शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक पट्ट्यात मंदीचा धूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 00:35 IST

वाड्यात अनेक कारखाने बंद : हजारो कामगार होतायत बेकार; कारखान्यांचे उत्पादन ५० टक्क्यांवर

वाडा : जागतिक मंदीचा जोरदार फटका वाडा तालुक्यातील कारखानदारांना बसत असून मंदीमुळे उद्योजकांचे कंबरडे मोडत आहे. वाडा औद्योगिक पट्ट्यातील एकेक कारखाना मंदीमुळे बंद होऊन हजारो कामगार बेकार होत आहेत. तसेच कारखान्यांचे उत्पादन निम्म्यावर आले असून कामगार कपातही सुरू आहे. ओव्हरटाइम देणेही बंद केल्याने कामगारांतही नाराजीचा सूर आहे.

वाडा तालुक्यातील मागास आणि आदिवासी भागाचा विकास व्हावा, गरीब आणि आदिवासींना रोजगार मिळावा या उद्देशाने डी प्लस झोन ही योजना तत्कालीन सरकारने १९९२ मध्ये जारी केली. त्यावेळी उद्योगांना १३ वर्षे विक्री करात सूट, आयकरात सूट, उद्योजक शेतकरी नसला तरी जमीन नावावर होणे, वीज बिलात सूट तर प्रकल्प खर्चाच्या ३० टक्क्यांपर्यंत सरकारकडून रोख सबसिडी आणि इतर अनेक सवलती देण्यात आल्या. त्यामुळे उद्योजकांनी आपला मोर्चा वाड्याकडे वळवला. हजारो कारखानदारांनी येथे आपले बस्तान बसवले. वाड्यात आलेले कारखाने हे प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग) पासून ते कपड्यांपर्यत, टाचणीपासून ते भांड्यांपर्यत, मोटारगाड्यांचे पार्ट, विमानाचे भाग, शीतपेये, टी.व्ही., फ्रीज, लोखंड उत्पादन करणारे आहेत.

वाड्यात लोखंडाचे उत्पादन करणाऱ्या ४० टक्के कंपन्या असून आशिया खंडातील लोखंडाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाड्याचा उल्लेख केला जातो. मात्र अलीकडच्या काळात सरकारने सबसिडी बंद करून विजेचे दर भरमसाठ वाढवल्याने लोखंडाची ही बाजारपेठ नष्ट होते की काय, असा प्रश्न भेडसावतो आहे.

जागतिक मंदीचा फटका सध्या वाडा औद्योगिक पट्ट्यात बसत असून अनेक कारखाने यामुळे बंद झाले आहेत तर काही होत आहेत. खरीवली येथे समर्थ एअरकॉन या कंपनीत २०० कामगार काम करीत आहेत. येथे फॅब्रिकेशनचे काम केले जाते. २४ तास तीनही शिफ्टमध्ये या कंपनीचे कामकाज चालायचे. मात्र या मंदीमुळे एका शिफ्टमध्येच ही कंपनी चालवली जाते. या कंपनीतील ५० टक्के काम कमी झाल्याची माहिती मिळाली. वैष्णव इस्पात ही कंपनी वसुरी येथे असून येथे लोखंडाचे उत्पादन केले जात होते. कंपनीत सुमारे ५०० च्या आसपास कामगार काम करीत होते. मात्र अवाजवी वीज बील आणि मंदी यामुळे ही कंपनी काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. हीच परिस्थिती सोलो मेटलची आहे. या कंपनीतही ४०० ते ५०० कामगार काम करीत होते. मंदीचा फटका या कंपनीलाही बसल्याचे बोलले जाते.

गोºहे येथील कलिष्मा इंड्रस्टीज ही कंपनीही काही महिन्यापूर्वी बंद झाली. येथे ६०० च्या आसपास कामगार काम करीत होते. या कंपनीत नट-बोल्डचे उत्पादन केले जायचे. मात्र आॅटोमोबाइल कंपन्यांमधील काम कमी केल्याने त्याचा परिणाम या कंपनीवर झाला आहे. दिनकर पाडा येथे खाप्रा मेटल ही कंपनी होती. येथे तांब्याचे उत्पादन घेतले जायचे मात्र मंदीमुळे या कंपनीला कुलूप लागले आहे. या कंपनीत १०० च्या आसपास कामगार होते. कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील धोडीया सिंटीट्यँक लि. ही कंपनीही काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. कपड्यांच्या धाग्याचे उत्पादन केल्या जाणाºया या कंपनीत एक हजारांच्या आसपास कामगार होते. कोंढले येथे डिसर्च पेंटाकल कंपनी बंद झाली असून येथील ४० कामगार बेकार झाले आहेत. जयगणेश, डेल्टा प्रा.लि. या कंपन्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मुसारणे ग्रा.पं.च्या हद्दीतील हॉरिबगर कंपनीतही कामगार कपात केली आहे. तर गाला प्रेसिजन कंपनीतही उत्पादन निम्म्याने घटले.काही नवीन कंपन्यांनी येथे जागा घेऊन बांधकाम केले आहे. मंदीमुळे दिनकर पाडा येथील व्ही.एस.के., कोंढले येथील टॅग आय एचएसआयएनजी इंड्रस्टीज, वरूण ग्रीड कंपनी या कंपन्या उत्पादन सुरू करू शकत नाहीत. 

पूर्वी आमची कंपनी २४ तास सुरू असायची. मात्र मंदीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून आमचे उत्पादन ५० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे आम्ही फक्त आठ तास कंपनी चालवत असून कामगारांना ओव्हरटाइम पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे कामगारही नाराजी व्यक्त करीत आहेत.- पी.टी.हिवाळे, व्यवस्थापक, समर्थ एअरकॉन प्रा.लि.

आमच्या कंपनीत ५० टक्के काम कमी झाले आहे. आत्तापर्यंत आम्ही कामगारात कपात केलेली नाही. पण पुढे करणे अत्यंत जरूरीचे आहे. परिस्थिती अंत्यत खराब असून आॅटो सेक्टर पूर्णपणे डाऊन झाले आहे.- तुकाराम बेहरे, व्यवस्थापक, गाला प्रेसिजन इंजिनीअरिंग

टॅग्स :businessव्यवसायEconomyअर्थव्यवस्था