शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 23:44 IST

७०० हेक्टरवर उत्पादन : शहापूर तालुक्यातील आशादायी चित्र

भातसानगर : हिवाळ्यात न साधलेली भाजीपाला पिके उशिरा का होईना मात्र ती सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा कल शहापूर तालुक्यात वाढत असल्याने भविष्यात सर्वत्र हेच चित्र पाहावयास मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यात हिवाळ्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिके घेण्यावर भर असतो. आज तालुक्यात भाजीपाला पिके घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून गावागावांतील शेतकरी शेतीकडे ओढले जात असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात तरी दिसत आहे. कालवे, नदी, नाले, ओढे यांच्यातील पाण्याचा उपयोग भाजीपाला पिकासाठी केला जात आहे.

जवळजवळ ७०० हेक्टरवर हे उत्पादन घेतले जाते. यामध्ये बहुतांश शेतकरी हे रासायनिक खतांच्या वापराऐवजी आता सेंद्रिय खतांचा वापर करूनच उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. आज आधुनिक पद्धतीने एसआरटी पद्धतीला जोड ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब करून काकडी, भेंडी, कारली, वांगी, मिरची, पपई, झेंडू, टोमॅटो, घोसाळी यासारखी उत्पादने घेतली जात आहेत.रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे उत्पादन वाढले, मात्र त्यामुळे अनेक आजार निर्माण तर झालेच, पण जमिनीचा पोत कमी होऊन ती नापीक बनत असल्याने शेतकरी आता सेंद्रिय पिकाकडे वळला असल्याचे दिसत आहे. या सेंद्रिय पिकांमुळे जमिनीचा पोत वाढतो, जमीन सुपीक बनते, भाजीपाल्याला भावही मिळतो, अधिक उत्पादनही घेता येते.चांगला भाजीपाला विकल्याचे मनाला समाधानही मिळत असल्याचे भास्कर पांडुरंग पाटील, डॉ. प्रकाश काठोले, जगन पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले.आज तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रियपद्धतीचा अवलंब करून उत्पादन घेत असल्याची आनंदाची बाब समोर येत आहे.- विलास झुंजारराव, कृषी अधिकारीआज आम्ही सेंद्रिय पद्धतीने जो भाजीपाला पिकवतो, त्याचे आम्हाला निश्चित समाधान आहे.- भास्कर पाटील, शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या