शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

शिवसेना-भाजपामध्ये एसटीसेवेवरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:21 IST

वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत.

विरार : वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत. त्याची दाखल घेत एसटी सेवा पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळाले असल्याने या सुरु होणाऱ्या एसटी सेवेचे श्रेय लाटण्यासाठी सेना भाजपा मध्ये चांगलीच जुंपली आहे.वसईत १९६० मध्ये एसटी सेवा सुरू झाली होती. शहरात तत्कालीन वेळेस मनपाने परिवहन सेवा सुरु केल्याने २०१७ मध्ये अनेक मार्गांवरील बस सेवा तोट्यामुळे हळूहळू बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी हवालदिल झाले. वसई पश्चिमेकडील शेतकरी, चाकरमान्यांना एसटीसेवेचा आधार होता. भाजीपाला आणि अन्य सामान एसटी बसमधूनच पोहोचवले जात होते. एसटी सेवा रात्रीही सुरू असल्याने प्रवाशांची सोय होत होती. परंतु या अनेक मार्गांवरील एसटी सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला.एसटी सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाली.या जनआंदोलन समितीने पुढाकार घेतला.विवेक पंडित, मिलिंद खानोलकर, विनायक निकम, डॉमनिका डाबरे, प्रफुल्ल ठाकूर आदी नेत्यांसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक रस्त्यांवर उतरले. सरकारने मात्र नागरिकांच्या मागणीची आणि आंदोलनांची दखल घेतली नाही. ‘शिवसेनेकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यायचे होते ; एसटी सुरू झाली असती’ असे वक्तव्य मुख्यमंत्रांनी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान केले होते.शिवसेनेच्या परिवहनमंत्र्यांनी एसटी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे एसटी सेवा सुरू होईल, अशी आशा नागरिकांना वाटते आहे. पोटनिवडणूकीच्या काळात एसटी सेवेसाठी आंदोलनात पुढाकार घेणाºयापैकी काही कार्यकर्ते शिवसेनेत आणि काही जण भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता एसटी सेवा सुरू करण्यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसईत एसटी सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला. कार्यकर्त्यांनी लढा दिला. त्यामुळे वसईत लवकरच एसटी सुरू होईल .- प्रफुल्ल ठाकूर, जनआंदोलन समितीएसटी सेवेसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली.त्यांनी वसईत लवकरच एसटी सुरू होईल असे सांगितले. परिवहन व्यवस्था करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यात श्रेयाची लढाई नको.- मिलिंद खानोलकर, कार्यकर्ते

टॅग्स :Vasai Virarवसई विरार