शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

टँंकर ठेकेदाराच्या हलगर्जीचा टंचाईग्रस्त गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 23:12 IST

प्रस्ताव देऊनही : अंमलबजावणी नाही,प्रशासनाचीही डोळेझाक ?

वाडा : जव्हार, मोखाडा तालुक्याप्रमाणेच वाडा तालुक्यातील पन्नासहून अधिक गाव, पाडे भीषण पाणी टंचाईने होरपळून निघाले आहेत. सध्या अवघ्या चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ही संख्या अपुरी पडत असल्याने ती वाढविण्याचा प्रस्ताव ठेकेदाराला पंधरा दिवसांपूर्वी देऊनही त्याने केलेल्या हलगर्जीपणामुळे येथील २० ते २२ गाव-पाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

वाडा तालुक्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन येथील गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी या तालुक्यातील ३५ गाव-पाड्यांवर चार टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र हे चार टँकरही अपुरे पडत असून अनेक पाड्यांवर तीन ते चार दिवसांनी टँकर जात आहे.वाडा तालुक्यातील नव्याने पाणी टंचाईग्रस्त असलेली चेंदवली, तोरणे, धावरपाडा, ओगदा ग्रामपंचायत अंतर्गत मुहुमाळ, ताडमाळ, करांजे गाव अंतर्गत येणारे खडकपाडा, धिंडेपाडा, पाटीलपाडा तसेच सापणे गावचे चार पाडे, फणसगांव (ओगदा) अशा अनेक पाड्यांवरील नागरिक गेल्या महिनाभरापासून भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या गांव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी मंजुरी दिली आहे.वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ (१६ मे) पालघर जिल्ह्याला टँकरने पाणी पुरवठा करणारे टँकर ठेकेदार यांना पत्र देऊन येथील टंचाई ग्रस्त गांव-पाड्यांवर दोन टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र गेले पंधरा दिवस होऊनही संबंधीत ठेकेदाराने टँकर सुरु न केल्यामुळे येथील पंधराहून अधिक टंचाईग्रस्त गांव-पाड्यातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर दीड ते दोन किलोमीटर अंतरावरु न पाणी येथील महिलांना आणावे लागत आहे.

पाण्याअभावी हागणदारी सुरु

वाडा तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील हगणदारी मुक्ततेसाठी शासनाने शंभर टक्के अनुदानाने हजारो लाभार्थ्यांना शौचालये बांधून दिली आहेत. मात्र पाणी टंचाईमुळे ही शौचालये बंद पडली असून पाण्याअभावी अनेकजण आज उघड्यावरच शौचास जात आहेत.दरम्यान देवळी, आपटी, गोऱ्हे तसेच वाडा शहरातील काही नगरांमधील काही नागरिक बैलगाडी, लहान टँकरने येणारे पाणी रोज ५० ते १०० रुपयांचे एक बॅरल (२०० लीटरची टाकी) याप्रमाणे विकत घेत आहेत. पाण्यासाठी हजारो रु पये मोजावे लागत असल्याने येथील नागरिक शासन व प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpalgharपालघर