शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वाडा येथील महावितरणवर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:00 IST

विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्याचे रूपांतर महावितरण कार्यालयासमोर सभेत झाले.

वाडा : विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्याचे रूपांतर महावितरण कार्यालयासमोर सभेत झाले. या मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवीचे जिल्हा प्रमुख किशोर मढवी, संघटक सरिता जाधव, तालुका अध्यक्ष जानु मोहनकर यांनी केले.या तालुक्यामधील अनेक गाव पाड््यातील विजेची कामे गेली तीन चार वर्षापासून प्रलंबित आहेत. श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही महावितरण प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संतापलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशेष म्हणजे आज दुपारचे जेवणही मोर्चेकºयांनी महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात शिजवून खाल्ले. यावेळी आदिवासी कष्टकरी ढोर नाय माणूस हाय माणूस हाय, कोणाची भिक नको हक्क हवा हक्क हवा, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय, अशा घोषणा दिल्या. यात श्रमजीवी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पराड ,सहसचिव मनोज काशिद, संघटक बाळाराम पाडोसा ,कैलास तुंबडा आदी नेत्यांसहे कार्यकर्ते सहभागी होते. विजेची कामे तत्काळ सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांनी मोचेॅकरांना दिल्यानंतर मोर्चा समाप्त करण्यात आला. डोंगरपाडा (नेहरोली )येथील विद्युत वाहिनी सुरू करावी. वळवीपाडा, गोंडपाडा येथे ट्रान्सफॉर्मर बसवून लाईट चालू करावे. डोंगरीपाडा तुसे येथे विद्युत वाहिनी उभारावी गावदेवी पाडा घोडमाळ येथे १५व रानशेत येथील पाच विजेचे अवचित पाडा व परिसरातील २० मंजूर खांब उभारावेत.पोलिसांशी बाचाबाचीआंदोलनकतेॅ येत असताना महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा नेण्यास मज्जाव केला. पोलिसांनी मोर्चा प्रवेशद्वाराच्या बाहेरच मोचेॅकरांना थांबण्यास सांगितले. मात्र आंदोलनकतेॅ थेट प्रांगणात आले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.डहाणूतील वीजपुरवठ्याचा बोजवाराडहाणू/बोर्डी: मान्सूनच्या आगमनापूर्वीच मागील आठवड्यापासून तालुक्यात विजेचा बोजवारा उडाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज गायब झाल्यानंतर उपकेंद्राशी संपर्क साधल्यावर फोन उचलला जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एखाद्या परिसरात रात्री वीज गेल्यास पुरवठा पूर्ववत व्हायला दुपारपर्यंतची वाट पहावी लागते.रात्रीच्या वेळी काम करताना टॉर्च नसल्याने गैरसोय होते, या बाबत वरिष्ठांना सांगूनही समस्या सुटत नसल्याचे रात्री काम कसे करावे असे कर्मचारी खाजगीत बोलतात. तर फ्यूज, वायर आणि तत्सम साधनांचा अभाव असल्याने छोटे काम करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक गावात वीजेचे जीर्ण खांब आणि तारा बदलण्यात आलेल्या नाहीत.तथापि निष्कारण विजेविना गैरसोय तसेच जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. किनाºयानजिकच्या गावांमध्ये जोराच्या वाºयामुळे विद्युत तारा तुटण्यासह अनेक समस्यांना तोड द्यावे लागत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. या समस्यांचे लवकर निराकरण न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, त्यांचा अंत पाहू नका अशी तीव्र भावना नरपड येथील वीजग्राहक सचिन राऊत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणVasai Virarवसई विरार