शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बंधा-यातून वाया जाणारे पाणी वेळीच अडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:47 AM

वाडा तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले असून या पाच नद्यांवर जिल्हा परिषदेने पाणी अडविण्यासाठी कोकण बंधारे बांधले आहेत.

वसंत भोईर

वाडा : वाडा तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले असून या पाच नद्यांवर जिल्हा परिषदेने पाणी अडविण्यासाठी कोकण बंधारे बांधले आहेत. या त्यातून वाहून जाणारे पाणी दरवाजे बंद करून आडवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.वाडा तालुक्यामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने काही कोटी खर्च करून तानसा नदीवर उचाट, नारे, मेट, डाकिवली या ठिकाणी, वैतरणा नदीवर कळंभे, सोनाळे, तिळसे, वाडा, गांध्रे, गातेस, कोनसई, आंबिस्ते, बोरांडा या ठिकाणी तर पिंजाळ नदीवर पीक, मलवाडा, पाली, आलमान, गुहीर, सांगे आदी ठिकाणी बंधारे बांधले आहेत. आॅक्टोबरमध्ये या बंधाºयाचे दरवाजे बंद केले जातात. परंतु यंदा नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरु झाला तरी ते बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी वाया जाते आहे. त्यामुळे ते बंद केल्यास पाणी साठून त्याचा फायदा शेतकºयांना होणार आहे.याच बंधाºयाच्या पाण्यावर अनेक शेतकरी भाजीपाला, फुल व फळशेती करीत असतात. हे दरवाजे वेळीच बंद केल्यास साठणाºया पाण्याचा फायदा शेतकºयांना मार्च-एप्रिलपर्यत होत असतो. मात्र दरवाजे लावण्यास उशीर केल्यास बंधाºयातील पाणी वाया जाऊन त्याचा फटका शेतकºयांना बसतो. गेल्या वर्षी बंधाºयाचे पाणी अडविण्यासाठी काही ठिकाणी फायबर दरवाज्यांचा वापर केला होता. मात्र त्यांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने ते पाण्याच्या दाबाने तुटून गेले होते. तर काही ठिकाणी दरवाजे बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पॅकिंग न करता मातीचा वापर केल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन डिसेंबरच्या अखेरीस काही बंधारे कोरडे पडले होते. तसे यंदा होऊ नये अशी शेतकºयांची मागणी आहे.