शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

तारापूर एमआयडीसी प्रदूषण : हरित लवादाच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 01:49 IST

Tarapur News : तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने २०१६ साली हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल केली होती,

पालघर : तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे कॅन्सर, किडनी रोगासारखे गंभीर आजार निर्माण झालेल्यांना विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते. चार वर्षांपासून आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडून केली जात नसल्याने याचिकाकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतल्यावर आरोग्य अधिकारी आणि संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरच उपाययोजना आखण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने २०१६ साली हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल केली होती. प्रदूषणामुळे झालेला दुष्परिणाम आणि करावयाची उपाययोजना याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी आयआयएम आणि आयआयटी अहमदाबाद, सीपीसीबी, एमपीसीबी यांची एक संयुक्त समिती गठीत केली होती. या समितीने तारापूर एमआयडीसी आणि परिसरातील १३ गावांचे सर्वेक्षण केल्यानंतर पर्यावरणाची झालेली अपरिमित हानी आणि मच्छीमारांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम यासंदर्भात अहवाल दाखल केला होता. प्रदूषणामुळे परिसरातील भूगर्भातील जलसाठेही प्रदूषणयुक्त झाल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने आरोग्य शिबिरे आयोजित करून बाधितांना विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, ही बाब याचिकाकर्त्यांनी सालीमठ यांच्या निदर्शनासआणून दिली.प्रदूषणामुळे १३ हजारांहून जास्त लोक विविध विकारांनी ग्रस्तजिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वेक्षणात २०१३ ते २०१६ सालादरम्यान दांडी, तारापूर, मुरबे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांंतील जवळपास १३ हजार १८९ रुग्ण कॅन्सर, त्वचारोग, किडनीच्या विकाराने ग्रस्त असल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश हरित लवादाने दिले असताना जिल्हा परिषदेकडून चार वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजूनही कार्यवाही होत नसल्याने याचिकाकर्ते संतोष मर्दे, नरेंद्र नाईक, कुंदन दवणे, निलेश घरत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सालीमठ यांची सोमवारी भेट घेऊन ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.प्रदूषित कारखान्यांवर कठोर कारवाई करा!, पालकमंत्र्यांचे निर्देशबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगिरी करायला हवी. तसेच झालेल्या दुर्घटनांना जबाबदार आणि जे कारखाने प्रदूषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाहीत, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.पालघर जिल्ह्यातील तारापूर-सारख्या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रिया केंद्र यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पालघरचे उपविभागीय अधिकारी डी. एस. नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.येत्या महिन्याभरात प्रदूषण पातळीत कमालीची घट आणण्याकरिता प्रयत्न करावेत, असे निर्देष पालघरचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी देऊन यंत्रणांनी समन्वयातून ही कामगिरी करताना ते प्रत्यक्षात दिसले पाहिजे, अशी सक्त ताकीद दिली आहे. यापूर्वी तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे जे विभाग जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिला असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी गांभीर्याने काम करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्याआहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणpalgharपालघर