शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:59 IST

पांढरतारा पूल पाण्याखाली : भातलावणीला पावसाचा खो

पारोळ : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून बुधवारी पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीचे पाणी या भागातील शेतांमध्ये घुसल्याने या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भात लावणीच्या हंगामातच शेती पाण्याखाली गेल्याने दोन दिवसांपासून लावणीच्या कामांना ब्रेक दिला आहे. आठवडाभर पावसाने विश्रांती घेत बळीराजाची चिंता वाढवली होती. पाऊस सुरू होताच भात लावणीची कामे सुरू होतील, अशी आशा बळीराजाला असतानाच मंगळवारी रात्री पावसाची सुरुवात तर झाली मात्र, तीच संततधार बुधवार व गुरुवारीही कायम ठेवून शेतीची कामे बंद ठेवण्याची वेळ आली.

तानसा नदीवरील पांढरतारा पुलाची उंची कमी असल्याने नदीत पाण्याची पातळी वाढताच तो पाण्याखाली जात पलीकडे जाण्याच्या मार्ग बंद झाल्याने गावकरी यांची मोठी गैरसोय होते. कामगारांना कामाला व मुलांना शाळेला दांडी मारावी लागते. या पुलाची उंची वाढावी म्हणून अनेक वर्षांपासून मागणी होत असताना मात्र प्रशासन पुलाच्या उंचीबाबत दुर्लक्ष करत असल्याने बाधित गावातील नागरिकांमध्ये संताप आहे.

त्याचप्रमाणे वसई तालुक्यात पाचशे हेक्टरच्या आसपास जमिनीवर भात पीक घेतले जाते. पण दरवर्षी तानसा नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली जात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नुकसानभरपाईसाठी पंचनामे प्रशासन करते, पण मदत मात्र मिळत नाही. तसेच पीक विम्याबाबतही शेतकºयांमध्ये जनजागृती होत नसल्याने अनेक शेतकºयांना पीक विम्याचाही लाभ घेता येत नाही. विदर्भ, मराठवाडा येथील शेतकºयांना भरपाई मिळते मग वसईतील भात शेतकºयांना का मिळत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

विक्रमगडमध्ये जोरदार पाऊसविकमगड : आठवड्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारपासून विक्रमगड तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. सलग दोन दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग आवणीच्या कामात व्यस्त झाला आहे. पाण्याची गरज असल्याने आवणीला वेग आला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता काही शाळाना लवकरच सुट्टी देण्यात आली.

टॅग्स :DamधरणRainपाऊस