शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

वाडा जलविज्ञानमध्ये शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:28 IST

वाडा शहरातील उमरोठे रोड या भागात जल विज्ञान प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय असून ते अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. असुविधा व दुर्लक्षामुळे ते ओस पडलेले आहे.

वाडा : शहरातील उमरोठे रोड या भागात जल विज्ञान प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय असून ते अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. असुविधा व दुर्लक्षामुळे ते ओस पडलेले आहे. येथे असलेल्या १० पदांपैकी जेमतेम १ महिला कर्मचारी कार्यालयात उपस्थित असून अन्य कर्मचारी विविध कारणांनी बाहेर गेले असल्याचे येथील अभियंत्यांनी सांगितले.पडणाऱ्या पावसाचे प्रमाण व नद्यांतून वाहणारे पाणी यांचे मापन कारण्यासाठी जल विज्ञान प्रकल्पाचे वाडा येथे उपविभागीय कार्यालय आहे. वाडा शहरातील उमरोठे रोड या भागात निवांत जागी हे कार्यालय भल्यामोठ्या जागेत आहे. मात्र हे कार्यालय अगदी बोटावर मोजणाºया लोकांना ठाऊक असून हे कार्यालय अगदी बेदखल असल्याचे जाणवते. कार्यालयात उप विभागीय अधिकारी, ज्युनिअर व सिनिअर लिपिक, कनिष्ठ व शाखा अभियंते, शिपाई तसेच तंत्रज्ञ अशी १० पदे आहेत.या कार्यालयात अधिकाºयांना भेटायला आम्ही गेलो तेव्हा या ठिकाणी ज्युनिअर लिपिक या महिला कर्मचारी उपस्थित होत्या बाकी कार्यालय ओस पडलेले पाहायला मिळाले. अन्य एका कर्मचाºयांना फोन वर माहिती विचारली असता कार्यलायतील संगणकाची चोरी झाल्याने ते आॅनलाइन कामासाठी घरी गेल्याचे त्यांनी सांगितले व अन्य अधिकारी कार्यालयीन कामासाठी बाहेर गेल्याचे सांगून सारवासारव केली. एकंदर अतिशय दुर्लक्षित असलेल्या या विभागात आओेजाओ घर तुम्हारा अशी अवस्था असल्याचा आरोप केला जात आहे. या कार्यालयात पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने व त्यामुळे शौचालयाचा प्रश्नच येत नसल्याने कर्मचाºयांची विशेषत: महिला कर्मचाºयाची कुचंबणा होते.सर्वत्र घाण, कचरा या कार्यालयाचा उपयोग काय?कार्यालयाला गवताचा व घाणीचा घेराव असून त्याची साफसफाई करण्याची कसलीही तरतूद या कार्यालयात नाही.तसेच वारंवार मागणी करूनही या सगळ्या समस्यांवर काहीच मार्ग निघत नसल्याचे येथील उपस्थित असलेले कर्मचारी सांगतात.खरं तर जल विज्ञान प्रकल्प हे कार्यालय नेमके काय व किती काम करते तसेच त्याचा शासनाला किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय असून सरकारी कार्यालयात असलेला शुकशुकाट व मनमानी कारभाराला तात्काळ चाप बसावी यासाठी या कार्यालयाची व येथील एकंदर गोंधळाच्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गोतारणे यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार