शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला लागलेली आग दुसऱ्या दिवशी सुद्धा भडकलेलीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:41 IST

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंग मध्ये साचलेल्या कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग शुक्रवारी सायंकाळ पर्यंत विझलेली नाही . त्यामुळे उत्तन - डोंगरी परिसरातील लोकांची धुरा मुळे घुसमट सुरूच असल्याने लोक संतप्त आहेत . अग्निशमन दलाचे जवान गेल्या दोन दिवसां पासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा यश आलेले नाही .  

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती . अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडेंसह ४७ अधिकारी व जवान हे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते . ६ अग्निशामक बंब सह पाण्याचे ६ टँकर या कामी लागलेले आहेत . तर सुमारे ९० टँकर भरून पाणी मारून झाले असून आग मात्र विझलेली नाही . उलट वाऱ्याच्या जोरामुळे आग भडकत असल्याने आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक - दोन दिवस लागण्याची शक्यता पालिका उपायुक्त रवी पवार यांनी व्यक्त केली . कचऱ्याच्या ढिगात तयार होणाऱ्या मिथाईन गॅस मुळे आग लागली असावी किंवा कचरा वेचणारे वा असामाजिक तत्वांनी आग लावली असावी  अशी शक्यता उपायुक्तांनी वर्तवली आहे . 

दरम्यान आग व धुरा मुळे परिसरातील नागरिक संतप्त आहेत . गुरुवार पासून सर्वत्र घातक प्रदूषणकारी असा धूर पसरला असल्याने लोकांना शुद्ध हवा व श्वास घेणे अवघड झालेले आहे . शुक्रवारी काही नागरिकांनी ह्या प्रकरणी शासनासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींना तक्रारी करून पालिकेवर कारवाईची मागणी केली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, साधारण २०१३ साला पासून पालिकेने येथे प्रक्रिया न करताच टाकलेल्या कचऱ्याचे प्रमाण तब्बल १२ ते १३ लाख मेट्रिक टन इतके आहे . तर रोज आणखी ६० ते ८० टन कचरा साचत आहे . 

 तर उपायुक्तांच्या सांगण्यानुसार मात्र १० लाख मेट्रिक टन कचरा साचलेला असून त्यातील २ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासाठी पालिकेने ८ कोटी ९४ हजार रुपयांचा ठेका दिला आहे . त्यातील सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झालेली आहे . तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासना कडून निधीची मंजुरी मिळाल्यावर निविदा काढली जाणार आहे . तर रोज ५० ते ६० टन कचऱ्याची भर पडत आहे . 

टॅग्स :fireआग