शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:21 IST

वाडा तालुक्यातील पाली आश्रमशाळेत पुराचे पाणी : विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले; अनेकांचे संसारही पाण्यात

वाडा : रविवारी झालेल्या महाप्रलयात पिंजाळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठी पाली येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळेतील इमारतीत पिंजाळी नदीचे पाणी शिरले. येथील तब्बल चारशे विद्यार्थ्यांचे कपड्यांसह शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. विद्यार्थ्यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने संभाव्य मोठा धोका टळला. या पुरामुळे नदीकाठच्या अनेकांचे संसार वाहून नेले. दरम्यान, येथील सर्वच वर्गखोल्यांमध्ये पुराच्या पाण्यातून आलेली घाण, गाळ, साप अडकले असल्याने हे वर्ग साफ होईपर्यंत येथील विद्यार्थ्यांना दहा दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची पहिली ते बारावीपर्यंतची शासकीय आश्रमशाळा वाडा तालुक्यातील पाली येथे आहे. या आश्रमशाळेत एकूण ६२१ विद्यार्थी, असून यामधील ४३० विद्यार्थी, विद्यार्थिनी हे निवासी आहेत. शनिवार (३ आॅगस्ट ) पासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळीच पिंजाळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. बघता, बघता नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याचा अंदाज घेऊन येथील शिक्षकांनी शनिवारी संध्याकाळीच विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले. मात्र या विद्यार्थ्यांच्या पेट्या, कपडे, वह्या, पुस्तके आणि अन्य शालेय शैक्षणिक साहित्य आश्रमशाळेतच अडकून राहिले. रविवारी सकाळी पिंजाळी नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यातून आश्रम शाळा देखील सुटली नाही. येथील विद्यार्थ्यांच्या बारा वर्ग आणि निवासी खोल्यांमध्ये दहा फुटांपर्यंत पाणी गेल्याने खोल्यांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, कपडे, गाद्या आदी साहित्य पुरात वाहून गेले. काही साहित्य वर्ग खोल्यांमध्ये अडकून पूर्णत: खराब झाले आहे. तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ९ निवासस्थानात पाणी गेल्याने त्यांच्याही साहित्याचे नुकसान झाले आहे.पिंजाळी नदीला पूर आल्यावर पाली आश्रमशाळेत पाणी जात असते. येथे नेहमीच उद्भवणारी परिस्थिती पाहता या आश्रम शाळेची नवीन इमारत नदीपात्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली आहे. मात्र येथे पाच वर्षांपासून बुधवली येथील आश्रमशाळा भरत आहे. तेथील इमारत धोकादायक झाल्यापासून साडेतीनशे विद्यार्थी पाली येथे स्थलांतरित केले आहे.पावसाचा जोर कमी तर पाण्याचा प्रश्न ऐरणीवरविरार : पुराचे पाणी ओसरले असले तरी वादळी वाºयामुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणांमध्ये बिघाड झाला असून वीजेचा लपंडाव सुरु आहे. तसेच सखल भागातील दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने दुकानदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर नागरिकांना आता वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणे आणि पाणी टंचाई सारख्या समस्या आहेत. सखल भागातील सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये देखील पाणी गेल्याने पालिकेचे पाणी वापरणे शक्य होत नाही. टाकी स्वच्छ होईपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पूरस्थितीमध्ये दुकानदारांचे व नागरिकांचे सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांचे अजूनच बिकट हाल झाले आहेत. नाले व गटारी तुडुंब भरले असल्याने पाण्याचा निचरा देखील धिम्या गतीने होत आहे. तसेच पूरस्थिती नंतर पाणी ओसरल्याने परिसरात कचरा व चिखल शिल्लक राहिला आहे.काही भागांमध्ये सफाईचे काम सुरु झालेले आहे तर सकल भागाचे पाणी पूर्णपणे ओसरले की लगेचच सफाई कर्मचारी कामाला सुरुवात करतील.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, मनपावसईतील चुळणे गाव अजूनही जलमयवसई : चार दिवस सतत पडणाºया मुसळधार पावसाने सोमवारी विश्रांती घेतली आणि बुधवारी पुन्हा थोडी थोडी रिपरीप सुरु केली असली तरी वसई शहराच्या अनेक भागांतील पाण्याचा निचरा अद्याप पूर्णपणे झालेला नाही. आजही अनेक रस्ते, गावे, पाडे आणि परिसर पाण्याखाली गेले आहेत. इमारतींच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सुध्दा पावसाचे पाणी गेल्याने रोगराईचे संकट आहे.शुक्रवारी रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे शनिवार पहाटेपासूनच शहरातील सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. शनिवारी संध्याकाळी पाण्याची पातळी वाढू लागली. सोमवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी सखल भागातील पाण्याचा अजूनही पाहिजे तसा निचरा झालेला नाही. शहराच्या अनेक भागातील सोसायट्यांमध्ये अद्यापही पाणी साचून आहे.त्यातच मीटर बॉक्सच पाण्यात असल्याने शनिवार रात्रीपासून या परिसरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर काही भागात अजूनही सुरक्षेअभावी वीज देण्यात आलेली नाही. वसई, विरार, नालासोपारा, नायगाव पूर्व - पश्चिम, पश्चिम पट्टीत तर सागरी किनाºयावर बहुतांश घरांची पडझड झाली आहे. तर विरारच्या विराट नगर, मयेकर वाडी, चाणक्य चौक या परिसरांतील वीजवाहक तारातुटल्याने नागरिकांना विजेपासून वंचित राहावे लागत आहे. घरातील फर्निचरसह अनेक मौल्यवान सामानांचे नुकसान झाले आहे.सोसायट्यांच्या आवारात पाणी गेल्याने गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांना गाड्या ढकलत गॅरेजपर्यंत न्याव्या लागल्या. मात्र गॅरेजमध्येही जागा नसल्याने गाड्या रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण