शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

टँंकर ठेकेदाराच्या हलगर्जीचा टंचाईग्रस्त गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 23:12 IST

प्रस्ताव देऊनही : अंमलबजावणी नाही,प्रशासनाचीही डोळेझाक ?

वाडा : जव्हार, मोखाडा तालुक्याप्रमाणेच वाडा तालुक्यातील पन्नासहून अधिक गाव, पाडे भीषण पाणी टंचाईने होरपळून निघाले आहेत. सध्या अवघ्या चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ही संख्या अपुरी पडत असल्याने ती वाढविण्याचा प्रस्ताव ठेकेदाराला पंधरा दिवसांपूर्वी देऊनही त्याने केलेल्या हलगर्जीपणामुळे येथील २० ते २२ गाव-पाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

वाडा तालुक्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन येथील गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी या तालुक्यातील ३५ गाव-पाड्यांवर चार टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र हे चार टँकरही अपुरे पडत असून अनेक पाड्यांवर तीन ते चार दिवसांनी टँकर जात आहे.वाडा तालुक्यातील नव्याने पाणी टंचाईग्रस्त असलेली चेंदवली, तोरणे, धावरपाडा, ओगदा ग्रामपंचायत अंतर्गत मुहुमाळ, ताडमाळ, करांजे गाव अंतर्गत येणारे खडकपाडा, धिंडेपाडा, पाटीलपाडा तसेच सापणे गावचे चार पाडे, फणसगांव (ओगदा) अशा अनेक पाड्यांवरील नागरिक गेल्या महिनाभरापासून भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या गांव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी मंजुरी दिली आहे.वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ (१६ मे) पालघर जिल्ह्याला टँकरने पाणी पुरवठा करणारे टँकर ठेकेदार यांना पत्र देऊन येथील टंचाई ग्रस्त गांव-पाड्यांवर दोन टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र गेले पंधरा दिवस होऊनही संबंधीत ठेकेदाराने टँकर सुरु न केल्यामुळे येथील पंधराहून अधिक टंचाईग्रस्त गांव-पाड्यातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर दीड ते दोन किलोमीटर अंतरावरु न पाणी येथील महिलांना आणावे लागत आहे.

पाण्याअभावी हागणदारी सुरु

वाडा तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील हगणदारी मुक्ततेसाठी शासनाने शंभर टक्के अनुदानाने हजारो लाभार्थ्यांना शौचालये बांधून दिली आहेत. मात्र पाणी टंचाईमुळे ही शौचालये बंद पडली असून पाण्याअभावी अनेकजण आज उघड्यावरच शौचास जात आहेत.दरम्यान देवळी, आपटी, गोऱ्हे तसेच वाडा शहरातील काही नगरांमधील काही नागरिक बैलगाडी, लहान टँकरने येणारे पाणी रोज ५० ते १०० रुपयांचे एक बॅरल (२०० लीटरची टाकी) याप्रमाणे विकत घेत आहेत. पाण्यासाठी हजारो रु पये मोजावे लागत असल्याने येथील नागरिक शासन व प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpalgharपालघर