शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

दुचाकीविक्रेत्यांवर मंदीचे सावट; ऐन सणासुदीच्या दिवसात व्यावसायिकांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:17 IST

देशभरात पसरलेल्या मंदीच्या सावटाचे मोठे परिणाम जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांसह आॅटोमोबाईल उद्योग, वाहन विक्री व्यवसायावरही पडले आहेत.

- हितेन नाईकपालघर : देशभरात पसरलेल्या मंदीच्या सावटाचे मोठे परिणाम जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांसह आॅटोमोबाईल उद्योग, वाहन विक्री व्यवसायावरही पडले आहेत. अनेक सणांच्या निमित्ताने होणारे वाहनांचे बुकिंग सध्या होत नसल्याने व्यावसायिकांसह त्यांच्याशी निगडीत कामगार वर्गावर कपातीची टांगती त्तलवार आहे. जीएसटीसह लादण्यात आलेल्या मोठ्या जाचक अटी याला कारणीभूत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय, त्या अनुषंगाने येणारे वास्तूविशारद, रंगारी, गवंडी, रेती-विटा व्यावसायिक, जमीन खरेदी - विक्री, औद्योगिक क्षेत्र, मत्स्यव्यवसाय, डायमेकर, अन्नाशी संबंधित व्यवसाय, आॅटोमोबाईल उद्योग आदी अनेक व्यवसायावर मंदीचे वादळ घोंगावत आहे. या वादळामुळे मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात अनेक समस्या आहेत. त्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असून खाजगी नोकरदार वर्गही मेटाकुटीला आला आहे. खाजगीकरणाच्या धोक्यामुळे आपली नोकरी टिकून राहील की नाही याचे दडपण सातत्याने असल्याचे महेश मेहेर सांगतात.सध्या श्रावण महिना, मग गणेशोत्सवानंतरचा पितृ पंधरवड्याचा कालावधी सोडला तर थेट दिवाळीपर्यंत लागून सण आहेत. या काळात नेहमीच काही ना काही खरेदी होते. त्यामुळे चांगला व्यवसाय होईल या आशेवर व्यावसायिक असतात. जिल्ह्यात साधारणपणे आॅटोमोबाईल उद्योगाची संख्या मोठी असून त्यांच्याशी निगडीत स्पेअर पार्ट, आॅटो रिपेअर आदी हजारो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. या मंदीमुळे भारतातील आॅटोमोबाईल उद्योगांच्या उत्पादनांमध्ये व विक्र ी व्यवसायावर परिणाम झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश दुचाकी, चारचाकी वाहन विक्रीमध्ये ही घट ३० ते ३५ टक्के झाली असल्याचे नलीन मोटर्सचे मालक नलीन उपाध्याय यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गेल्यावर्षी पर्यंत या दुचाकी सुमारे २ हजारापर्यंत विकल्या जायच्या, मात्र यंदा एका वर्षात केवळ १ हजार २०० विक्र ी झाल्याचे एसटीएस होंडा शोरूमचे मालक धनंजय संखे यांनी सांगितले.सध्या मंदीचे मोठे सावट या वाहन व्यवसायावर असले तरी रोज बदलती शासन धोरणे याला जबाबदार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.चुकीची धोरणे भोवलीमोटर परिवहन विभागाचे वाहन शुल्क ७ टक्क्यांहून थेट ११ टक्क्यांपर्यंत वाढविल्याचा परिणाम दुचाकी विक्रीवर आढळून येतो. दुचाकी घेतल्यानंतर असलेला विमा हा ५ वर्षांपर्यंतचा करून त्यापोटी सुमारे ५ हजाराहून अधिकचे शुल्क भरण्यास ग्राहक तयार नाहीत. शासनाची काही चुकीची धोरणे यामुळे आधीच विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. वाहने आणि त्याच्या सुट्या भागावरील जीएसटी, बीएस- ३ नंतर झालेला परिणाम, शासनाचे वाढलेले शुल्क यांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.काही वर्षांपासून वाहन विक्र ीचा ग्राफ वेगाने खाली घसरत आहे. शासनाने व्याजाचे दर कमी करताना दुसरीकडे जीएसटी कमी करायला हवा नाहीतर मोठ्या प्रमाणात मंदी वाढून बेरोजगारीमधील वाढ परवडणारी नाही.- नलीन उपाध्याय, नलीन मोटर्स, मुंबईविम्याची रक्कम भरताना एक वर्षाच्या ऐवजी ५ वर्षाचे इन्शुरन्स काढण्याचा नियम, शासनाने वाढवलेले रोड टॅक्सचे अवाढव्य दर, जिल्ह्यात स्थायिक असल्याचा पुरावा नसल्याने अन्य राज्यातील ग्राहकांच्या गाडी नोंदणीत येणाऱ्या जाचक अटींच्या अडचणी याचा एकत्रित परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे.- धनंजय संखे, मालक-एसटीएस होंडा, पालघर

टॅग्स :bikeबाईक