शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला लागलेली आग दुसऱ्या दिवशी सुद्धा भडकलेलीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:41 IST

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंग मध्ये साचलेल्या कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग शुक्रवारी सायंकाळ पर्यंत विझलेली नाही . त्यामुळे उत्तन - डोंगरी परिसरातील लोकांची धुरा मुळे घुसमट सुरूच असल्याने लोक संतप्त आहेत . अग्निशमन दलाचे जवान गेल्या दोन दिवसां पासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा यश आलेले नाही .  

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती . अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडेंसह ४७ अधिकारी व जवान हे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते . ६ अग्निशामक बंब सह पाण्याचे ६ टँकर या कामी लागलेले आहेत . तर सुमारे ९० टँकर भरून पाणी मारून झाले असून आग मात्र विझलेली नाही . उलट वाऱ्याच्या जोरामुळे आग भडकत असल्याने आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक - दोन दिवस लागण्याची शक्यता पालिका उपायुक्त रवी पवार यांनी व्यक्त केली . कचऱ्याच्या ढिगात तयार होणाऱ्या मिथाईन गॅस मुळे आग लागली असावी किंवा कचरा वेचणारे वा असामाजिक तत्वांनी आग लावली असावी  अशी शक्यता उपायुक्तांनी वर्तवली आहे . 

दरम्यान आग व धुरा मुळे परिसरातील नागरिक संतप्त आहेत . गुरुवार पासून सर्वत्र घातक प्रदूषणकारी असा धूर पसरला असल्याने लोकांना शुद्ध हवा व श्वास घेणे अवघड झालेले आहे . शुक्रवारी काही नागरिकांनी ह्या प्रकरणी शासनासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींना तक्रारी करून पालिकेवर कारवाईची मागणी केली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, साधारण २०१३ साला पासून पालिकेने येथे प्रक्रिया न करताच टाकलेल्या कचऱ्याचे प्रमाण तब्बल १२ ते १३ लाख मेट्रिक टन इतके आहे . तर रोज आणखी ६० ते ८० टन कचरा साचत आहे . 

 तर उपायुक्तांच्या सांगण्यानुसार मात्र १० लाख मेट्रिक टन कचरा साचलेला असून त्यातील २ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासाठी पालिकेने ८ कोटी ९४ हजार रुपयांचा ठेका दिला आहे . त्यातील सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झालेली आहे . तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासना कडून निधीची मंजुरी मिळाल्यावर निविदा काढली जाणार आहे . तर रोज ५० ते ६० टन कचऱ्याची भर पडत आहे . 

टॅग्स :fireआग