शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

भगिनी समाज : महिलांची एक आदर्श शैक्षणिक संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 11:56 PM

१३०० विद्यार्थ्यांना केले जाते ज्ञानदान

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : स्वातंत्र्यपूर्व काळात महिला या चार भिंतीत अडकलेल्या असताना कै. बाबासाहेब दांडेकर त्यांच्या पत्नी रमाबाई दांडेकर तसेच भागीरथीबाई दांडेकर, जानकीदेवी बजाज यांनी उभारलेल्या भगिनी समाज संस्थेच्या रोपट्याचे महाकाय डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील १ हजार ३०० विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य आजही महिला पदाधिकारी, शिक्षिका करीत आहेत.

पालघरमध्ये सन १९३० या स्वातंत्र्यपूर्व काळात भगिनी समाज संस्थेची स्थापना झाली. तेव्हा स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. घराच्या बाहेर पडून एकत्र येऊन काही समाजोपयोगी कार्य करणे ही कल्पनाच नवीन होती. अशा विपरीत परिस्थितीत अनेक महिलांनी एकत्र येत भगिनी समाज संस्थेची स्थापना केली. भगिनींना एकत्र करीत त्यांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक उन्नती करणे, त्यांच्या कलाशक्तीचा उपयोग समाजाच्या सेवांसाठी करून घेणे, एवढाच प्राथमिक उद्देश होता. कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न न राहता फक्त समाजोपयोगी कार्य स्त्रियांकडून करून घेणे व ते करताना कुठलेही धर्मभेद, जातिभेद, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा कुठलाच भेद पाळला जात नाही. आजही अनेक समाजोपयोगी उपक्रम तालुका व जिल्ह्यातील महिलांसाठी राबविले जातात. पालघरसारख्या एका खेडेगावात आधुनिक शिक्षण देणाऱ्या बालमंदिराची स्थापना १ एप्रिल १९४९ रोजी ताराबाई मोडक यांच्या हस्ते करण्यात आली. पालघरच्या पंचक्रोशीतील पालकांच्या आग्रहास्तव बालमंदिरातून मुले मोठी झाल्यावर शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता शकुंतला दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सन १९७० साली प्राथमिक शाळेची स्थापना केली. काळानुरूप शाळेबद्दलची विश्वासार्हता वाढू लागल्याने पालक आपली मुले शाळेमध्ये पाठवू लागले. २००५ साली भाग्यश्री दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. आजघडीला भगिनी समाज संस्थेच्या बालमंदिर, प्राथमिक व माध्यमिक विभागात जवळपास तेराशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई परुळेकर, उपाध्यक्षा तसेच शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा जयश्री सत्तीकर, सेक्रेटरी दीपिका सावले, सल्लागार व मार्गदर्शक वसुमती चित्रे व सदस्य आशा पुरंदरे, भाग्यश्री दांडेकर, अंजली दीक्षित, उषा माळी, दीपा लोखंडे ,नीता प्रभू, वैशाली रहाळकर, अश्विनी कुलकर्णी, निर्मला वर्तक, प्रभावती सामंत आदी भगिनी समाज संस्थेची धुरा सांभाळत आहेत. तसेच बालमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री दांडेकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक यांच्या सहकार्याने शाळेची यशस्वी वाटचाल चालू आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार