शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यफूल शेती ठरतेय शेतकऱ्यांना वरदान, पालघरमध्ये बळीराजाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 09:51 IST

पालघरमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत सूर्यफूल लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जव्हार, विक्रमगड, पालघर व डहाणू तालुक्यातील शेतकरी हा प्रयोग साधत आहेत. याकरिता ‘बायफ’ म्हणजेच भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशनकडून मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, शेतकऱ्यांना तीन महिन्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.

आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘बायफ’ विविध पद्धतीने काम करते व कार्यक्रम राबवते. याच कार्यक्रमांचा एक उपक्रम म्हणून २०० हून अधिक शेतकऱ्यांंना प्रत्येकी सात गुंठेेकरिता ५०० ग्रॅम बियाणे देऊन मार्गदर्शन केले. त्यात सूर्यफूल, मोहरी, करडई, तीळ यांसारख्या तेलबियांचे उत्पादन मुख्य वा मिश्र पिके घेण्यास सुरुवात केली आहे. भात कापणीनंतर शेतातील उरलेल्या ओलाव्यावर पिके घेण्यास मोठा वाव आहे. परिसंस्थेच्या, जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मोहरी, करडई आणि सूर्यफूल यांसारख्या तेलबिया, जमिनीत असलेल्या ओलाव्यावर पेरणी किंवा टोकन पद्धतीने भाजीपाला पिकांमध्ये आंतर पीक म्हणून घेतले जात आहे.

सूर्यफूल हे हिवाळी व उन्हाळी या दोन्ही हंगामात घेता येऊ शकते. कापणीपर्यंत थोड्या - अधिक प्रमाणात सिंचनाची आवश्यकता असते. आदिवासी शेतकऱ्यांनी रस घेऊन तेलबियांची काळजीपूर्वक लागवड केली. एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे कीड नियंत्रणात आणि शेतातील फायदेशीर कीटक वाढण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकावर होणारा खर्चही कमी होऊ शकतो. पालघर, जव्हार, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यातील शेतकरी या पद्धतीचा उपयोग करत आहेत. ‘महाराष्ट्र बायफ’चे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली, विनोद बोरसे, किरण भागडे, पंकज परदेशी, संतोष आगळे, नितीन भोये या ‘बायफ’च्या जव्हारमधील टीममार्फत अंमलबजावणी झाली.

२०० शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग२०० शेतकऱ्यांना सात गुंठे जागेत ५०० ग्रॅम बियाणे देण्यात आले. तीन महिन्यात उत्पन्न येत प्रत्येकी ५० किलोग्रॅम तेलबियांचे उत्पन्न निघाले. त्या तेलबियांतून प्रत्येक शेतकऱ्याने तेल काढल्यानंतर २५ किलो सूर्यफुलाचे तेल उत्पादित झाले. प्रत्येकी २०० रुपये किलोच्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाल्याने ‘बायफ’कडून एक चांगला प्रयोग यशस्वी झाला.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारFarmerशेतकरी