शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कावळे आश्रमशाळा अधीक्षिकेला निलंबित करा, आदिवासी विकास परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:35 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या.

जव्हार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या. मात्र, बकरी ईदची सुट्टी असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. यावेळेस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, पालघर जिल्ह्याचे जव्हार तालुका उपाध्यक्ष महेश घेगड यांनी त्यांची समस्या जाणून घेतली. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संघटनेने मंगळवारी सकाळी कार्यालयात ठिय्या मांडून अधीक्षक बाईला निलंबित करा अशी मागणी केली आहे.या आश्रमशाळेत सध्या अधीक्षिका बार्इंची मनमानी सुरू असल्याचे मुलींचे म्हणणे आहे. कपडे सुकण्यासाठी मुलींना दोरी बांधू न देणे, एकच कपडा सहा/सात दिवस वापरणे, सुटीच्या दिवशी देखील शाळेचा गणवेश घालावयास लावणे, कपडे सुकत टाकल्यास त्यांच्याकडून दंड घेणे तसेच त्यांना ५० ते १०० दंड बैठक काढायला सांगणे. शिक्षा म्हणून शौचालय साफ करणे, शाळा साफ करणे अशी शिक्षा केली जात असल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले. तसेच शिक्षा म्हणून त्यांचे कपडे धुणे, भांडी घासणे अशी शिक्षा देखील देत असल्याचे त्या मुली सांगतात. पाणी नसल्यास इमारतीच्या खाली जाऊ न देणे, विना आंघोळ ठेवणे अशी अमानवी वागणूक या मुलींना मिळते.मुलींना एकमेकांच्या रूमकडे जाऊ न देणे, तसेच घरी जाण्यासाठी सुटी मागितल्यावर पहिल्यांदा वर्ग शिक्षकांची सही आणायला लावून मगच सुटी दिली जाते, असे या मुलींचे म्हणणे आहे. मात्र, शनिवारी शाळा सुटली की वर्गशिक्षक लगेच घरी जातात, मग सही आणू न शकल्याने आाम्हाला सुटी मिळत नाही. आमच्या शाळेत दोन गट केले आहेत. आम्हाला वेगळा न्याय दिला जातो आणि ज्या मुली अधीक्षिका बार्इंचे सगळे काम करतात त्यांना शिक्षा न करणे अशी वागणूक देतात. त्यामुळे आम्ही जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाºयांची भेट घेण्यासाठी आलो. आणि संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत अधीक्षिका मॅडमची बदली होत नाही तोवर एकही मुलगी शाळेत जाणार नाही असेही या मुलींनी सांगितले.त्या मुली, चप्पल पायात न घालता आणि छत्री न घेता ऐन पावसाच्या दिवशी जव्हारला आल्या होत्या. एवढ्या वेदना दिल्या जातात की आज त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे. आम्ही त्यांच्या जिद्दीला दाद देतो. आमच्या आदिवासी मुलींनी किती अन्याय सहन करायचा, त्या अधीक्षिकेला जव्हार प्रकल्पातून हाकलून देऊन त्यांची बदली दुसरीकडे करावी यासाठी प्रकल्प अधिकारी यांना भेटणार आहोत.- दशरथ महाले, सचिव वाडाआदिवासी बहिणींना अशी अमानवी वागणूक देणाºया त्या अधिक्षिका यांची बदली करण्यात यावी यासाठी प्रकल्प अधिकारी यांना भेटणार आहोत.- लहू नडगे,तालुकाध्यक्षविक्र मगड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार