शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

वसई-विरार महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत राज्य निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्यांकडून नोटिसच मिळाली नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 6:41 PM

मुंबई  उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीस राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून वकील तर सुनावणी हजर राहिले,

वसई-विरार महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत राज्य निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्यांकडून नोटिसच मिळाली नाही 

राज्य निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्यांकडून नोटिसच मिळाली नाही -------

राज्य निवडणूक आयोग

अदयाप प्रतिज्ञापत्र दाखल च नाही तर आम्ही सर्व प्रतिवादीना नोटीसा दिल्या व त्याची पोच ही आहे

---याचिकाकर्ते समीर वर्तक

 

पुन्हा तिसऱ्यांदा पुढील सुनावणी दि.27 ऑक्टोबर ला

 

 

-आशिष राणे

वसई: वसईतील काँग्रेसचे सरचिटणीस समीर वर्तक यांनी वसई विरार महापालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर पालिका हद्दीतील प्रभाग रचनेतील दोष व हरकत नोंदवून ही निवडणूक आयोगाने दखल न घेता त्या सपशेल फेटाळून लावल्याने वर्तक यांनी महापालिकेच्या विरोधात दि.12 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने आपल्या दि,15  ऑक्टोबरच्या पहिल्या सुनावणी वेळीच शनिवा पर्यंत वसई विरार महापालिकेस "प्रतिज्ञापत्र" सादर करण्यास सांगितले होते.मात्र दि.20 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर रोजी मुंबई  उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीस राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून वकील तर सुनावणी हजर राहिले.

मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस वा कागदपत्रे प्राप्त झाली नाही असे राज्य निवडणूक आयोगातर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आल्यानंतर याचिकांकर्ते वर्तक यांच्या वकिलांनी आम्ही राज्य निवडणूक आयोगा सहीत महाराष्ट्र शासन,कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पालघर तसेच वसई विरार महापालिका व त्याचे आयुक्त या सर्वांना ई-मेल द्वारे नोटीस वा कागदपत्रे पाठवली आहेत व ती सर्व त्यांना पोचली असल्याचे उच्च न्यायालयात स्पष्ट केलं,

दरम्यान या वर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी पोच केल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्याचे आदेश देत पुन्हा यावर दि.27ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल असे जाहीर करत प्रतिवादीच्या गैरहजेरीमुळे पुन्हा तिसऱ्या वेळी हा महत्त्वपूर्ण निकाल राखून ठेवला असल्याची माहिती याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी लोकमत ला दिली.

तीन तारखा देऊनही अद्यप प्रतिज्ञापत्र दाखल नाही ?

विशेष म्हणजे उच्च न्यायालयात दोन वेळा व गुरुवारी झालेल्या सुनावणी वेळी देखील राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र अद्यप दाखल च न केल्याने महापालिका व त्याची प्रभाग रचना याचा कार्यक्रम हा कायम होऊ शकत नाही तरी यावर अधिक बोलताना याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी सांगितले की, तारीख पडली हरकत नाही मात्र जोपर्यंत उच्च न्यायालय आपला निकाल देत नाही तोपर्यंत राज्य निवडणूक आयोग आपली वसई विरार महापालिका व त्याची प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही त्यामुळे न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की न्यायदान प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार