शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

शिट्टीअभावी बविआचा बालेकिल्ला ढासळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 23:46 IST

दीड लाखाचा फरक कसा भरून काढणार? यावेळी शिवसेना, भाजपाच्या युतीचे आव्हान

पालघर : लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात झालेला उशीर आणि शिट्टी चिन्ह गमावल्याने व नवे निवडणूक चिन्ह रिक्षा ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचविण्यास बहुजन विकास आघाडीला अजूनही पूर्णत: यश न मिळाल्याने यश गाठणे तिला अवघड होणार आहे.बहुजन विकास आघाडी आणि शिट्टी हे दृढ नाते आता संपुष्टात आल्याने बविआ अडचणीत सापडली असून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी स्वत: आ.हितेंद्र ठाकुरांना केंद्रीय निवडणूक आयोग आणि न्यायालयात खेटे मारावे लागले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत शिट्टी हे चिन्ह मिळविण्यात त्यांना यश न आल्यास त्यांच्या बालेकिल्ल्यांना भागदाडे पडण्याची विरोधकांची व्यूहरचना यशस्वी होते आहे.बविआच्या शिट्टी चिन्हा पासून सुरू झालेल्या कोंडीप्रकरण पुढे पुढे गडद होण्याची चिन्हे दिसत असून वसई मधील बविआ पक्षाच्या मोठ्या पॉकेट्सला थेट हात घालण्याची रणनीती विरोधकांकडून खेळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवारानी लोकसभेच्या पोट निवडणुकीत एकत्र गाठलेला ५ लाख १५ हजार ९९२ मतांचा टप्पा आणि आताच्या निवडणुकीत श्रमजीवी सह अन्य पक्षांच्या मदतीने त्यात आता होणारी वाढ आणि बविआच्या उमेदवाराला पडलेली २ लाख २२, ८३८ मते आणि माकप, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी आघाडीच्या कडून मिळालेली १, १९,६०१ अशी मिळून एकूण ३,६२,८११ मतांची बेरीज केल्यावरही उरणारा १, ५३,१८१ मतांचा फरक भरून काढणे बविआला खूपच जड जाणार आहे. त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे ह्यांच्या जाहीर सभांबरोबरच मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांचे आपल्या सहकारी मावळ्यांना घेऊन निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी खेळलेल्या खेळया महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. वसई तालुका आणि बोईसर मतदारसंघातील काही भाग वगळता अजूनही बविआ च्या उमेदवाराला स्वीकारण्यास मतदार उत्सुक नाही.शिट्टी गेल्याने मते घटणार?मनोर : महाआघाडी व महायुतीमध्ये काटे की लढत होत असून लोकांच्या डोक्यात बसलेली शिट्टी निशाणी अचानक गेल्याने पालघर तालुक्यत मतदानाच्या दिवशी मतदार राजावर त्याचा परिणाम होईल असे चित्र सध्या दिसत आहे. मात्र शिट्टी ऐवजी रिक्षा निशाणीचा प्रचार ही जोमाने सुरू केला आहे. बहुजन विकास आघाडीची शिट्टी हे चिन्ह गेल्या अनेक वर्षा पासून त्यांच्याकडे होता ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपरिषद विधानसभा लोकसभा निवडणुकी मध्ये गाव पाड्या मध्ये शिट्टी पोहोचली होती अशिक्षति लोकांच्या ही डोक्यात तिचा होता. ते चित्र आता राहिलेले नाही.मागील यशाची पुनरावृत्ती घडविणे बविआला अवघडबोर्डी : सतराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना, बहुजन विकास आघाडी या पक्षाचे शिट्टी हे चिन्ह गोठविण्यात येऊन त्या ऐवजी आॅटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच मतदारांच्या मनावर हे नवे चिन्ह बिंबवून नव्या चिन्हावर मतांचे दान पदरी पाडून घेण्यात बविआला किती यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पालघर (२२) मतदार संघाची पुनर्ररचना झाल्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआचे उमेदवार बळीराम सुकुर जाधव यांना पहिल्या क्र मांकाची २,२३,२३४ मतं मिळाली होती. तर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदार संघातील सहा पैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर हे तीन विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यातही यश मिळाले होते. त्यावेळी या पक्षाचे चिन्ह शिट्टी होते. ती मिळविण्यात अपयश आल्याने बविआची स्थिती धोकादायक झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर