शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर पडणार ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:59 IST

भार्इंदर पालिकेत बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठीच प्रस्ताव सादर

भाईंदर : महासभेत सत्ताधारी भाजपाने शहरात ७० मीटर म्हणजेच सुमारे २४ मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधण्यास मंजुरी दिली. यामुळे बिल्डर लॉबी व बांधकाम क्षेत्रातील राजकारण्यांचा बक्कळ फायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने मात्र यास विरोध केला.आधीच सुविधांचा बोजवारा उडाला असून त्यात उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर प्रचंड ताण येईल, अशी भूमिका विरोधी पक्षाने मांडली.महापौर डिम्पल मेहता यांनी मीरा-भार्इंदरमध्ये ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना परवानगी देण्याचा विषय आणला होता. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिलेल्या गोषवाऱ्यात एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांसाठी चार अतिरिक्त चटईक्षेत्र, परवडणाºया घरयोजनेसाठी तीन चटईक्षेत्र, तर म्हाडा व बीएसयूपी गृहसंकुलांसाठी प्रत्येकी अडीच चटईक्षेत्र अतिरिक्त दिले जात असल्याने उंच इमारती बांधणे अनिवार्य आहे. त्यामुळे खाजगी विकासकांकडून उंच इमारतींच्या परवानगीसाठी मागणी होत असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.सध्या अग्निशमन विभागाकडून ४५ मीटरपर्यंत (१५ मजले) व अतिरिक्त चटर्ईक्षेत्र असलेल्या ७० मीटरपर्यंत (२४ मजले) उंचीच्या इमारतींना नाहरकत दाखले दिले जात आहेत. इमारतीमध्येच पार्किंगसाठी मजले सोडावे लागत असल्याने इमारतीची उंची वाढते. त्यामुळे ४५, ७० मीटर व त्यापेक्षा जास्त उंची वाढवणे आवश्यक ठरते, असा तर्क आयुक्तांनी मांडला. त्या अनुषंगाने ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना मंजुरी देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करून कमिटी स्थापन करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आणला होता.बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी अतिरिक्त चटईक्षेत्र देऊन म्हाडा व एमएमआरडीएने शहराची वाट लावली, असा आरोप काँग्रेसचे अनिल सावंत यांनी केला. न्यू म्हाडा वसाहत आदी भागातील वाहतूककोंडीवरून होणाºया मारहाणीचा दाखला दिला. टीडीआरमुळे आधीच शहरात काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे. अग्निशमन दलाकडे आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा नाही, असे ते म्हणाले. घनकचºयाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सांडपाणीव्यवस्थेचा थांगपत्ता नाही. पालिकेच्या शाळा आपण धड चालवू शकत नाही, म्हणून खाजगी संस्थांना देण्याचे ठराव करत आहोत. पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये आजही सुविधा देऊ शकलो नाही.पाण्यासाठी दुसºयांवर अवलंबून राहावे लागत असून नागरिकांना पुरेसे पाणीही मिळत नाही. परिवहनसेवा कोलमडलेली आहे. शहराला वाचवायचे असेल तर उंच इमारतींचा प्रस्ताव मागे घ्या, अशी विनंती महापौरांना केली.आयुक्त म्हणतात सर्वकाही चांगले आहेआयुक्त बालाजी खतगावकर यांनी मात्र शहरात रस्ते चांगले आहेत, पाणी पुरेसे आहे, सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत गटार योजना चांगली आहे, असे दावे केले.तर, भाजपाचे प्रशांत दळवी यांनी ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना मंजुरी देण्याचा ठराव मांडला असता भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी त्यास पाठिंबा दिला. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडbhayandarभाइंदर