शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे तारापूरच्या उद्योगांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:46 AM

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होते.

बोईसर - रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होते.सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण होऊन रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील मुख्य व अंर्तर्गत रस्त्यांवर पाणीच पाणी साचून रेल्वे व रस्ते वाहतूक प्रथम धिम्यागतीने होऊन हळू हळू ठप्प झाल्याने पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा परिणाम सर्व उद्योग व्यवसायांवर झाला असून गुरुवारी जरी काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ती सुरळीत होण्यास अवधी लागणार आहे.तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रात लहान -मोठे सुमारे साडेबाराशे कारखाने व सुमारे पन्नास बँका व इतर आर्थिक संस्था असून तेथे काम करणारे बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी व कामगार हे गुजरात महाराष्ट्र बॉर्डर ते डहाणू, वसई, विरार, मुंबई ते थेट ठाण्यापासून येत असतात. रेल्वेसेवा व मुंबई - अहमदाबाद महामार्ग ठप्प झाल्याने बोईसर मधील अनेक बँका, आर्थिक संस्था, शासकीय कार्यालये, विमा कार्यालयांमध्ये उपस्थिती फारच कमी होती त्यामुळे आर्थिक व्यवहारही थंड तर काही ठिकाणी ठप्प झाले होते.मंगळवार (दि. १० ) सकाळी सहा पासून बोईसरला रेल्वे सेवा विस्कळीत होऊन हळूहळू पूर्ण थांबली. ती बुधवारी २४ तासाने म्हणजे सकाळी 06.32 वाजता सुरु झाली.प्रथम विरारच्या दिशेने लोकल धावली तिही अत्यंत धीम्या गतीने तर संध्याकाळ पर्यंत नियमित वेळापत्रकीप्रमाणे (शेड्युल) रेल्वेगाड्या धावत नव्हत्या.मंगळवारी बोईसर रेल्वे स्थानकात बांद्रा - लखनऊ एक्सप्रेस व निजामुद्दीत - त्रिवेंद्रम एक्सप्रेस स्थानकांमध्ये थांबवुन ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :localलोकलnewsबातम्या