शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला लागलेली आग दुसऱ्या दिवशी सुद्धा भडकलेलीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:41 IST

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंग मध्ये साचलेल्या कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग शुक्रवारी सायंकाळ पर्यंत विझलेली नाही . त्यामुळे उत्तन - डोंगरी परिसरातील लोकांची धुरा मुळे घुसमट सुरूच असल्याने लोक संतप्त आहेत . अग्निशमन दलाचे जवान गेल्या दोन दिवसां पासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा यश आलेले नाही .  

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती . अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडेंसह ४७ अधिकारी व जवान हे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते . ६ अग्निशामक बंब सह पाण्याचे ६ टँकर या कामी लागलेले आहेत . तर सुमारे ९० टँकर भरून पाणी मारून झाले असून आग मात्र विझलेली नाही . उलट वाऱ्याच्या जोरामुळे आग भडकत असल्याने आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक - दोन दिवस लागण्याची शक्यता पालिका उपायुक्त रवी पवार यांनी व्यक्त केली . कचऱ्याच्या ढिगात तयार होणाऱ्या मिथाईन गॅस मुळे आग लागली असावी किंवा कचरा वेचणारे वा असामाजिक तत्वांनी आग लावली असावी  अशी शक्यता उपायुक्तांनी वर्तवली आहे . 

दरम्यान आग व धुरा मुळे परिसरातील नागरिक संतप्त आहेत . गुरुवार पासून सर्वत्र घातक प्रदूषणकारी असा धूर पसरला असल्याने लोकांना शुद्ध हवा व श्वास घेणे अवघड झालेले आहे . शुक्रवारी काही नागरिकांनी ह्या प्रकरणी शासनासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींना तक्रारी करून पालिकेवर कारवाईची मागणी केली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, साधारण २०१३ साला पासून पालिकेने येथे प्रक्रिया न करताच टाकलेल्या कचऱ्याचे प्रमाण तब्बल १२ ते १३ लाख मेट्रिक टन इतके आहे . तर रोज आणखी ६० ते ८० टन कचरा साचत आहे . 

 तर उपायुक्तांच्या सांगण्यानुसार मात्र १० लाख मेट्रिक टन कचरा साचलेला असून त्यातील २ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासाठी पालिकेने ८ कोटी ९४ हजार रुपयांचा ठेका दिला आहे . त्यातील सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झालेली आहे . तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासना कडून निधीची मंजुरी मिळाल्यावर निविदा काढली जाणार आहे . तर रोज ५० ते ६० टन कचऱ्याची भर पडत आहे . 

टॅग्स :fireआग