शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:59 IST

पांढरतारा पूल पाण्याखाली : भातलावणीला पावसाचा खो

पारोळ : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून बुधवारी पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीचे पाणी या भागातील शेतांमध्ये घुसल्याने या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भात लावणीच्या हंगामातच शेती पाण्याखाली गेल्याने दोन दिवसांपासून लावणीच्या कामांना ब्रेक दिला आहे. आठवडाभर पावसाने विश्रांती घेत बळीराजाची चिंता वाढवली होती. पाऊस सुरू होताच भात लावणीची कामे सुरू होतील, अशी आशा बळीराजाला असतानाच मंगळवारी रात्री पावसाची सुरुवात तर झाली मात्र, तीच संततधार बुधवार व गुरुवारीही कायम ठेवून शेतीची कामे बंद ठेवण्याची वेळ आली.

तानसा नदीवरील पांढरतारा पुलाची उंची कमी असल्याने नदीत पाण्याची पातळी वाढताच तो पाण्याखाली जात पलीकडे जाण्याच्या मार्ग बंद झाल्याने गावकरी यांची मोठी गैरसोय होते. कामगारांना कामाला व मुलांना शाळेला दांडी मारावी लागते. या पुलाची उंची वाढावी म्हणून अनेक वर्षांपासून मागणी होत असताना मात्र प्रशासन पुलाच्या उंचीबाबत दुर्लक्ष करत असल्याने बाधित गावातील नागरिकांमध्ये संताप आहे.

त्याचप्रमाणे वसई तालुक्यात पाचशे हेक्टरच्या आसपास जमिनीवर भात पीक घेतले जाते. पण दरवर्षी तानसा नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली जात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नुकसानभरपाईसाठी पंचनामे प्रशासन करते, पण मदत मात्र मिळत नाही. तसेच पीक विम्याबाबतही शेतकºयांमध्ये जनजागृती होत नसल्याने अनेक शेतकºयांना पीक विम्याचाही लाभ घेता येत नाही. विदर्भ, मराठवाडा येथील शेतकºयांना भरपाई मिळते मग वसईतील भात शेतकºयांना का मिळत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

विक्रमगडमध्ये जोरदार पाऊसविकमगड : आठवड्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारपासून विक्रमगड तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. सलग दोन दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग आवणीच्या कामात व्यस्त झाला आहे. पाण्याची गरज असल्याने आवणीला वेग आला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता काही शाळाना लवकरच सुट्टी देण्यात आली.

टॅग्स :DamधरणRainपाऊस