहचण्यासाठी काही गैर कृत्य तर केलं नाही ना, याचाही तपास होणं गरजेचं आहे. एकूणच वसई सुरुची बाग संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यामुळे शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर वसईतील पर्यावरण प्रेमींनी मोठी चिंता व्यक्त केली आहे 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआगenvironmentपर्यावरण