शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर पडणार ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:59 IST

भार्इंदर पालिकेत बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठीच प्रस्ताव सादर

भाईंदर : महासभेत सत्ताधारी भाजपाने शहरात ७० मीटर म्हणजेच सुमारे २४ मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधण्यास मंजुरी दिली. यामुळे बिल्डर लॉबी व बांधकाम क्षेत्रातील राजकारण्यांचा बक्कळ फायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने मात्र यास विरोध केला.आधीच सुविधांचा बोजवारा उडाला असून त्यात उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर प्रचंड ताण येईल, अशी भूमिका विरोधी पक्षाने मांडली.महापौर डिम्पल मेहता यांनी मीरा-भार्इंदरमध्ये ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना परवानगी देण्याचा विषय आणला होता. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिलेल्या गोषवाऱ्यात एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांसाठी चार अतिरिक्त चटईक्षेत्र, परवडणाºया घरयोजनेसाठी तीन चटईक्षेत्र, तर म्हाडा व बीएसयूपी गृहसंकुलांसाठी प्रत्येकी अडीच चटईक्षेत्र अतिरिक्त दिले जात असल्याने उंच इमारती बांधणे अनिवार्य आहे. त्यामुळे खाजगी विकासकांकडून उंच इमारतींच्या परवानगीसाठी मागणी होत असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.सध्या अग्निशमन विभागाकडून ४५ मीटरपर्यंत (१५ मजले) व अतिरिक्त चटर्ईक्षेत्र असलेल्या ७० मीटरपर्यंत (२४ मजले) उंचीच्या इमारतींना नाहरकत दाखले दिले जात आहेत. इमारतीमध्येच पार्किंगसाठी मजले सोडावे लागत असल्याने इमारतीची उंची वाढते. त्यामुळे ४५, ७० मीटर व त्यापेक्षा जास्त उंची वाढवणे आवश्यक ठरते, असा तर्क आयुक्तांनी मांडला. त्या अनुषंगाने ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना मंजुरी देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करून कमिटी स्थापन करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आणला होता.बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी अतिरिक्त चटईक्षेत्र देऊन म्हाडा व एमएमआरडीएने शहराची वाट लावली, असा आरोप काँग्रेसचे अनिल सावंत यांनी केला. न्यू म्हाडा वसाहत आदी भागातील वाहतूककोंडीवरून होणाºया मारहाणीचा दाखला दिला. टीडीआरमुळे आधीच शहरात काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे. अग्निशमन दलाकडे आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा नाही, असे ते म्हणाले. घनकचºयाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सांडपाणीव्यवस्थेचा थांगपत्ता नाही. पालिकेच्या शाळा आपण धड चालवू शकत नाही, म्हणून खाजगी संस्थांना देण्याचे ठराव करत आहोत. पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये आजही सुविधा देऊ शकलो नाही.पाण्यासाठी दुसºयांवर अवलंबून राहावे लागत असून नागरिकांना पुरेसे पाणीही मिळत नाही. परिवहनसेवा कोलमडलेली आहे. शहराला वाचवायचे असेल तर उंच इमारतींचा प्रस्ताव मागे घ्या, अशी विनंती महापौरांना केली.आयुक्त म्हणतात सर्वकाही चांगले आहेआयुक्त बालाजी खतगावकर यांनी मात्र शहरात रस्ते चांगले आहेत, पाणी पुरेसे आहे, सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत गटार योजना चांगली आहे, असे दावे केले.तर, भाजपाचे प्रशांत दळवी यांनी ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना मंजुरी देण्याचा ठराव मांडला असता भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी त्यास पाठिंबा दिला. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडbhayandarभाइंदर