शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला लागलेली आग दुसऱ्या दिवशी सुद्धा भडकलेलीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:41 IST

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंग मध्ये साचलेल्या कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग शुक्रवारी सायंकाळ पर्यंत विझलेली नाही . त्यामुळे उत्तन - डोंगरी परिसरातील लोकांची धुरा मुळे घुसमट सुरूच असल्याने लोक संतप्त आहेत . अग्निशमन दलाचे जवान गेल्या दोन दिवसां पासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा यश आलेले नाही .  

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती . अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडेंसह ४७ अधिकारी व जवान हे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते . ६ अग्निशामक बंब सह पाण्याचे ६ टँकर या कामी लागलेले आहेत . तर सुमारे ९० टँकर भरून पाणी मारून झाले असून आग मात्र विझलेली नाही . उलट वाऱ्याच्या जोरामुळे आग भडकत असल्याने आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक - दोन दिवस लागण्याची शक्यता पालिका उपायुक्त रवी पवार यांनी व्यक्त केली . कचऱ्याच्या ढिगात तयार होणाऱ्या मिथाईन गॅस मुळे आग लागली असावी किंवा कचरा वेचणारे वा असामाजिक तत्वांनी आग लावली असावी  अशी शक्यता उपायुक्तांनी वर्तवली आहे . 

दरम्यान आग व धुरा मुळे परिसरातील नागरिक संतप्त आहेत . गुरुवार पासून सर्वत्र घातक प्रदूषणकारी असा धूर पसरला असल्याने लोकांना शुद्ध हवा व श्वास घेणे अवघड झालेले आहे . शुक्रवारी काही नागरिकांनी ह्या प्रकरणी शासनासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींना तक्रारी करून पालिकेवर कारवाईची मागणी केली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, साधारण २०१३ साला पासून पालिकेने येथे प्रक्रिया न करताच टाकलेल्या कचऱ्याचे प्रमाण तब्बल १२ ते १३ लाख मेट्रिक टन इतके आहे . तर रोज आणखी ६० ते ८० टन कचरा साचत आहे . 

 तर उपायुक्तांच्या सांगण्यानुसार मात्र १० लाख मेट्रिक टन कचरा साचलेला असून त्यातील २ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासाठी पालिकेने ८ कोटी ९४ हजार रुपयांचा ठेका दिला आहे . त्यातील सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झालेली आहे . तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासना कडून निधीची मंजुरी मिळाल्यावर निविदा काढली जाणार आहे . तर रोज ५० ते ६० टन कचऱ्याची भर पडत आहे . 

टॅग्स :fireआग