शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपामध्ये एसटीसेवेवरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:21 IST

वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत.

विरार : वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत. त्याची दाखल घेत एसटी सेवा पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळाले असल्याने या सुरु होणाऱ्या एसटी सेवेचे श्रेय लाटण्यासाठी सेना भाजपा मध्ये चांगलीच जुंपली आहे.वसईत १९६० मध्ये एसटी सेवा सुरू झाली होती. शहरात तत्कालीन वेळेस मनपाने परिवहन सेवा सुरु केल्याने २०१७ मध्ये अनेक मार्गांवरील बस सेवा तोट्यामुळे हळूहळू बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी हवालदिल झाले. वसई पश्चिमेकडील शेतकरी, चाकरमान्यांना एसटीसेवेचा आधार होता. भाजीपाला आणि अन्य सामान एसटी बसमधूनच पोहोचवले जात होते. एसटी सेवा रात्रीही सुरू असल्याने प्रवाशांची सोय होत होती. परंतु या अनेक मार्गांवरील एसटी सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला.एसटी सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाली.या जनआंदोलन समितीने पुढाकार घेतला.विवेक पंडित, मिलिंद खानोलकर, विनायक निकम, डॉमनिका डाबरे, प्रफुल्ल ठाकूर आदी नेत्यांसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक रस्त्यांवर उतरले. सरकारने मात्र नागरिकांच्या मागणीची आणि आंदोलनांची दखल घेतली नाही. ‘शिवसेनेकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यायचे होते ; एसटी सुरू झाली असती’ असे वक्तव्य मुख्यमंत्रांनी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान केले होते.शिवसेनेच्या परिवहनमंत्र्यांनी एसटी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे एसटी सेवा सुरू होईल, अशी आशा नागरिकांना वाटते आहे. पोटनिवडणूकीच्या काळात एसटी सेवेसाठी आंदोलनात पुढाकार घेणाºयापैकी काही कार्यकर्ते शिवसेनेत आणि काही जण भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता एसटी सेवा सुरू करण्यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसईत एसटी सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला. कार्यकर्त्यांनी लढा दिला. त्यामुळे वसईत लवकरच एसटी सुरू होईल .- प्रफुल्ल ठाकूर, जनआंदोलन समितीएसटी सेवेसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली.त्यांनी वसईत लवकरच एसटी सुरू होईल असे सांगितले. परिवहन व्यवस्था करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यात श्रेयाची लढाई नको.- मिलिंद खानोलकर, कार्यकर्ते

टॅग्स :Vasai Virarवसई विरार